शहरं
Join us  
Trending Stories
1
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
2
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
3
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
4
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
5
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
6
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
7
मुलांसाठी Post Office ची खास स्कीम, गॅरंटीड रिटर्न; विमा कव्हरसह बोनसही, अनेकांना याबद्दल कल्पनाही नाही
8
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
9
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
10
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
11
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
12
हेअर ट्रान्सप्लांट करणं इंजिनिअरच्या जीवावर बेतलं; इंफेक्शनमुळे मृत्यू, डॉक्टरवर गुन्हा दाखल
13
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
14
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
15
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
16
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
17
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
18
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
19
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
20
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू

सरकार खोटे बोलते; काँग्रेसचा घणाघात

By admin | Updated: September 15, 2016 02:55 IST

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी ‘अच्छे दिन...’बाबत केलेल्या टिपणीवरून काँग्रेसने आक्रमक होत मोदी सरकारच्या खोट्या आश्वासनांवर घणाघात केला.

शीलेश शर्मा,  नवी दिल्लीकेंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी ‘अच्छे दिन...’बाबत केलेल्या टिपणीवरून काँग्रेसने आक्रमक होत मोदी सरकारच्या खोट्या आश्वासनांवर घणाघात केला.‘खुब ठगा हैं यारों ने, झुठे झुठे नारों ने...असे सांगत काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक मनू सिंघवी यांनी आकडेवारी देत मोदी सरकार किती खोटे बोलते, याचा पर्दाफाश केला.निवडणुकीत ‘अच्छे दिन’चा वायदा केला. याच आश्वासनावर सत्ता मिळविली. हे सरकार खोटे बोलून जनतेचा अपमान करीत आहे. जनतेला फसविले आहे.दोन कोटी रोजगार देण्याचा वायदा केला होता. युवक रोजगारासाठी संघर्ष करीत आहेत. जीडीपीची चुकीची आकडेवारी देत खोट्या विकासाचा मार्ग दाखविला जात आहे. जन-धन योजनेमागील सत्यही माहिती अधिकारातहत बँकांकडून उत्तरादाखल मिळालेल्या माहितीतून उघड झाले आहे. ग्रामीण विद्युतीकरणाची घोषणा पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून केली होती. फटेला गावानेच काही तासांत ही घोषणा फोल ठरविली. दोन वर्षांहून अधिक काळ उलटला आहे; परंतु मोदी सरकार कोणतेही आश्वासन प्रामाणिकपणे पूर्ण करू शकले नाही. आजही केवळ खोटारडे राजकारण करीत आहे.