शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात फोडाफोडीच्या राजकारणाची सुरुवात शरद पवारांनी केली, याच उद्धव ठाकरेंनी...; राज ठाकरेंचा मोठा हल्ला
2
२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 
3
"काँग्रेस आणि सपाचा DNA पाकिस्तानसारखा", योगी आदित्यनाथ यांचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
4
"फोडाफोडीच्या राजकारणाची सुरूवात शरद पवारांनी सुरू केली", राज ठाकरेंची टीका 
5
पश्चिम बंगालच्या संदेशखलीत पुन्हा राडा; TMC कार्यकर्त्याला महिलांनी बेदम चोपले
6
Jio चा धमाका, आता 895 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 11 महिन्यांची व्हॅलिडिटी
7
विराट कोहली अन् इशांत शर्मा यांच्यात धक्काबुक्की! Live Match मध्ये नेमके असं काय घडले?
8
पुण्यात सहकारनगर झोपडपट्टी परिसरात भाजपकडून पैसे वाटप, धंगेकरांचा आरोप 
9
'...तर मला पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज नाही', CM अरविंद केजरीवालांचे जनतेला आवाहन
10
MS Dhoni भावनिक झाला! प्रेक्षकांना थांब म्हणणाऱ्या CSK ने बघा काय केले, सुरेश रैनाने मारली मिठी
11
विल जॅक्स, रजत पाटीदार यांच्या फटकेबाजीनंतरही RCB ची झाली कोंडी, DC चे कमबॅक 
12
तीन तलाक, मुस्लिम पर्सनल लॉ, राम मंदिर..; अमित शाह यांचे राहुल गांधींना 5 प्रश्न
13
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास
14
रवींद्र जडेजाची 'चिटिंग' अम्पायरने पकडली; बाद देताच, CSK च्या खेळाडूची सटकली, Video
15
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
16
चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 
17
'...तर दोन्ही देशातील संबंध सुधारणार नाहीत', भारत-चीन सीमावादावर जयशंकर स्पष्ट बोलले
18
भरधाव डंपरने कारला दिली धडक, भाजपा नेत्याचा अपघातात मृत्यू
19
यामिनी जाधव, वायकरांना उमेदवारी का दिली? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'त्यांची चूक असती तर मी...'
20
एका क्रिकेटवेड्या कपलची गोष्ट; 'Mr And Mrs Mahi' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित

भजी तळण्यासाठी वापरलेल्या तेलावर धावणार कार; प्रदूषण टाळण्यास लागणार हातभार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2019 12:23 PM

नव्या योजनेसाठी मोदी सरकारची तयारी जवळपास पूर्ण

मुंबई: पर्यावरणातील प्रदूषण कमी करण्यासाठी मोदी सरकारनं आणखी एक मोठं पाऊल उचललं आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी पुढाकार घेतल्यानंतर आता सरकारनं बायोडिझल (जैवइंधनाच्या) दृष्टीनं महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. वापरलेल्या तेलापासून बायोडिझेलची निर्मिती करण्यात येईल. यासाठी पहिल्या टप्प्यात देशभरातील 100 शहरांमध्ये कारखान्यांची उभारणी केली जाईल. त्यामुळे भविष्यात बायोडिझेलवर धावणारी वाहनं पाहायला मिळतील. बायोडिझलच्या वापराचे अनेक फायदे होणार आहेत. यामुळे पर्यावरणातील प्रदूषण कमी होण्यास मदत होईल. याशिवाय वाहनांचं आयुमानदेखील वाढेल. पर्यावरण प्रदूषण कमी करणाऱ्या बीएस-6 वाहनांच्या श्रेणीत बायोडिझलवर चालणाऱ्या गाड्यांचा समावेश केला जाईल. बायोडिझेलच्या निर्मितीसाठी हरतऱ्हेची मदत करण्याचं आश्वासन मोदी सरकारकडून इंधन कंपन्यांना देण्यात आलं आहे. यासाठी 10 ऑगस्टला जागतिक जैवइंधन दिनानिमित्त पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम यांच्यासह विशेष प्रकल्पाची घोषणा केली. बायोडिझेलच्या निर्मितीसाठी आता सरकारी इंधन कंपन्या खासगी  कंपन्यांशी करार करतील. या कंपन्यांकडून बायोडिझेलची निर्मिती केली जाईल. सुरुवातीला इंधन कंपन्या 51 रुपये प्रति लीटर दरानं बायोडिझेलची विक्री केली जाईल. त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षी बायोडिझेलची किंमत 52.7 आणि 54.5 रुपयांवर जाईल. नव्या योजनेसाठी धर्मेंद्र प्रधान यांनी रिपर्पज यूज्ड कुकिंग ऑईल (आयूसीओ) स्टीकर आणि यूज्ड कुकिंग ऑईलसाठी (यूसीओ) मोबाईल अ‍ॅपदेखील लॉन्च केलं आहे. एकदा वापरलेलं तेल पुन्हा वापरलं जाणार नाही, यावर अ‍ॅपच्या माध्यमातून लक्ष ठेवलं जाईल. या योजनेच्या अंतर्गत हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये स्टीकर लावले जातील. आम्ही बायोडिझेलचा पुरवठा करतो, यासाठी हे स्टीकर लावले जातील.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी