शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
3
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
4
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
5
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
6
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
7
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
8
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
9
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
10
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
11
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
12
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
14
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
15
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
16
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
18
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
19
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
20
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  

शाहीनबागमधील आंदोलकांशी चर्चा करण्यास अखेर सरकार तयार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2020 11:21 IST

शाहीनबाग येथील रस्त्यावर अल्पसंख्याक समाजातील स्त्रियांनी ठिय्या दिला असून, या आंदोलनाला जोरदार पाठिंबा मिळत आहे.

ठळक मुद्देशाहीनबाग येथील रस्त्यावर अल्पसंख्याक समाजातील स्त्रियांनी ठिय्या दिला असून, या आंदोलनाला जोरदार पाठिंबा मिळत आहे. आंदोलकांशी चर्चा करण्यास केंद्र सरकार तयार कायदेमंत्री रविशंकर प्रसाद यांनी याबाबतची माहिती दिली

नवी दिल्ली - नुकताच अमलात आलेला नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि प्रस्तावित एनआरसीविरोधात दिल्लीतील शाहीन बाग येथे गेल्या 45 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. शाहीनबाग येथील रस्त्यावर अल्पसंख्याक समाजातील स्त्रियांनी ठिय्या दिला असून, या आंदोलनाला जोरदार पाठिंबा मिळत आहे. त्या पार्श्वभूमीरवर येथील आंदोलकांशी चर्चा करण्यास केंद्र सरकार तयार झाले आहे. कायदेमंत्री रविशंकर प्रसाद यांनी याबाबतची माहिती दिली आहे. केंद्र सरकार शाहीनबागमधील आंदोललकांशी चर्चा करून त्यांच्या शंकाचे निरसन करण्यास तयार आहे. मात्र त्याआधी शाहीनबाग येथे आंदोलन करत असलेले आंदोलक चर्चेसाठी झाले पाहिजेत.  कायदेमंत्री रविशंकर प्रसाद यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीती ही माहिती दिली. यावेळी शाहीनबाग आंदोलनाशी संबंधित असलेले काही प्रतिनिधीसुद्धा उपस्थित होते. यावेळी आतापर्यंत सरकारने चर्चेसाठी प्रयत्न का केले नाहीत, अशी विचारणा संबंधित प्रतिनिधींनी रविशंकर प्रसाद यांच्याकडे केली. त्यावेळी सरकार चर्चेला कायम तयार आहे मात्र शाहीनबाग आंदोलनाशी संबंधिक काही नेते सीएए मागे घेतला जात नाही तोपर्यंत चर्चा करता येणार नाही असे सांगत असतात. त्यामुळे आंदोलकांकडून चर्चेचा प्रस्ताव आल्यास चर्चा नक्कीच होईल. मात्र आंदोलनस्थळीच बसून चर्चा होईल, असा आग्रह आंदोलकांनी धरल्यास चर्चा होणे कठीण आहे, असेही रविशंकर प्रसाद यांनी स्पष्ट केले. 

 दरम्यान, सीएएला विरोध होत नाही आहे, पण अमित शाह यांनी एनआरसीबाबत केलेल्या विधानामुळे चिंता वाढली आहे, असा प्रश्न केला असता रविशंकर प्रसाद यांनी सांगितले की, एनआरसीबाबत भीती व्यक्त करणाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे रामलीला मैदानावरील भाषण ऐकले पाहिजे. त्यात एनआरसीवर मंत्रिमंडळाच्या बैठकीत कुठलीही चर्चा झाली नसल्याचे पंतप्रधानांनी सांगितले आहे. दरम्यान, आंदोलनाशी संबंधित लोकच सीएएबाबत कुठलाही आक्षेप नसल्याचे सांगत आहेत, ही आनंदाची बाब आहे, असेही रविशंकर प्रसाद यांनी सांगितले.  

शाहीनबाग : आंदोलनाला महिना पूर्ण, मागे हटण्यास महिलांचा नकार

शाहीनबागमधील आंदोलनात प्रजासत्ताक दिन, मध्यरात्रीच सुरू झाला सोहळा

CAA : ''सीएए' म्हणजे भारतीय लोकशाहीवरील डाग' 

दरम्यान, नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात सुमारे दीड महिन्यापासून दिल्लीत शाहीनबाग येथे महिलांचे आंदोलन सुरू आहे. रविवारी राजधानी दिल्लीतील प्रजासत्ताक दिन सोहळ्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष असतानाच शाहीनबागमध्ये आंदोलकांनी ध्वजारोहण केले. राजपथवर प्रजासत्ताक दिन सोहळा पाहण्यासाठी जाणाऱ्या दिल्लीकरांप्रमाणेच शाहीनबागमध्येही प्रचंड उत्साही वातावरण होते.

टॅग्स :New Delhiनवी दिल्लीcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकCentral Governmentकेंद्र सरकार