शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
2
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
3
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
4
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
5
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
6
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
7
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
8
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
9
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
10
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
11
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
12
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
13
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
14
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
15
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
16
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
17
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
18
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
19
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
20
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  

अपयश झाकण्यासाठी सरकार ‘ट्रिपल तलाक’मध्ये पडतेय

By admin | Updated: October 14, 2016 02:03 IST

आॅल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड आणि देशातील प्रमुख मुस्लिम संघटनांनी गुरुवारी समान नागरी कायद्यावरील विधि आयोगाच्या प्रश्नावलींना विरोध

नवी दिल्ली : आॅल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड आणि देशातील प्रमुख मुस्लिम संघटनांनी गुरुवारी समान नागरी कायद्यावरील विधि आयोगाच्या प्रश्नावलींना विरोध केला आहे, तर आमच्या समुदायाविरुद्ध सरकार युद्ध करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. येथे पत्रकार परिषदेत बोलताना मुस्लिम संघटनांनी दावा केला की, जर समान नागरी कायदा लागू केला, तर सर्व नागरिकांना एकाच रंगात रंगविल्यासारखे होईल. देशातील अनेकत्त्ववाद आणि विविधता यांच्यासाठी हा धोका असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. पर्सनल लॉ बोर्डाचे महासचिव वली रहमानी, जमियत उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष अरशद मदनी, आॅल इंडिया मिल्ली काऊन्सिलचे प्रमुख मंजूर आलम, जमात- ए- इस्लामी हिंदचे पदाधिकारी मोहम्मद जफर, आॅल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे सदस्य कमाल फारुकी आणि अन्य काही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी तीन तलाक आणि समान नागरी कायद्याच्या मुद्यावर सरकारला घेरले. तीन तलाकच्या मुद्यावर सरकारची भूमिका खोडून काढताना या संघटनांनी दावा केला की, आमच्या समुदायात अन्य समुदायांच्या विशेषत: हिंदू समुदायाच्या तुलनेत घटस्फोटाचे प्रकार कमी आहेत. बोर्ड आणि मुस्लिम संघटना या मुद्यावर मुस्लिम समुदायाला जागरूक करण्यासाठी देशभरात मोहीम राबविणार असून, याची सुरुवात लखनौमधून करणार असल्याचे रहमानी यांनी सांगितले.ते म्हणाले की, आपल्या अपयशापासून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे. नव्हे, या समुदायासोबत सरकार युद्ध करू इच्छित आहे. बोर्डाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, पर्सनल लॉमध्ये काही त्रुटी असल्यास त्या दूर केल्या जातील. जमियतचे प्रमुख अरशद मदनी म्हणाले की, देशासमोर अनेक आव्हाने आहेत. सीमेवर तणाव आहे. निर्दोष नागरिकांच्या हत्या होत आहेत. सरकारने या आव्हानांकडे लक्ष देण्याची गरज आहे. दरम्यान, मुस्लिम समुदायातीलच काही नागरिकांनी तीन तलाकच्या मुद्यावर पर्सनल लॉ बोर्डाच्या भूमिकेला विरोध केला आहे, असा प्रश्न केला असता रहमानी म्हणाले की, येथे प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)