शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

गरिबांच्या मुलांना लवकरच मिळणार 12वीपर्यंत मोफत शिक्षण, मोदी सरकार करणार मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2019 10:42 IST

लोकसभा निवडणुकीपूर्वीच आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या लोकांना मोदी सरकार मोठा दिलासा देण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देलोकसभा निवडणुकीपूर्वीच आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या लोकांना मोदी सरकार मोठा दिलासा देण्याची शक्यता आहे.मुलांना 8वी ऐवजी 12वी इयत्तेपर्यंत मोफत शिक्षण देण्याचं केंद्र सरकारच्या विचाराधीन आहे. या कायद्यांतर्गत खासगी शाळेतही आर्थिक स्वरूपात मागास वर्गातील मुलांना 25 टक्के जागा आरक्षित ठेवणं अनिवार्य आहे.

नवी दिल्ली- लोकसभा निवडणुकीपूर्वीच आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या लोकांना मोदी सरकार मोठा दिलासा देण्याची शक्यता आहे. मुलांना 8वी ऐवजी 12वी इयत्तेपर्यंत मोफत शिक्षण देण्याचं केंद्र सरकारच्या विचाराधीन आहे. मनुष्यबळ विकास मंत्रालयानं यासंदर्भात शिक्षा कार्यकर्त्याला पत्र लिहिलं आहे. पत्रात लिहिलं आहे की, मंत्रालय शिक्षा अधिकार (RTE)2009च्या कायद्यांतर्गत मुलांना मोफत आणि अनिवार्य शिक्षा 8वी इयत्तेच्या ऐवजी वाढवून 12वीपर्यंत करण्याचा विचार करत आहोत. प्रस्तावावर सखोल अभ्यास केल्यानंतर निर्णय घेतला जाणार आहे. सध्या मंत्रालय शिक्षा अधिकार (RTE)2009च्या कायद्यांतर्गत 14 वर्षांच्या मुलाला म्हणजेच 8वीपर्यंतच्या मुलांना मोफत शिक्षण दिलं जातं. या कायद्यांतर्गत खासगी शाळेतही आर्थिक स्वरूपात मागास वर्गातील मुलांना 25 टक्के जागा आरक्षित ठेवणं अनिवार्य आहे.काही दिवसांपूर्वीच केंद्रानं आर्थिक स्वरूपात मागास असलेल्या लोकांना सरकारी नोकऱ्यांमध्ये 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. अशातच 12वीपर्यंतच्या मुलांना मोफत शिक्षण देऊन गरीब मतदारांना आकर्षित करण्याचं मोदी सरकारचं दुसरं मोठं पाऊल असल्याचं राजकीय वर्तुळात चर्चा आहे. खुल्या प्रवर्गातील आर्थिक मागासांना शिक्षण आणि नोकरीत 10 टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयाला संसद आणि राष्ट्रपतींची मंजुरी मिळाल्यानंतर आता विविध राज्यांनी या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. केंद्र सरकारने खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना शिक्षण आणि नोकरीमध्ये 10 टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर यासंदर्भात मोदी सरकारने केलेल्या घटनादुरुस्तीच्या विधेयकाला लोकसभा आणि राज्यसभेने मोठ्या बहुमतासह मंजुरी दिली होती. तसेच राष्ट्रपतींनीही या विधेयकावर स्वाक्षरी केली आहे. त्यानंतर विविध राज्यांनी खुल्या प्रवर्गातील आर्थिक मागासांना शिक्षण आणि नोकरीत 10 टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयाला मंजुरी दिली आहे. त्यात या आरक्षणाची अंमलबजावणी करणारे गुजरात पहिले राज्य ठरले होते. त्यानंतर तेलंगाणा, आंध्र प्रदेश, उत्तरखंड आणि हिमाचल प्रदेश या राज्यांनीही या आरक्षणाच्या अंमलबजावणीस मंजुरी दिली होती. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीgovernment schemeसरकारी योजना