शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: वाढते रुग्ण आणि मृत्यूंमुळे सरकार चिंतेत; तज्ज्ञांचे अंदाज पूर्णपणे फसले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2020 06:35 IST

जूनअखेर टोक गाठले जाणार?

नवी दिल्ली : कोरोना विषाणूचा (कोविड-१९) फैलाव आणि प्रदीर्घ काळ लागू कराव्या लागलेल्या लॉकडाऊनबाबत सरकारला सल्ला देत असलेल्या तज्ज्ञांनी आता वेगळा सूर आळवायला सुरुवात केली आहे. पंतप्रधानांच्या आणीबाणीच्या परिस्थितीतील टास्क फोर्सचे अध्यक्ष आणि लॉकडाऊनवरील टास्क फोर्सचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी १६ मेपर्यंत कोविड-१९चे रुग्ण शून्यावर येतील हा आधी केलेला दावा मागे घेतला आहे.

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे (एम्स) संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी कोविड-१९ चे मृत्यू आणि रुग्ण यांच्या संख्येचा अंदाज असल्याचे म्हटले. डॉ. पॉल हे एम्समधील लहान मुलांचे आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता पावलेले डॉक्टर असून ते नीती आयोगाचे सदस्यही आहेत.

डॉ. पॉल यांनी गेल्या २४ एप्रिल रोजी केलेल्या निवेदनाबद्दल त्यांना विचारले असता ते म्हणाले की, ‘‘मी केलेल्या त्या सादरीकरणाचा (प्रेझेंटेशन) चुकीचा अर्थ लावला गेला. त्या सादरीकरणात प्रसारमाध्यमांसमोर स्लाईड सादर केली गेली होती. तीत तो दावा केला गेला होता व मी तो व्यक्तिश: केला नव्हता.’’

कोविड-१९ च्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे तशी सरकारला टास्क फोर्सने फसवल्याची टीकाही. डॉ. पॉल २३ मे रोजी प्रसारमाध्यमांसमोर पुन्हा एकदा आले. तेव्हा त्यांच्यासोबत होते सांख्यिकी विभागाचे सचिव. कोविड-१९ बद्दलचे अंदाज सरकारने गणितज्ञ, सेवानिवृत्त शास्त्रज्ञ आणि तज्ज्ञांच्या सल्ल्यावरून काढले होते याचा खुलासा करताना त्यांना वेदना होत होत्या आणि पहिल्यांदाच त्यांनी बोस्टन कन्सल्ंिटग ग्रुप, पब्लिक हेल्थ फाऊंडेशन व सरकारला अंदाज सांगितलेल्या खासगी संस्थांची नावेही घेतली.

डॉ. रणदीप गुलेरिया हे डॉ. पॉल अध्यक्ष असलेल्या टास्क फोर्सशी संबंधित नव्हते. त्यांनी जुलै महिन्यात भारतात टोक गाठलेले असेल आणि रुग्णवाढीचा आलेख आडवा होणे त्यानंतर सुरू होईल, असा अंदाज व्यक्त केला होता; परंतु त्यांनी ताबडतोब असेही म्हटले होते की, ही सगळीच गणितीय गणना आणि अंदाज आहेत. ‘लोकमत’ने गेल्या आठवड्यात तज्ज्ञांनी सरकारला मृत्यू आणि रुग्णसंख्येबाबत सल्ला देताना फसवले आहे, असे वृत्त पहिल्यांदा दिले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खूपच चिंतेत आहेत.नेमकी संख्या किती असेल?

पॉल यांचा अंदाज आता असा आहे की, भारतात अजून रुग्णवाढीचे टोक गाठले जायचे असून, ते जूनअखेर घडू शकते. टास्क फोर्सचा दावा असा आहे की, लॉकडाऊनमुळे रुग्णसंख्या १४ ते २८ लाख होणे आणि मृत्यू ७८ हजारांपर्यंत जाणे टाळले. नेमकी संख्या किती असेल हे मात्र फोर्स सांगू शकला नाही.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत