शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

CoronaVirus News: वाढते रुग्ण आणि मृत्यूंमुळे सरकार चिंतेत; तज्ज्ञांचे अंदाज पूर्णपणे फसले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2020 06:35 IST

जूनअखेर टोक गाठले जाणार?

नवी दिल्ली : कोरोना विषाणूचा (कोविड-१९) फैलाव आणि प्रदीर्घ काळ लागू कराव्या लागलेल्या लॉकडाऊनबाबत सरकारला सल्ला देत असलेल्या तज्ज्ञांनी आता वेगळा सूर आळवायला सुरुवात केली आहे. पंतप्रधानांच्या आणीबाणीच्या परिस्थितीतील टास्क फोर्सचे अध्यक्ष आणि लॉकडाऊनवरील टास्क फोर्सचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी १६ मेपर्यंत कोविड-१९चे रुग्ण शून्यावर येतील हा आधी केलेला दावा मागे घेतला आहे.

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे (एम्स) संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी कोविड-१९ चे मृत्यू आणि रुग्ण यांच्या संख्येचा अंदाज असल्याचे म्हटले. डॉ. पॉल हे एम्समधील लहान मुलांचे आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता पावलेले डॉक्टर असून ते नीती आयोगाचे सदस्यही आहेत.

डॉ. पॉल यांनी गेल्या २४ एप्रिल रोजी केलेल्या निवेदनाबद्दल त्यांना विचारले असता ते म्हणाले की, ‘‘मी केलेल्या त्या सादरीकरणाचा (प्रेझेंटेशन) चुकीचा अर्थ लावला गेला. त्या सादरीकरणात प्रसारमाध्यमांसमोर स्लाईड सादर केली गेली होती. तीत तो दावा केला गेला होता व मी तो व्यक्तिश: केला नव्हता.’’

कोविड-१९ च्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे तशी सरकारला टास्क फोर्सने फसवल्याची टीकाही. डॉ. पॉल २३ मे रोजी प्रसारमाध्यमांसमोर पुन्हा एकदा आले. तेव्हा त्यांच्यासोबत होते सांख्यिकी विभागाचे सचिव. कोविड-१९ बद्दलचे अंदाज सरकारने गणितज्ञ, सेवानिवृत्त शास्त्रज्ञ आणि तज्ज्ञांच्या सल्ल्यावरून काढले होते याचा खुलासा करताना त्यांना वेदना होत होत्या आणि पहिल्यांदाच त्यांनी बोस्टन कन्सल्ंिटग ग्रुप, पब्लिक हेल्थ फाऊंडेशन व सरकारला अंदाज सांगितलेल्या खासगी संस्थांची नावेही घेतली.

डॉ. रणदीप गुलेरिया हे डॉ. पॉल अध्यक्ष असलेल्या टास्क फोर्सशी संबंधित नव्हते. त्यांनी जुलै महिन्यात भारतात टोक गाठलेले असेल आणि रुग्णवाढीचा आलेख आडवा होणे त्यानंतर सुरू होईल, असा अंदाज व्यक्त केला होता; परंतु त्यांनी ताबडतोब असेही म्हटले होते की, ही सगळीच गणितीय गणना आणि अंदाज आहेत. ‘लोकमत’ने गेल्या आठवड्यात तज्ज्ञांनी सरकारला मृत्यू आणि रुग्णसंख्येबाबत सल्ला देताना फसवले आहे, असे वृत्त पहिल्यांदा दिले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खूपच चिंतेत आहेत.नेमकी संख्या किती असेल?

पॉल यांचा अंदाज आता असा आहे की, भारतात अजून रुग्णवाढीचे टोक गाठले जायचे असून, ते जूनअखेर घडू शकते. टास्क फोर्सचा दावा असा आहे की, लॉकडाऊनमुळे रुग्णसंख्या १४ ते २८ लाख होणे आणि मृत्यू ७८ हजारांपर्यंत जाणे टाळले. नेमकी संख्या किती असेल हे मात्र फोर्स सांगू शकला नाही.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत