शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

रिझर्व्ह बँक ताब्यात घेण्यासाठी सरकारचा सुरू आहे आटापिटा, चिदम्बरम यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2018 00:17 IST

भारतीय रिझर्व्ह बँकेकडे असलेल्या नऊ लाख कोटी रुपयांहून अधिक संचित निधीवर डोळा ठेवून देशाची ही केंद्रीय बँक आपल्या ‘ताब्यात’ घेण्याचा केंद्र सरकारने चंग बांधला आहे, असा आरोप ज्येष्ठ काँग्रेस नेते व माजी केंद्रीय वित्तमंत्री पी. चिदम्बरम यांनी रविवारी केला.

नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेकडे असलेल्या नऊ लाख कोटी रुपयांहून अधिक संचित निधीवर डोळा ठेवून देशाची ही केंद्रीय बँक आपल्या ‘ताब्यात’ घेण्याचा केंद्र सरकारने चंग बांधला आहे, असा आरोप ज्येष्ठ काँग्रेस नेते व माजी केंद्रीय वित्तमंत्री पी. चिदम्बरम यांनी रविवारी केला.रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय संचालक मंडळाच्या सोमवारी होत असलेल्या महत्त्वाच्या बैठकीच्या पूर्वसंध्येस हा आरोप करत चिदम्बरम यांनी टिष्ट्वटरवर लिहिले की, सरकारचा एकूण दृष्टिकोन बघता, या बैठकीत संघर्ष होणे अटळ आहे. संघर्षाचे मुख्य कारण रिझर्व्ह बँकेकडील संचित निधीचा सरकारला पडलेला हव्यास हेच असून, उभायतांमधील मतभेदाची पुढे केली जाणारी अन्य कारणे ही निव्वळ धूळफेक आहे.संघर्ष अटळ असल्याने १९ नोव्हेंबरची संचालक मंडळाची बैठक ही रिझर्व्ह बँकेची स्वायत्तता व देशाची अर्थव्यवस्था यांच्या दृष्टीने परीक्षेची घडी आहे, असेही त्यांनी म्हटले.रिझर्व्ह बँकेकडे विविध संभाव्य धोक्यांचा सामना करण्यासाठी बाजूला ठेवलेला एकूण नऊ लाख रुपयांहून अधिक संचित निधी आहे व त्यापैकी तीन लाख कोटी रुपये रिझर्व्ह बँकेने बुडीत कर्जांच्या बोजाखाली दबलेल्या सरकारी बँकांना भाडवल पुरवठा करण्यासाठी द्यावेत, यासाठी सरकारने तगादा लावला असल्याचे वृत्त आहे.सरकारने आपल्या परीने याचा इन्कार करताना म्हटले आहे की, सरकारला रिझर्व्ह बँकेकडून कोणत्याही अवाजवी निधीची अपेक्षा नाही. सरकारची वित्तीय शिस्तीची घडी ठाकठीक असल्याने सरकारला या निधीची गरजही नाही.मात्र, सरकार रिझर्व्हबँकेची मालक असल्याने, याबँकेच्या भांडवली ताळेबंदाचीनिश्चित चौकट ठरविली जावी व त्याच अनुषंगाने रिझर्व्ह बँकेने सरकारला द्यायच्या लाभाशांचे सूत्रही ठरविले जावे, असे मात्र सरकारला जरूर वाटते.कल्पनाच मुळात वाह्यातपणाचीचिदम्बरम लिहितात की, जगात कोणत्याही देशाची मध्यवर्ती बँक संचालक मंडळाकडून नियंत्रित कंपनीप्रमाणे चालविली जात नाही. खासगी उद्योग-धंद्यांशी संबंधित असलेल्या संचालक मंडळावरील व्यक्तींनी रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरना हुकूम द्यावेत, ही कल्पनाच मुळात वाह्यातपणाची आहे.

टॅग्स :P. Chidambaramपी. चिदंबरमReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँक