शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
2
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
3
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
4
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
5
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
6
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
7
416%नं वाढला कंपनीचा नफा, आता शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड; ₹40 पेक्षाही कमी आहे किंमत!
8
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
9
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
10
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
11
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
12
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
13
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
14
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टीकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
15
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
16
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
17
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
18
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम
19
चातुर्मासातील पहिली कामिका एकादशी: श्रीविष्णूंचे ‘या’ स्वरुपात करा पूजन; पाहा, सोपा व्रतविधी
20
“शिवसेना-ठाकरे ब्रँड तुमचे राहिलेले नाही, काँग्रेस बरोबर गेलात तेव्हाच संपला”; भाजपाची टीका

सरकार सर्वात मोठे पक्षकार-पंतप्रधान

By admin | Updated: November 1, 2016 02:56 IST

सरकार हे सर्वात मोठे पक्षकार असून न्यायपालिकेवरील खटल्यांचे ओझे कमी करायला हवे.

नवी दिल्ली : सरकार हे सर्वात मोठे पक्षकार असून न्यायपालिकेवरील खटल्यांचे ओझे कमी करायला हवे. न्यायालयांना सरकारी खटले निकाली काढण्यातच अधिक वेळ खर्ची घालावा लागतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विज्ञान भवनात आयोजित दिल्ली उच्च न्यायालयाच्या सुवर्णजयंती कार्यक्रमात स्पष्ट केले.आमचे खटले निकाली काढण्यातच न्यायालयाचा वेळ खर्ची पडतो, आमचा याचा अर्थ मोदी नव्हे तर सरकार असा घ्यावा, टोला मारत ते म्हणाले की, व्यापक सल्लामसलत केल्यानंतर खटले दाखल झाले तर न्यायपालिकेवरील ओझे कमी होऊ शकते. एखाद्या शिक्षकाने सेवेसंबंधी वादाबाबत न्यायालयाचे दार ठोठावत विजय मिळविल्यास हा निर्णय सर्व शिक्षकांना लाभ देण्यासाठी निकष ठरवायला हवा. त्यामुळे नंतरच्या टप्प्यात खटल्यांची संख्या कमी करता येईल. सरकारकडे ठोस आकडेवारी नसली तरी किमान ४६ टक्के प्रकरणांमध्ये सरकार पक्षकार आहे. त्यात सरकारी सेवेसह अप्रत्यक्ष करांसंबंधी अनेक प्रकरणांचा समावेश असतो. कायदा मंत्रालयाने २०१० मध्ये तयार केलेल्या मसुद्याच्या आधारावर त्या त्या राज्यांनी खटल्यासंबंधी धोरण राबविणे चालविले असले तरी केंद्र सरकारला त्याबाबत धोरण निश्चित करता आलेले नाही. प्रशासकीय सेवेच्या धर्तीवर अखिल भारतीय न्यायसेवा आणण्याची गरजही त्यांनी प्रतिपादित केली. खटल्यासंबंधी धोरण हे ताज्या कलावर आधारित असावे. अंतिम निर्णय न्यायालयावर सोडण्याची मानसिकता सोडायला हवी, असेही त्यांनी स्पष्ट केले. अ.भा. मुलकी सेवा आणण्यात सरदार वल्लभभाई पटेल यांची मोठी भूमिका होती. धोरण राबविण्यात अधिकारी केंद्र आणि राज्य स्तरावर सेतू म्हणून काम करीत असतात. देश पातळीवर न्यायालयीन सेवा आणण्याचा मुद्दा वादग्रस्त ठरू शकतो, मात्र त्यावर चर्चा व्हायला हवी. लोकशाहीत तो आवश्यक घटक आहे, असेही त्यांनी नमूद केले.>न्यायदानात आर्थिक अडसर नकोच- सरन्यायाधीशन्यायाधीश किंवा आर्थिक कारणास्तव पायाभूत सुविधांच्या अभावी लोकांना न्याय देण्याच्या प्रक्रियेत अडसर निर्माण व्हायला नको, असे सरन्यायाधीश टी.एस. ठाकूर यांनी सोमवारी स्पष्ट केले. न्याय प्रत्यक्षात उतरायला हवा हेच आपल्या राज्य घटनेचे तत्त्वज्ञान आहे. खटल्यांबाबत निर्णय होण्यास लोकांना वर्षानुवर्षे वाट बघावी लागत असेल तर न्याय प्रत्यक्षात उतरणार नाही, असेही ते म्हणाले. काही स्तरावर आढळणारी पथभ्रष्टता संपूर्ण न्यायप्रणालीसाठी निराशाजनक ठरत असून त्याबाबत सर्वसामान्यांचा होत असलेला समज वेदनादायी ठरतो. यावर न्यायाधीशांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे, असेही सरन्यायाधीश म्हणाले.>न्यायाधीशांचे फोन टॅप केले जातात- केजरीवालन्यायाधीशांचे फोन टॅप केले जातात ही भीती व्यापक होत असून ते जर खरे असेल तर तो न्यायालयीन स्वातंत्र्यावर सर्वात मोठा हल्ला ठरेल, असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलेले विधान खळबळजनक ठरले.न्यायपालिकेचे स्वातंत्र्य मूलभूत असून त्याबाबत आमचे सरकार कोणतीही तडजोड करणार नाही, असे सांगत केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी आरोपांचा इन्कार केला. मी न्यायाधीशांना भेटलो तेव्हा ते एकमेकांना फोनवर बोलू नका ते टॅप केले जाऊ शकतात, अशा सूचना देताना मी ऐकले आहे, असा दावा केजरीवाल यांनी केला. हे खरे आहे काय ते मला माहीत नाही, मात्र तशी व्यापक भीती आहे. ही भीती खरी असेल तर न्यायाधीशांवर प्रभाव पाडला जाऊ शकतो, असे केजरीवाल म्हणाले.