शहरं
Join us  
Trending Stories
1
'जे घडले, ते घडायला नको होते'; मोहसिन नक्वींनी बीसीसीआयची माफी मागितली, पण ट्रॉफी परत देण्यास नकार
2
असे कसे झाले...! सप्टेंबरमध्ये वाहनांची विक्री वाढायला हवी होती, १३ टक्क्यांनी कमी झाली...; नेमके काय झाले...
3
सर्व्हे! नितीश कुमार, तेजस्वी यादव की PK...कुणाला मुख्यमंत्री म्हणून मिळाली पहिली पसंती?
4
"चीन अमेरिकेला मागे टाकणार, तिसरं महायुद्ध, अन्...!"; 2026 साठी बाबा वेंगाची भविष्यवाणी, भारतासह जागात काय-काय घडणार?
5
जगात पहिल्यांदा 'ड्रोन वॉल' बनणार; रशियाला घाबरुन २७ देशांनी निर्णय घेतला, जाणून घ्या कसे करणार काम
6
'अनेकदा संघाला संपवण्याचे प्रयत्न झाले, तरीही संघ वटवृक्षासारखा ठाम उभा आहे'- PM नरेंद्र मोदी
7
Pune Viral Video: केस पकडले, कमरेत लाथा मारल्या; पुण्यात भररस्त्यात तरुणीला मारहाण; घटनेचा व्हिडीओ व्हायरल
8
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शतकपूर्तीनिमित्त सरकाने प्रसिद्ध केलं विशेष नाणं आणि टपाल तिकीट, मोदी म्हणाले...
9
Viral Video: लोकलमध्ये नवरात्रीचा जल्लोष! 'एक नंबर, तुझी कंबर' गाण्यावर महिलांचा जबरदस्त डान्स
10
'मैत्रीमुळे विचारधारा सोडली, असे होत नाही.. ' संघाच्या निमंत्रण पत्रिकेवर न्यायाधीशांच्या आईचे नाव असल्याने वाद !
11
भोजपुरी अभिनेता पवन सिंह भाजपात; "जीवे मारले तरी मराठी बोलणार नाही", या विधानावरून झाला होता वाद
12
Asia Cup 2025 : ट्रॉफी द्या, अन्यथा..; BCCI ने मोहसिन नकवींना दिला ७२ तासांचा अल्टिमेटम
13
३० वर्षांनी शुभ दसरा २०२५: ७ राजयोगात १० राशींना भरपूर लाभ, भरघोस यश-पैसा; सुख-सुबत्ता काळ!
14
पैशाचा खेळ! ऑनलाईन सेलचं धक्कादायक सत्य; घाईत महागड्या वस्तुंची खरेदी, बेस्ट डील कोणती?
15
GST कपात व्यतिरिक्त नवीन गाडी घेताना १५ हजारांची करा बचत! खरेदी करण्यापूर्वी वापरा 'या' ५ स्मार्ट टिप्स!
16
इस्रायलवर भारताचे मोठे उपकार! १०० वर्षांनी समोर आलं 'हाइफा' शहराच्या इतिहासातील सत्य, काय घडलं?
17
जीएसटी की जय हो...! मारुती दोन लाखांचा आकडा टच करता करता राहिली; टाटा घुटमळली, महिंद्रा, एमजीचे काय...
18
कपडे खराब होऊ नयेत..; पूरग्रस्त पाण्यात अन् खासदार बजरंग सोनवणे होडीवर, VIDEO व्हायरल
19
Rakhi Sawant : Video - "डोनाल्ड ट्रम्प माझे खरे वडील, मी तान्या मित्तलपेक्षा श्रीमंत..."; राखी सावंतचा मोठा दावा
20
लिस्टिंगसोबतच शेअर विकण्यासाठी गुंतवणूकदारांच्या रांगा, पहिल्याच दिवशी मोठं नुकसान; लागलं लोअर सर्किट

सरकारच्या घोषणांची काँग्रेसकडून वरात

By admin | Updated: May 27, 2015 00:05 IST

आघाडी सरकारचा एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानिमित्त काँग्रेसतर्फे मंगळवारी दिल्लीसह देशभरात आंदोलनाद्वारे सरकारच्या धोरणांना विरोध करण्यात आला.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारचा एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानिमित्त काँग्रेसतर्फे मंगळवारी दिल्लीसह देशभरात आंदोलनाद्वारे सरकारच्या धोरणांना विरोध करण्यात आला. दिल्लीत युवक काँग्रेसने मोदी सरकारच्या घोषणांची वरात काढली. सरकारच्या विविध घोषणांचे फलक घेऊन कार्यकर्ते या वरातीत सहभागी झाले होते. दिल्ली प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अजय माकन यांच्या नेतृत्वात काँग्रेस कार्यकर्त्यांनी जंतरमंतर येथे मोदी व मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध नारेबाजी करून त्यांचे पुतळे जाळले. गुजरातेत कार्यकर्ते ताब्यातअहमदाबादेत सत्ताधारी पार्टीच्या शहर कार्यालयाबाहेर व भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या जुन्या निवासस्थानाजवळ केंद्र सरकारविरुद्ध निदर्शने करणाऱ्या काँग्रेसच्या दोनशेवर कार्यकर्त्यांना काही काळासाठी ताब्यात घेण्यात आले. लखनौमध्ये पुतळा जाळलाउत्तर प्रदेश युवक काँग्रेसने मोदी सरकारला वर्षभराच्या कार्यकाळात आलेल्या अपयशांचा लेखाजोखा जनतेपुढे मांडण्यासाठी लखनौ येथील विधानभवनासमोर सूटबूट घालून मोर्चा काढला आणि पंतप्रधान मोदी यांच्या पुतळ्याचे दहन केले. दरम्यान, जम्मू-काश्मीर युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोदी सरकारला प्रत्येक आघाडीवर आलेले अपयश उघड करण्यासाठी जम्मूतील प्रेस क्लबपुढे सूटबूट घालून निदर्शने करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी हातात फलक घेऊन जोरदार नारेबाजी केली. युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रणव शगोत्रा यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.४गत दहा वर्षांत आपल्या सरकारचे रिपोर्ट कार्ड जारी करणाऱ्या काँग्रेसने यावेळी विरोधी बाकांवरून मोदी सरकारच्या वर्षभरातील कामगिरीचे मूल्यांकन करीत, गत वर्षभरात रालोआ सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरल्याचा दावा केला.४मंगळवारी काँग्रेसने ‘एक साल, देश बदहाल, ये है सूट-बूट की सरकार’ या शीर्षकाखाली मोदी सरकारचे रिपोर्ट कार्ड जारी केले. ४काँग्रेस मुख्यालयात एका मॅराथॉन पत्रपरिषदेत गुलाम नबी आझाद, मल्लिकार्जुन खर्गे, रणदीप सुरजेवाला आदी काँग्रेस नेत्यांनी यानिमित्ताने भाजप आणि मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. मोदी सरकार एक इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी आहे. यात सरकार नावाची कुठलीही गोष्ट नाही. सरकारने काम केले असते तर ते दाखवले असते. पण पंतप्रधान मोदी हे तर केवळ चित्रपटाचे प्रयोग करीत सुटले आहेत, अशी टीका या नेत्यांनी केली. बडेजाव, खोटी आश्वासने, शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष अशा प्रकारचे सात मुद्दे ऐकवत, मोदी सरकार देशातील जनतेची फसवणूक करीत असल्याचा आरोप काँग्रेसने यावेळी केला. याबाबतचे कागदोपत्री पुरावेही काँग्रेसने दिले. मोदी, राजनाथसिंग, अरुण जेटलीसह भाजपाचे नेते निवडणुकीआधी काय बोलत होते आणि आता काय बोलत आहेत, हे दाखवणारा एक लघुपटही काँग्रेसने यावेळी प्रसारित केला.बॉक्स-मल्लिकार्जून खर्गे यांनी भाजपाच्या निवडणूक जाहीरनाम्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.‘मटकल में वो आते हैं खंजर बदल -बदल कर , या रब मैं कहाँ से लाऊँ सर बदल -बदल कर ’अशा शब्दांत त्यांनी मोदी सरकारवर उपहासात्मक बाण सोडले.- राजकारणापासून गुन्हेगारांना दूर ठेवल्याचा दावा मोदी सरकार करते. पण सरकारच्या २० मंत्र्यांवर गंभीर फौजदारी गुन्हे आहे,असा आरोपही काँग्रेसने केला.४मोदी सरकारचे अनेक चेहरे आहेत, जे वेळोवेळी बदलतात. महागाई संपली असे सरकार म्हणते, असे असेल तर डाळी, दूध, फळे, मांस, रेल्वे भाडे महाग का? असा सवाल गुलाम नबी आझाद यांनी केला.