शहरं
Join us  
Trending Stories
1
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
2
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
3
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
4
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
5
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
6
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
7
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
8
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
9
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
10
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
11
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
12
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
13
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
14
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
15
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
16
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
17
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
18
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

व्यवसायात मिळाले अफाट यश; आता तिरुपती बालाजी मंदिरात करणार १४० कोटींचे दान...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 17:53 IST

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी सांगितले की, एक भाविक बालाजी मंदिरात १४० कोटींचे दान करणार आहे.

अमरावती: तिरुपतीमधील श्री बालाजी मंदिरात भाविक दररोज लाखो रुपयांचे दान करतात. कुणी रोख रक्कम दान करतो, तर कुणी सोन्या-चांदिचे दागिने दान करतो. आता एका भाविकाने मंदिरात तब्बल १४० कोटी रुपयांचे १२१ किलो सोने दान करण्याचा निर्णय घेतला आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी मंगळवारी ही माहिती दिली. हा भाविक आपल्या व्यवसायातील यशाबद्दल देवाचे आभार मानण्यासाठी हे दान करणार आहे. या भक्ताचे नाव आणि इतर माहिती गुप्त ठेवण्यात आली आहे. 

व्यवसायात मिळाले प्रचंड यशमंगलागिरी येथील 'गरिबी निर्मूलन' कार्यक्रमात बोलताना नायडू म्हणाले की, या भाविकाने स्वतःची कंपनी सुरू करण्याचे स्वप्न पाहिले होते. भगवान वेंकटेश्वर स्वामींच्या कृपेने फक्त कंपनीच स्थापन झाली नाही, तर त्यांना मोठे यशही मिळाले. या भाविकाने आपल्या यशाचे श्रेय देवाला देण्याचे ठरवले. म्हणूनच, आता ते १२१ किलो सोने वेंकटेश्वर स्वामींना अर्पण करत आहेत. 

बालाजीची सोन्याच्या दागिन्यांनी सजवली जाणारनायडू पुढे म्हणाले की, या भक्ताने आपल्या कंपनीचे ६० टक्के शेअर्स विकून १.५ अब्ज अमेरिकन डॉलर्स कमावले आहेत. त्यामुळेच आता आपल्या संपत्तीचा काही भाग देवाला समर्पित करू इच्छितात. भगवान वेंकटेश्वर स्वामींची मूर्ती दररोज सुमारे १२० किलो सोन्याच्या दागिन्यांनी सजवली जाते. जेव्हा या भक्ताला हे कळले, तेव्हा त्यांनी १२१ किलो सोने दान करण्याचा निर्णय घेतला.

दरवर्षी लाखो भाविक तिरुपतीला भेट देतातभगवान वेंकटेश्वर स्वामींचे मंदिर आंध्र प्रदेशातील तिरुपती येथे आहे. हे जगातील सर्वात प्रसिद्ध आणि श्रीमंत मंदिरांपैकी एक मानले जाते. हे मंदिर भगवान विष्णूचे अवतार वेंकटेश्वर यांना समर्पित आहे. दरवर्षी लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात. मंदिर त्याच्या भव्यतेसाठी, आध्यात्मिक महत्त्वासाठी आणि देणगीच्या परंपरेसाठी ओळखले जाते. भाविक दरवर्षी या मंदिरात अब्जावधी रुपयांचे सोने, चांदी आणि रोख रक्कम अर्पण करतात.

टॅग्स :tirupati balaji mandirतिरुपती बालाजी मंदिर, राजूरघाटAndhra Pradeshआंध्र प्रदेशChandrababu Naiduचंद्राबाबू नायडू