शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
4
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
5
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
6
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
7
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
8
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
9
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
10
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
11
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
12
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
13
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
14
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
15
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
16
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
17
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
18
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
19
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
20
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप

गोरखा जनमुक्ती मोर्चा 29 ऑगस्ट रोजी प.बंगाल सरकारशी चर्चा करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2017 15:54 IST

प. बंगालच्या एका सरकारी अधिकाऱ्याने या चर्चेसाठी गोरखा जनमुक्ती मोर्चाला आमंत्रण दिल्याचे सांगितले. तसेच जेएपी, जीएनएलएफ, एबीजीएलसारख्या इतर पक्षांनाही चर्चेला बोलावल्याचे सांगितले.

ठळक मुद्देगोरखालॅंडच्या आंदोलनामुळे दार्जिलिंगमधील पर्यटन व्यवसाय ठप्प झाला असून हॉटेलही ओस पडली आहेत. सिलिगुडी येथील अत्यंत चिंचोळ्या पट्टीने ईशान्य भारत हा उर्वरीत भारताशी जोडलेले आहे. हे आंदोलन याच परिसरामध्ये सुरु आहे.

कोलकाता, दि. 26- 29 ऑगस्टरोजी पश्चिम बंगाल सरकारने बोलावलेल्या बैठकीसाठी गोरख जनमुक्ती मोर्चाचे नेते उपस्थित राहणार आहेत. प. बंगाल सरकारकडून चर्चेसाठी अधिकृत आमंत्रण आल्यानंतर गोरखा जनमुक्तीने आज हा निर्णय घेतला आहे.'आम्हाला काल रात्री चर्चेचे आमंत्रण मिळाले आहे आणि त्या बैठकीला उपस्थित राहण्याचे आम्ही ठरवले आहे. गोरखा जनमुक्तीच्या ज्येष्ठ नेत्यांचे शिष्टमंडळ त्यासाठी उपस्थित राहिल. परंतु शिष्टमंडळात कोणकोणते सदस्य असतील हे अद्याप निश्चित केलेले नाही' असे गोरखा जनमुक्तीचे ज्येष्ठ नेते अमर सिंग राय यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.प. बंगालच्या एका सरकारी अधिकाऱ्याने या चर्चेसाठी गोरखा जनमुक्ती मोर्चाला आमंत्रण दिल्याचे सांगितले. तसेच जेएपी, जीएनएलएफ, एबीजीएलसारख्या इतर पक्षांनाही चर्चेला बोलावल्याचे सांगितले. गोरखा हिल्स परिसरामध्ये परिस्थिती सुरळीत व्हावी यासाठी जीएनएलएफने प.बंगाल सरकारकडे चर्चेची विनंती केली होती. त्यानंतर 29 ऑगस्ट रोजी चर्चेसाठी सर्वांना आमंत्रित करण्यात आले. जर अधिकृत आमंत्रण आले तरच चर्चेला येऊ अशी अट गोरखा जनमुक्ती मोर्चाने ठेवली होती. आम्हाला आमंत्रण आलं आहे, त्यामुळे चर्चा करण्यास काहीच हरकत नाही असं गोरखा जनमुक्तीचे ज्येष्ठ नेते म्हणत आहेत.

चीनची नजर सिक्कीमवर की गोरखालॅंडवर ?

गोरखालॅंड आंदोलनामुळे चहाच्या दराला उकळी

गोरखालॅंडच्या मागणीमुळे दार्जिलिंग अशांत आहे. चिकन्स नेक म्हणून ओळखला जाणारा सिलिगुडी कॉरिडॉर येथे आहे. एका बाजूला सिक्किम राज्याची सीमा, दुसरीकडे भूटान, नेपाळ आणि एका बाजूस बांगलादेश असल्यामुळे या चिंचोळ्या पट्टीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. संपुर्ण इशान्य भारताला जोडणाऱ्या या पट्टीवर आणि दार्जिलिंगमध्येच अशांतता निर्माण झाल्यामुळे गोरखालॅंडमुळे येथील प्रदेशाची सुरक्षा अधिकच नाजूक झालेली आहे. गोरखालॅंडच्या आंदोलनामुळे दार्जिलिंगमधील पर्यटन व्यवसाय ठप्प झाला असून हॉटेलही ओस पडली आहेत. राष्ट्रीय महामार्ग 10 हा रस्ता सिक्कीमसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. परंतु आंदोलनामुळे सिक्कीमच्या जनजीवनावर परिणाम होत आहे. याबाबत सिक्कीमचे मुख्यमंत्री पवन चॅमलिंग यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती.