शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

गोरखा जनमुक्ती मोर्चा 29 ऑगस्ट रोजी प.बंगाल सरकारशी चर्चा करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2017 15:54 IST

प. बंगालच्या एका सरकारी अधिकाऱ्याने या चर्चेसाठी गोरखा जनमुक्ती मोर्चाला आमंत्रण दिल्याचे सांगितले. तसेच जेएपी, जीएनएलएफ, एबीजीएलसारख्या इतर पक्षांनाही चर्चेला बोलावल्याचे सांगितले.

ठळक मुद्देगोरखालॅंडच्या आंदोलनामुळे दार्जिलिंगमधील पर्यटन व्यवसाय ठप्प झाला असून हॉटेलही ओस पडली आहेत. सिलिगुडी येथील अत्यंत चिंचोळ्या पट्टीने ईशान्य भारत हा उर्वरीत भारताशी जोडलेले आहे. हे आंदोलन याच परिसरामध्ये सुरु आहे.

कोलकाता, दि. 26- 29 ऑगस्टरोजी पश्चिम बंगाल सरकारने बोलावलेल्या बैठकीसाठी गोरख जनमुक्ती मोर्चाचे नेते उपस्थित राहणार आहेत. प. बंगाल सरकारकडून चर्चेसाठी अधिकृत आमंत्रण आल्यानंतर गोरखा जनमुक्तीने आज हा निर्णय घेतला आहे.'आम्हाला काल रात्री चर्चेचे आमंत्रण मिळाले आहे आणि त्या बैठकीला उपस्थित राहण्याचे आम्ही ठरवले आहे. गोरखा जनमुक्तीच्या ज्येष्ठ नेत्यांचे शिष्टमंडळ त्यासाठी उपस्थित राहिल. परंतु शिष्टमंडळात कोणकोणते सदस्य असतील हे अद्याप निश्चित केलेले नाही' असे गोरखा जनमुक्तीचे ज्येष्ठ नेते अमर सिंग राय यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.प. बंगालच्या एका सरकारी अधिकाऱ्याने या चर्चेसाठी गोरखा जनमुक्ती मोर्चाला आमंत्रण दिल्याचे सांगितले. तसेच जेएपी, जीएनएलएफ, एबीजीएलसारख्या इतर पक्षांनाही चर्चेला बोलावल्याचे सांगितले. गोरखा हिल्स परिसरामध्ये परिस्थिती सुरळीत व्हावी यासाठी जीएनएलएफने प.बंगाल सरकारकडे चर्चेची विनंती केली होती. त्यानंतर 29 ऑगस्ट रोजी चर्चेसाठी सर्वांना आमंत्रित करण्यात आले. जर अधिकृत आमंत्रण आले तरच चर्चेला येऊ अशी अट गोरखा जनमुक्ती मोर्चाने ठेवली होती. आम्हाला आमंत्रण आलं आहे, त्यामुळे चर्चा करण्यास काहीच हरकत नाही असं गोरखा जनमुक्तीचे ज्येष्ठ नेते म्हणत आहेत.

चीनची नजर सिक्कीमवर की गोरखालॅंडवर ?

गोरखालॅंड आंदोलनामुळे चहाच्या दराला उकळी

गोरखालॅंडच्या मागणीमुळे दार्जिलिंग अशांत आहे. चिकन्स नेक म्हणून ओळखला जाणारा सिलिगुडी कॉरिडॉर येथे आहे. एका बाजूला सिक्किम राज्याची सीमा, दुसरीकडे भूटान, नेपाळ आणि एका बाजूस बांगलादेश असल्यामुळे या चिंचोळ्या पट्टीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. संपुर्ण इशान्य भारताला जोडणाऱ्या या पट्टीवर आणि दार्जिलिंगमध्येच अशांतता निर्माण झाल्यामुळे गोरखालॅंडमुळे येथील प्रदेशाची सुरक्षा अधिकच नाजूक झालेली आहे. गोरखालॅंडच्या आंदोलनामुळे दार्जिलिंगमधील पर्यटन व्यवसाय ठप्प झाला असून हॉटेलही ओस पडली आहेत. राष्ट्रीय महामार्ग 10 हा रस्ता सिक्कीमसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. परंतु आंदोलनामुळे सिक्कीमच्या जनजीवनावर परिणाम होत आहे. याबाबत सिक्कीमचे मुख्यमंत्री पवन चॅमलिंग यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती.