शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

गोरखा जनमुक्ती मोर्चा 29 ऑगस्ट रोजी प.बंगाल सरकारशी चर्चा करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2017 15:54 IST

प. बंगालच्या एका सरकारी अधिकाऱ्याने या चर्चेसाठी गोरखा जनमुक्ती मोर्चाला आमंत्रण दिल्याचे सांगितले. तसेच जेएपी, जीएनएलएफ, एबीजीएलसारख्या इतर पक्षांनाही चर्चेला बोलावल्याचे सांगितले.

ठळक मुद्देगोरखालॅंडच्या आंदोलनामुळे दार्जिलिंगमधील पर्यटन व्यवसाय ठप्प झाला असून हॉटेलही ओस पडली आहेत. सिलिगुडी येथील अत्यंत चिंचोळ्या पट्टीने ईशान्य भारत हा उर्वरीत भारताशी जोडलेले आहे. हे आंदोलन याच परिसरामध्ये सुरु आहे.

कोलकाता, दि. 26- 29 ऑगस्टरोजी पश्चिम बंगाल सरकारने बोलावलेल्या बैठकीसाठी गोरख जनमुक्ती मोर्चाचे नेते उपस्थित राहणार आहेत. प. बंगाल सरकारकडून चर्चेसाठी अधिकृत आमंत्रण आल्यानंतर गोरखा जनमुक्तीने आज हा निर्णय घेतला आहे.'आम्हाला काल रात्री चर्चेचे आमंत्रण मिळाले आहे आणि त्या बैठकीला उपस्थित राहण्याचे आम्ही ठरवले आहे. गोरखा जनमुक्तीच्या ज्येष्ठ नेत्यांचे शिष्टमंडळ त्यासाठी उपस्थित राहिल. परंतु शिष्टमंडळात कोणकोणते सदस्य असतील हे अद्याप निश्चित केलेले नाही' असे गोरखा जनमुक्तीचे ज्येष्ठ नेते अमर सिंग राय यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.प. बंगालच्या एका सरकारी अधिकाऱ्याने या चर्चेसाठी गोरखा जनमुक्ती मोर्चाला आमंत्रण दिल्याचे सांगितले. तसेच जेएपी, जीएनएलएफ, एबीजीएलसारख्या इतर पक्षांनाही चर्चेला बोलावल्याचे सांगितले. गोरखा हिल्स परिसरामध्ये परिस्थिती सुरळीत व्हावी यासाठी जीएनएलएफने प.बंगाल सरकारकडे चर्चेची विनंती केली होती. त्यानंतर 29 ऑगस्ट रोजी चर्चेसाठी सर्वांना आमंत्रित करण्यात आले. जर अधिकृत आमंत्रण आले तरच चर्चेला येऊ अशी अट गोरखा जनमुक्ती मोर्चाने ठेवली होती. आम्हाला आमंत्रण आलं आहे, त्यामुळे चर्चा करण्यास काहीच हरकत नाही असं गोरखा जनमुक्तीचे ज्येष्ठ नेते म्हणत आहेत.

चीनची नजर सिक्कीमवर की गोरखालॅंडवर ?

गोरखालॅंड आंदोलनामुळे चहाच्या दराला उकळी

गोरखालॅंडच्या मागणीमुळे दार्जिलिंग अशांत आहे. चिकन्स नेक म्हणून ओळखला जाणारा सिलिगुडी कॉरिडॉर येथे आहे. एका बाजूला सिक्किम राज्याची सीमा, दुसरीकडे भूटान, नेपाळ आणि एका बाजूस बांगलादेश असल्यामुळे या चिंचोळ्या पट्टीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. संपुर्ण इशान्य भारताला जोडणाऱ्या या पट्टीवर आणि दार्जिलिंगमध्येच अशांतता निर्माण झाल्यामुळे गोरखालॅंडमुळे येथील प्रदेशाची सुरक्षा अधिकच नाजूक झालेली आहे. गोरखालॅंडच्या आंदोलनामुळे दार्जिलिंगमधील पर्यटन व्यवसाय ठप्प झाला असून हॉटेलही ओस पडली आहेत. राष्ट्रीय महामार्ग 10 हा रस्ता सिक्कीमसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. परंतु आंदोलनामुळे सिक्कीमच्या जनजीवनावर परिणाम होत आहे. याबाबत सिक्कीमचे मुख्यमंत्री पवन चॅमलिंग यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती.