शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

गोरखपूर तुमचा खासगी पिकनिट स्पॉट नाही; योगी आदित्यनाथ यांची राहुल गांधींवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2017 12:46 IST

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या गोरखपूर दौऱ्याच्या आधीच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राहुल गांधींवर टीका केली आहे.

ठळक मुद्देकाँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या गोरखपूर दौऱ्याच्या आधीच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राहुल गांधींवर टीका केली आहे. गोरखपूर सहलीचं ठिकाण नसल्याची टीका योगी आदित्यनाथ यांनी केली आहे.गोरखपूरमधील या कार्यक्रमाच्या मंचावरून योगी आदित्यनाथ यांनी पूर्वीच्या सरकारवरही कडाडून टीका केली.

गोरखपूर, दि. 19- काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या गोरखपूर दौऱ्याच्या आधीच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राहुल गांधींवर टीका केली आहे. गोरखपूर सहलीचं ठिकाण नसल्याची टीका योगी आदित्यनाथ यांनी केली आहे. दिल्लीमध्ये बसलेले कुणी युवराज आणि लखनऊमध्ये बसलेले कोणतेही युवराज स्वच्छता अभियानाचं महत्त्व समजू शकत नाही. आम्ही उत्तर प्रदेशला पिकनिक स्पॉट बनविण्याची परवानगी देऊ शकत नाही. स्वच्छ आणि सुंदर उत्तर प्रदेश बनवायची गरज आहे, असं योगी आदित्यनाथ यांनी म्हंटलं आहे. 

गोरखपूरमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 'स्वच्छ यूपी, स्वस्थ यूपी' या मोहिमेची सुरूवात केली. यावेळी आदित्यनाथ यांनी माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यावरही निशाणा साधला. गोरखपूरमध्ये मुलांच्या झालेल्या मृत्यूच्या घटनेचा उल्लेख न करता त्यांनी राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्यावर टीका केली. दिल्लीमध्ये बसलेले युवराज आणि लखनऊमधील कुणी पुत्र हे दुःख समजू शकत नाही, असं योगी आदित्यनाथ म्हणाले. गोरखपूरच्या बीआरडी रूग्णालयात ऑक्सिजनचा पुरवठा न झाल्याने मुलांच्या झालेल्या मृत्यूच्या घटनेनंतर राजकीय नेत्यांच्या गोरखपूर दौऱ्यावर आदित्यनाथ टीका करताना दिसले. गोरखपूरला पिकनिक स्पॉट बनू देणार नाही, असं योगी आदित्यनाथ यांनी ठणकावून सांगितलं. 

गोरखपूरमधील या कार्यक्रमाच्या मंचावरून योगी आदित्यनाथ यांनी पूर्वीच्या सरकारवरही कडाडून टीका केली. गेल्या 12-15 वर्षात इथल्या सरकारने आपल्या स्वार्थासाठी भ्रष्टाचार करून उत्तर प्रदेशाला बर्बाद केलं आहे. आधीच्या सरकारच्या भ्रष्टाचारी कारभारामुळे इथे आजारपण वाढलं आहे. उत्तर प्रदेशला स्वच्छ आणि आरोग्यदायी बनविण्यासाठी सर्वसामान्य जनतेच्या सहभागाची गरज आहे. ज्या दिवशी प्रत्येक व्यक्ती स्वच्छता अभियानाला त्यांच्या जीवनाचा एक भाग बनवेल त्या दिवशी उत्तर प्रदेश रोगमुक्त होईल, असं योगी आदित्यनाथ यांनी म्हंटलं आहे. 

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी शनिवारी गोरखपूरच्या दौऱ्यावर आहेत. काहीवेळा पूर्वीच ते गोरखपूरमध्ये दाखल झाले. राहुल गांधींच्या या दौऱ्यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. गोरखपूरमधील बीआरडी हॉस्पिटलमध्ये मृत्यू झालेल्या मुलांच्या कुटुंबियांची राहुल गांधी भेट घेणार आहेत तसंच ते बीआरडी हॉस्पिटलमध्येही जाणार आहेत.  

टॅग्स :Gorakhpurगोरखपूर