शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधकांचे अर्ज ठरवून बाद करायचे आणि महायुतीचे बिनविरोध विजयी करायचे हे षडयंत्र, मनसेचा आरोप
2
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू व्यक्तीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, पेट्रोल टाकून केला हल्ला
3
मराठी की हिंदू, महापौर कोण होणार? भाजपा नेते कृपाशंकर सिंह पुन्हा बोलले; "मुंबईचा महापौर..."
4
Arjun Tendulkarचा विजय हजारे स्पर्धेत फ्लॉप शो; ३ सामने खेळून झाले, तरी एकही विकेट मिळेना
5
केवळ १६ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा १ कोटींहून अधिक परतावा; SIP ठरतेय वरदान, सोपं गणित पाहा
6
KDMC Election 2026: कल्याण डोंबिवलीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे ३ उमेदवार बिनविरोध विजयी; प्रभाग २४मध्ये जल्लोष
7
संघर्षाची गाथा! वडिलांची नोकरी गेली; मोमोज विकत लेकीने NEET क्रॅक केली, आता होणार डॉक्टर
8
१५ ऑगस्ट… बुलेट ट्रेन मुहूर्त ठरला! पहिला रुट कोणता, मुंबईत कधी सुरू होणार? मोठी माहिती समोर
9
GST संकलनातून भरली सरकारची तिजोरी; डिसेंबरमध्ये 6% वाढीसह ₹1.74 लाख कोटी पार...
10
Municipal Election 2026: भाजपाचा विजयरथ सुसाट! मतदानाआधी ११ उमेदवार बिनविरोध जिंकले, कुठे-कुठे फुलले कमळ?
11
पुण्यात भाजपाला धक्का, अधिकृत उमेदवाराने अर्ज घेतला मागे; माघारीनंतर पूजा मोरेंना अश्रू अनावर
12
Vastu Tips : नवीन वर्षाचे कॅलेंडर या दिशेला ठेवू नका; नाही तर अडचणी येऊ शकतात
13
Ahilyanagar Election 2025: मतदानाआधीच 'बिनविरोध' निकालांचा पाऊस; अहिल्यानगरमध्ये अजित पवारांचे दोन उमेदवार विजयी
14
ठरले! स्लीपर वंदे भारत ‘या’ तारखेपासून प्रवासी सेवेत, तिकीट दरही आले; PM मोदी करणार लोकार्पण
15
या देशात पत्र पाठवण्याची सेवा बंद, ४०१ वर्षांची परंपरा संपली; असे करणारा जगातील पहिलाच देश ठरला
16
२०२६ मध्ये राज्यसभेतील गणित बदलणार; महाराष्ट्रातील एका जागेसह ७५ जागांचं भवितव्य ठरणार
17
आयटी रिटर्नची मुदत संपली तरी आशा कायम! 'या' मार्गाने मिळवू शकता रखडलेला टॅक्स रिफंड
18
निवडणुकीसाठी अपक्षांना पाव, वाटाणे अन् अक्रोड अशी १९४ मुक्त चिन्हे, 'रिक्षा' चिन्हाची मोठी मागणी
19
AI दिसत नाही, पण आहे सर्वत्र! आपल्या रोजच्या आयुष्यात AI ने नेमकं काय बदललं?
20
नवीन वर्षाच्या पार्टीदरम्यान बारमध्ये भीषण स्फोट, १० जणांचा होरपळून मृत्यू, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

उत्तम रस्ते, जल वाहतुकीला प्राधान्य देणार

By admin | Updated: May 30, 2014 03:15 IST

उत्तम रस्ते व जल वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्यास आपले प्राधान्य राहणार असल्याची ग्वाही केंद्रीय रस्ते व जलवाहतूक, जहाज आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे

नवी दिल्ली : उद्योग आणि शेती हा देशाचा प्राण असून या क्षेत्रांच्या विकासासाठी उत्तम रस्ते व जल वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्यास आपले प्राधान्य राहणार असल्याची ग्वाही केंद्रीय रस्ते व जलवाहतूक, जहाज आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. संसद भवनासमोरील परिवहन भवनाच्या इमारतीत असणार्‍या या रस्ते व जलवाहतूक, जहाज आणि महामार्ग मंत्रालयात गुरुवारी सकाळी ८ वाजता नितीन गडकरी आणि या विभागाचे राज्यमंत्री क्रि शन पाल यांनी पदभार स्वीकारला त्यावेळी गडकरी यांच्या पत्नी कांचन, मुलगी केतकी यांच्यासह महामार्ग मंत्रालयाचे सचिव व अन्य वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. पदभार स्वीकारल्यानंतर पत्रकारांशी बोलताना गडकरी म्हणाले उद्योग आणि शेतीवर देशाचा विकास अवलंबून असून यासाठी पाणी, ऊर्जा, उत्तम संवाद व्यवस्था आणि वाहतूक व्यवस्था निर्माण करणे गरजेचे आहे. याआधी महाराष्ट्रात मंत्रिपदी असताना राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण, उड्डाण पूल, वरळी-बांद्रा समुद्री पूल (सी लिंक), पंतप्रधान ग्राम सडक योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याचा आपल्याला अनुभव असून आता देशातील रस्ते, नद्या व समुद्रातील जलवाहतूक व्यवस्था प्रशस्त करण्याची जबाबदारी आपल्याकडे आहे. आपल्या मंत्रालयात पारदर्शी, ई-गव्हर्नन्स आणि पक्षपातविरहित कारभार ठेवत आपण या पदाला साजेशी कामगिरी करणार असा विश्वासही गडकरी यांनी व्यक्त केला. (लोकमत न्यूज नेटवर्क)