शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

खूशखबर! भारतीयांना व्हिसा तातडीने मिळणार; अमेरिका मैत्री निभावणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2022 06:42 IST

अमेरिकेच्या राजदूत एलिझाबेथ यांची माहिती, कोविड काळामुळे अमेरिका व्हिसाची प्रक्रिया थंडावली होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर भारतीयांना व्हिसाची प्रतीक्षा आहे.

मुंबई : भारतीय नागरिकांना अमेरिकेचा व्हिसा मिळावा तसेच व्हिसा मिळण्याच्या प्रक्रियेतील विलंब कमी व्हावा याकरिता अमेरिका प्राधान्याने काम करत आहे. किंबहुना, व्हिसाच्या मुद्द्यावर भारत हा देश आमच्या जागतिक प्राधान्यक्रमातील एक असल्याची माहिती अमेरिकेच्या भारतातील राजदूत एलिझाबेथ जोन्स यांनी दिली. मंगळवारी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला.

कोविड काळामुळे अमेरिका व्हिसाची प्रक्रिया थंडावली होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर भारतीयांना व्हिसाची प्रतीक्षा आहे. यामध्ये विविध श्रेणीतील व्हिसा आहेत. व्हिसाचे काम आता सुरू झाले असले तरी अद्यापही प्रतीक्षा यादी आणि विलंब होत आहे. मात्र, या मुद्यावर तोडगा काढण्यासाठी मोठ्या प्रमाणावर व्हिसा कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे. तसेच, व्हिसासाठी आवश्यक बॅक ऑफिस कामासाठी भारताबाहेरील अमेरिकी कर्मचाऱ्यांचीदेखील मदत घेत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, पुढील वर्षी आतापर्यंतच्या तुलनेत सर्वाधिक व्हिसा कर्मचारी संख्या भारतात असेल, असेही एलिझाबेथ जोन्स यांनी सांगितले. 

जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला भारत व जगातील सर्वात जुनी लोकशाही व्यवस्था असलेला अमेरिका देश हे आता एकमेकांचे नैसर्गिक भागीदार आहेत. त्यामुळे नवीन उद्योग, विकासात्मक कामे आदी मुद्यांवर दोन्ही देश एकत्रितपणे काम करत असून याचा मोठा फायदा होईल, असेही मत त्यांनी व्यक्त केले. 

उद्योजकांशी चर्चा  मुंबई दौऱ्यावर असलेल्या एलिझाबेथ यांनी काही प्रमुख उद्योजकांशीदेखील चर्चा केली. भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांना कोणत्या क्षेत्रात एकत्र काम करण्याची संधी आहे, कोणत्या क्षेत्रात गुंतवणूक करण्याची गरज आहे याचा आढावा घेऊन त्या दृष्टीने काम सुरू असल्याचेही त्या म्हणाल्या.

टॅग्स :AmericaअमेरिकाIndiaभारत