शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

सर्वांना वीज देणारी 'सौभाग्य' योजना 25 सप्टेंबरला होणार सुरू; ऊर्जामंत्र्यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2017 22:11 IST

देशातील नागरिकांना २४ तास वीज पुरवठा करण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २५ सप्टेंबरला नवीन 'सौभाग्य' योजना सुरू करणार आहेत.

ठळक मुद्देदेशातील नागरिकांना २४ तास वीज पुरवठा करण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २५ सप्टेंबरला नवीन 'सौभाग्य' योजना सुरू करणार आहेत. केंद्रीय ऊर्जामंत्री आर. के, सिंह यांनी या संदर्भातील माहिती दिली आहे. ही योजना नेमकी कशी असेल? याबद्दल आ.के सिंह यांनी सविस्तर सांगण्यास नकार दिला.

नवी दिल्ली, दि. 23- देशातील नागरिकांना २४ तास वीज पुरवठा करण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २५ सप्टेंबरला नवीन 'सौभाग्य' योजना सुरू करणार आहेत. केंद्रीय ऊर्जामंत्री आर. के, सिंह यांनी या संदर्भातील माहिती दिली आहे. २५ सप्टेंबरला आरएसएसचे ज्येष्ठ नेते आणि जनसंघाचे संस्थापक सदस्य दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती आहे. याच दिवशी मोदींकडून 'सौभाग्य' योजना सुरू केली जाणार आहे. ही योजना नेमकी कशी असेल? याबद्दल आ.के सिंह यांनी सविस्तर सांगण्यास नकार दिला. पण या योजनेअंतर्गत डिसेंबरपर्यंत देशातील सर्व गावांमध्ये वीज पोहोचविण्याचा उपक्रम सुरू केला जाईल, अशी चर्चा सध्या सुरू आहे.

प्रत्येक गावात वीज पोहोचावी यासाठी राज्य सरकारांनी आपल्या योजना तयार कराव्यात अशा सूचना केंद्र सरकारने दिल्या आहेत, असंही आर. के. सिंह यांनी म्हटलं आहे. या योजनांसाठी केंद्राने सहमती दर्शवल्यानंतर निधीचा पुरवठाही केला जाणार आहे. या योजनेअंतर्गत ट्रान्स्फॉर्मर, मीटर आणि तारांसाठी सवलतही देण्यात येणार आहे. या योजनेचं नाव 'सौभाग्य' असं असणार आहे. या आठवड्यात पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीच्या अजेंड्यात या योजनेचाही समावेश होता, अशी माहिती सुत्रांकडून मिळते आहे.

गावागावांमध्ये वीज पोहोचविण्यासाठी सरकार जलद गतीने काम करत आहे. तसंच सर्वांना २४ तास वीजपुरवठा व्हावा, यासाठी सरकारने २०१९चं लक्ष्य निश्चित केलं आहे. वीज खरेदी करण्याशी संबंधीत कायदा अधिक कडक करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचंही ऊर्जामंत्री आर.के सिंह यांनी म्हंटलं आहे. या वर्षाच्या अखेरीपर्यंत २० हजार मेगावॉट वीज वायू ऊर्जेपासून, तर २० हजार मेगावॉट वीज सौर ऊर्जेपासून तयार करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आलं आहे.

देशातील जास्त वीज ग्राहकांचा कल प्रीपेड वीज जोडणी घेण्याकडे जाईल, असंही आर.के सिंह यांनी म्हंटलं आहे. यामुळे वीज कंपन्याचं नुकसान भरून निघायला मदत होईल, असं ते पुढे म्हणाले. वीजेची मागणी पूर्ण करण्यासाठी सरकार एनटीपीसीची क्षमता वाढवण्यावर भर देणार आहे. राज्य सरकारांची वीजेची मागणी पूर्ण करता यावी, म्हणून केंद्र सरकार वीज खरेदी कराराला चालना देण्याचा विचार करत आहे. भारत विकासाच्या मार्गावर असून भविष्यात वीजेची मागणी वाढणार असल्याचेही ऊर्जामंत्री आर. के सिंह यांनी म्हंटलं आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी