शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

सर्वांना वीज देणारी 'सौभाग्य' योजना 25 सप्टेंबरला होणार सुरू; ऊर्जामंत्र्यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2017 22:11 IST

देशातील नागरिकांना २४ तास वीज पुरवठा करण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २५ सप्टेंबरला नवीन 'सौभाग्य' योजना सुरू करणार आहेत.

ठळक मुद्देदेशातील नागरिकांना २४ तास वीज पुरवठा करण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २५ सप्टेंबरला नवीन 'सौभाग्य' योजना सुरू करणार आहेत. केंद्रीय ऊर्जामंत्री आर. के, सिंह यांनी या संदर्भातील माहिती दिली आहे. ही योजना नेमकी कशी असेल? याबद्दल आ.के सिंह यांनी सविस्तर सांगण्यास नकार दिला.

नवी दिल्ली, दि. 23- देशातील नागरिकांना २४ तास वीज पुरवठा करण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २५ सप्टेंबरला नवीन 'सौभाग्य' योजना सुरू करणार आहेत. केंद्रीय ऊर्जामंत्री आर. के, सिंह यांनी या संदर्भातील माहिती दिली आहे. २५ सप्टेंबरला आरएसएसचे ज्येष्ठ नेते आणि जनसंघाचे संस्थापक सदस्य दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती आहे. याच दिवशी मोदींकडून 'सौभाग्य' योजना सुरू केली जाणार आहे. ही योजना नेमकी कशी असेल? याबद्दल आ.के सिंह यांनी सविस्तर सांगण्यास नकार दिला. पण या योजनेअंतर्गत डिसेंबरपर्यंत देशातील सर्व गावांमध्ये वीज पोहोचविण्याचा उपक्रम सुरू केला जाईल, अशी चर्चा सध्या सुरू आहे.

प्रत्येक गावात वीज पोहोचावी यासाठी राज्य सरकारांनी आपल्या योजना तयार कराव्यात अशा सूचना केंद्र सरकारने दिल्या आहेत, असंही आर. के. सिंह यांनी म्हटलं आहे. या योजनांसाठी केंद्राने सहमती दर्शवल्यानंतर निधीचा पुरवठाही केला जाणार आहे. या योजनेअंतर्गत ट्रान्स्फॉर्मर, मीटर आणि तारांसाठी सवलतही देण्यात येणार आहे. या योजनेचं नाव 'सौभाग्य' असं असणार आहे. या आठवड्यात पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीच्या अजेंड्यात या योजनेचाही समावेश होता, अशी माहिती सुत्रांकडून मिळते आहे.

गावागावांमध्ये वीज पोहोचविण्यासाठी सरकार जलद गतीने काम करत आहे. तसंच सर्वांना २४ तास वीजपुरवठा व्हावा, यासाठी सरकारने २०१९चं लक्ष्य निश्चित केलं आहे. वीज खरेदी करण्याशी संबंधीत कायदा अधिक कडक करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचंही ऊर्जामंत्री आर.के सिंह यांनी म्हंटलं आहे. या वर्षाच्या अखेरीपर्यंत २० हजार मेगावॉट वीज वायू ऊर्जेपासून, तर २० हजार मेगावॉट वीज सौर ऊर्जेपासून तयार करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आलं आहे.

देशातील जास्त वीज ग्राहकांचा कल प्रीपेड वीज जोडणी घेण्याकडे जाईल, असंही आर.के सिंह यांनी म्हंटलं आहे. यामुळे वीज कंपन्याचं नुकसान भरून निघायला मदत होईल, असं ते पुढे म्हणाले. वीजेची मागणी पूर्ण करण्यासाठी सरकार एनटीपीसीची क्षमता वाढवण्यावर भर देणार आहे. राज्य सरकारांची वीजेची मागणी पूर्ण करता यावी, म्हणून केंद्र सरकार वीज खरेदी कराराला चालना देण्याचा विचार करत आहे. भारत विकासाच्या मार्गावर असून भविष्यात वीजेची मागणी वाढणार असल्याचेही ऊर्जामंत्री आर. के सिंह यांनी म्हंटलं आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी