शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

सर्वांना वीज देणारी 'सौभाग्य' योजना 25 सप्टेंबरला होणार सुरू; ऊर्जामंत्र्यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2017 22:11 IST

देशातील नागरिकांना २४ तास वीज पुरवठा करण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २५ सप्टेंबरला नवीन 'सौभाग्य' योजना सुरू करणार आहेत.

ठळक मुद्देदेशातील नागरिकांना २४ तास वीज पुरवठा करण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २५ सप्टेंबरला नवीन 'सौभाग्य' योजना सुरू करणार आहेत. केंद्रीय ऊर्जामंत्री आर. के, सिंह यांनी या संदर्भातील माहिती दिली आहे. ही योजना नेमकी कशी असेल? याबद्दल आ.के सिंह यांनी सविस्तर सांगण्यास नकार दिला.

नवी दिल्ली, दि. 23- देशातील नागरिकांना २४ तास वीज पुरवठा करण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २५ सप्टेंबरला नवीन 'सौभाग्य' योजना सुरू करणार आहेत. केंद्रीय ऊर्जामंत्री आर. के, सिंह यांनी या संदर्भातील माहिती दिली आहे. २५ सप्टेंबरला आरएसएसचे ज्येष्ठ नेते आणि जनसंघाचे संस्थापक सदस्य दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती आहे. याच दिवशी मोदींकडून 'सौभाग्य' योजना सुरू केली जाणार आहे. ही योजना नेमकी कशी असेल? याबद्दल आ.के सिंह यांनी सविस्तर सांगण्यास नकार दिला. पण या योजनेअंतर्गत डिसेंबरपर्यंत देशातील सर्व गावांमध्ये वीज पोहोचविण्याचा उपक्रम सुरू केला जाईल, अशी चर्चा सध्या सुरू आहे.

प्रत्येक गावात वीज पोहोचावी यासाठी राज्य सरकारांनी आपल्या योजना तयार कराव्यात अशा सूचना केंद्र सरकारने दिल्या आहेत, असंही आर. के. सिंह यांनी म्हटलं आहे. या योजनांसाठी केंद्राने सहमती दर्शवल्यानंतर निधीचा पुरवठाही केला जाणार आहे. या योजनेअंतर्गत ट्रान्स्फॉर्मर, मीटर आणि तारांसाठी सवलतही देण्यात येणार आहे. या योजनेचं नाव 'सौभाग्य' असं असणार आहे. या आठवड्यात पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीच्या अजेंड्यात या योजनेचाही समावेश होता, अशी माहिती सुत्रांकडून मिळते आहे.

गावागावांमध्ये वीज पोहोचविण्यासाठी सरकार जलद गतीने काम करत आहे. तसंच सर्वांना २४ तास वीजपुरवठा व्हावा, यासाठी सरकारने २०१९चं लक्ष्य निश्चित केलं आहे. वीज खरेदी करण्याशी संबंधीत कायदा अधिक कडक करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचंही ऊर्जामंत्री आर.के सिंह यांनी म्हंटलं आहे. या वर्षाच्या अखेरीपर्यंत २० हजार मेगावॉट वीज वायू ऊर्जेपासून, तर २० हजार मेगावॉट वीज सौर ऊर्जेपासून तयार करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आलं आहे.

देशातील जास्त वीज ग्राहकांचा कल प्रीपेड वीज जोडणी घेण्याकडे जाईल, असंही आर.के सिंह यांनी म्हंटलं आहे. यामुळे वीज कंपन्याचं नुकसान भरून निघायला मदत होईल, असं ते पुढे म्हणाले. वीजेची मागणी पूर्ण करण्यासाठी सरकार एनटीपीसीची क्षमता वाढवण्यावर भर देणार आहे. राज्य सरकारांची वीजेची मागणी पूर्ण करता यावी, म्हणून केंद्र सरकार वीज खरेदी कराराला चालना देण्याचा विचार करत आहे. भारत विकासाच्या मार्गावर असून भविष्यात वीजेची मागणी वाढणार असल्याचेही ऊर्जामंत्री आर. के सिंह यांनी म्हंटलं आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी