शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

‘सौभाग्य’ची वीज फुकट नाही! गरिबांना फक्त वीज जोडणी विनामूल्य, सरकारचा खुलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 02:10 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या सोमवारी उद्धाटन केलेल्या ‘सौभाग्य’ योजनेत कोणालाही फुकट वीज पुरविली जाणार नाही, असे स्पष्टीकरण केंद्र सरकारने बुधवारी केले.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या सोमवारी उद्धाटन केलेल्या ‘सौभाग्य’ योजनेत कोणालाही फुकट वीज पुरविली जाणार नाही, असे स्पष्टीकरण केंद्र सरकारने बुधवारी केले.या योजनेचे नेमके स्वरूप काय आहे, याची माहिती ऊर्जा मंत्रालयाने जारी केली. त्यानुसार गरिबांना वीज जोडणी विनामूल्य दिली जाईल. इतरांना वीज जोडणीसाठी ५०० रुपये द्यावे लागतील. ही रक्कम वीज कंपनी बिलातून १० हप्त्यांत वसूल करेल.मात्र वीज जोडणी दिल्यानंतर, गरीब असो वा नसो, प्रत्येक ग्राहकास त्याने वापरलेल्या वीजेचे ठरलेल्या दराने पैसे मोजावे लागतील.मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार विनामूल्य किंवा ५०० रुपये घेऊन दिलेल्या जोडणीमध्ये जवळच्या विजेच्या खांबापासून ग्राहकाच्या घरापर्यंत विजेची तार टाकणे, विजेचे मीटर बसविणे आणि एक एलईडी बल्ब व एक मोबाईल चार्जिंग पॉर्इंट यांच्यासाठी वायरिंग करणेइत्यादी कामे केली जातील. घराजवळ विजेचा खांब नसेल तर तो टाकण्याचे कामही याच योजनेत केले जाईल.वीज जोडणीसाठीचे अर्ज व आवश्यक माहिती इलेक्ट्रॉनिक पद्धतीने घेतली जाईल. यासाठी ग्रामीण भागांमध्ये विशेष शिबिरे भरविण्यात येतील व आवश्यक बाबींची पूर्तता झाल्यावर ग्राहकास जागच्या जागी वीज जोडणी मंजूर करण्यात येईल.२४ हजार कोटींचा महसूलया योजनेवर केंद्र सरकार सुमारे १६ हजार कोटी रुपये खर्च करेल. परंतु योजना पूर्ण होऊन सर्व अपेक्षित चार कोटी ग्राहकांना वीज पुरविणे सुरु झाल्यावर त्यातून राज्यांच्या वीज वितरण कंपन्यांना दरमहा २४ हजार कोटी रुपयांचा जादा महसूल मिळेल, असे ढोबळ गणित आहे.या नव्या ग्राहकांमुळे वीजेची मागणी वर्षाला अंदाजे ८० हजार दशलक्ष युनिटने वाढेल व वीजेचा दर युनिटला सकारी ३ रुपये गृहित धरला तरी वीज कंपन्यांना २४ जहार कोटी रुपये जादा महसूल मिळेल.