शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रूरतेचा भागीदार! इराणने मदत मागितलेली, रईसी यांच्या शोधासाठी अमेरिकेने नकार दिला
2
आजचे राशीभविष्य, २१ मे २०२४ : मन प्रसन्न राहिल, कामे सफल होतील पण आरोग्याची काळजी घ्यावी लागेल!
3
अर्धे मतदार गेले तरी कुठे? महाराष्ट्रात ५४.३३ टक्के, तर देशात सरासरी ६०.३९ टक्के मतदान
4
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ
5
पोलिसांनी अतिरेकी हल्ल्याचा कट उधळला; अहमदाबाद विमानतळावर चार दहशतवाद्यांना अटक
6
मी दारू पितो, माझ्याकडे परवाना नाही; तरीही वडिलांनीच कार दिली; ‘ब्रह्मा ग्रुप’चे विशाल अग्रवाल यांच्यासह चार जणांवर गुन्हा
7
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; मृतांमध्ये परराष्ट्रमंत्र्यांसह अधिकाऱ्यांचाही समावेश
8
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
9
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
10
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
11
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
12
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
13
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
14
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
15
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
16
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
17
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
18
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
19
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
20
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…

काँग्रेसच पुन्हा आणू शकेल ‘अच्छे दिन’ - राहुल गांधी

By admin | Published: January 12, 2017 4:52 AM

पंतप्रधान मोदी यांच्या चुकीच्या निर्णयामुळे देशाचे जगात हसे होत आहे, असा हल्लाबोल काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला

शीलेश शर्मा / नवी दिल्लीपंतप्रधान मोदी यांच्या चुकीच्या निर्णयामुळे देशाचे जगात हसे होत आहे, असा हल्लाबोल काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. नोटाबंदीच्या मुद्द्यावर टीका करताना ते म्हणाले की, २०१९ मध्ये काँगे्रस सत्तेत आल्यानंतरच ‘अच्छे दिन’ येणार आहेत. काँग्रेसच्या ‘जन वेदना’ बैठकीत बोलताना ते म्हणाले की, मोदी यांच्या या निर्णयामुळे अर्थव्यवस्था १६ वर्षे मागे गेली आहे. भाजप, आरएसएस आणि मोदी यांनी अडीच वर्षांच्या काळात आरबीआय, न्यायपालिका आणि निवडणूक आयोग या संस्थांना कमकुवत केले आहे. या संस्था भारताचा आत्मा  आहेत. त्यांना या सरकारने दुर्बल केले आहे. तर, मनरेगाच्या कामात अचानक वाढ का झाली आहे? लोक शहराच्या ऐवजी गावाकडे का जात आहेत? हे मोदी यांना विचारायला हवे, असेही ते म्हणाले. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनीही मोदी सरकारवर टीका करताना, यापेक्षा वाईट काळ येणे अद्याप बाकी आहे, असे भाष्य केले आहे. नोटाबंदीचा निर्णय म्हणजे एक आपत्ती आहे. याचा सर्वात वाईट काळ येणे अद्याप बाकी आहे. याबाबतचे दावे पोकळ आहेत. मोदी यांचा दुष्प्रचार सुरु आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी हे लोकांना हे सांगायला हवे. मोदी सरकार काय चुकीचे करत आहे याबाबत देशवासीयांच्या जागृतीसाठी आवाहन करण्याची गरज आहे, माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी ८ नोव्हेंबरच्या कॅबिनेटमध्ये नोटाबंदीचा निर्णय झाल्याचा दस्तावेजच नसल्याचा आरोप केला. कॅबिनेटचा निर्णय कोठे आहे? असा सवाल करुन चिदंबरम म्हणाले की, भारताच्या इतिहासात असा ‘फार्स’ कधी झाला नव्हता. आरबीआयच्या प्रतिष्ठेला या निर्णयानंतर धक्का बसला आहे. जीडीपीतील घसरणीमुळे देशाचे दीड लाख कोटी रुपयांचे नुकसान होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. काँग्रेसनेही चलनातून बाद करण्यात आलेल्या नोटात किती टक्के रक्कम काळा पैसा होता? याचा खुलासा करावा, अशी मागणी केली. भारतीय अर्थव्यवस्था काळ्या पैशांवर आधारित असल्याचे सांगत देशाची प्रतिमा मलिन करण्यात आली आहे. नोटाबंदीनंतरच्या ५० दिवसात भाजपचे काही भ्रष्ट नेते, काळा बाजार करणारे आणि बँक अधिकारी यांच्या अपवित्र एकीतून अवैध प्रकारे नोटा बदलण्यात आल्या. भ्रष्ट व काळा पैसा बाळगणाऱ्यांसाठी बँकेचे मागचे दरवाजे खुले झाले पण, आमआदमी समोर रांगेत उभा होता, असा आरोपही पक्षाने केला. मोदींची निष्पक्ष चौकशी करानरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराचे काही आरोप आहेत. याची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणीही काँग्रेसने केली आहे. नोटाबंदीमुळे कृषी, बांधकाम आणि अन्य क्षेत्रांतील लाखो कामगारांचा रोजगार गेला, असा आरोप करीत. दलित, आदिवासी आणि अल्पसंख्यांकांवर अत्याचार वाढले असून गरीबांवरील हल्ले वाढले आहेत, अशीही टीका काँग्रेसने केली आहे.भारताच्या इतिहासात असा ‘फार्स’ कधी झाला नव्हता. आरबीआयच्या प्रतिष्ठेला या निर्णयानंतर धक्का बसला आहे.- पी. चिदंबरम, माजी अर्थमंत्री