शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसच पुन्हा आणू शकेल ‘अच्छे दिन’ - राहुल गांधी

By admin | Updated: January 12, 2017 04:52 IST

पंतप्रधान मोदी यांच्या चुकीच्या निर्णयामुळे देशाचे जगात हसे होत आहे, असा हल्लाबोल काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला

शीलेश शर्मा / नवी दिल्लीपंतप्रधान मोदी यांच्या चुकीच्या निर्णयामुळे देशाचे जगात हसे होत आहे, असा हल्लाबोल काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. नोटाबंदीच्या मुद्द्यावर टीका करताना ते म्हणाले की, २०१९ मध्ये काँगे्रस सत्तेत आल्यानंतरच ‘अच्छे दिन’ येणार आहेत. काँग्रेसच्या ‘जन वेदना’ बैठकीत बोलताना ते म्हणाले की, मोदी यांच्या या निर्णयामुळे अर्थव्यवस्था १६ वर्षे मागे गेली आहे. भाजप, आरएसएस आणि मोदी यांनी अडीच वर्षांच्या काळात आरबीआय, न्यायपालिका आणि निवडणूक आयोग या संस्थांना कमकुवत केले आहे. या संस्था भारताचा आत्मा  आहेत. त्यांना या सरकारने दुर्बल केले आहे. तर, मनरेगाच्या कामात अचानक वाढ का झाली आहे? लोक शहराच्या ऐवजी गावाकडे का जात आहेत? हे मोदी यांना विचारायला हवे, असेही ते म्हणाले. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनीही मोदी सरकारवर टीका करताना, यापेक्षा वाईट काळ येणे अद्याप बाकी आहे, असे भाष्य केले आहे. नोटाबंदीचा निर्णय म्हणजे एक आपत्ती आहे. याचा सर्वात वाईट काळ येणे अद्याप बाकी आहे. याबाबतचे दावे पोकळ आहेत. मोदी यांचा दुष्प्रचार सुरु आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी हे लोकांना हे सांगायला हवे. मोदी सरकार काय चुकीचे करत आहे याबाबत देशवासीयांच्या जागृतीसाठी आवाहन करण्याची गरज आहे, माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी ८ नोव्हेंबरच्या कॅबिनेटमध्ये नोटाबंदीचा निर्णय झाल्याचा दस्तावेजच नसल्याचा आरोप केला. कॅबिनेटचा निर्णय कोठे आहे? असा सवाल करुन चिदंबरम म्हणाले की, भारताच्या इतिहासात असा ‘फार्स’ कधी झाला नव्हता. आरबीआयच्या प्रतिष्ठेला या निर्णयानंतर धक्का बसला आहे. जीडीपीतील घसरणीमुळे देशाचे दीड लाख कोटी रुपयांचे नुकसान होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. काँग्रेसनेही चलनातून बाद करण्यात आलेल्या नोटात किती टक्के रक्कम काळा पैसा होता? याचा खुलासा करावा, अशी मागणी केली. भारतीय अर्थव्यवस्था काळ्या पैशांवर आधारित असल्याचे सांगत देशाची प्रतिमा मलिन करण्यात आली आहे. नोटाबंदीनंतरच्या ५० दिवसात भाजपचे काही भ्रष्ट नेते, काळा बाजार करणारे आणि बँक अधिकारी यांच्या अपवित्र एकीतून अवैध प्रकारे नोटा बदलण्यात आल्या. भ्रष्ट व काळा पैसा बाळगणाऱ्यांसाठी बँकेचे मागचे दरवाजे खुले झाले पण, आमआदमी समोर रांगेत उभा होता, असा आरोपही पक्षाने केला. मोदींची निष्पक्ष चौकशी करानरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराचे काही आरोप आहेत. याची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणीही काँग्रेसने केली आहे. नोटाबंदीमुळे कृषी, बांधकाम आणि अन्य क्षेत्रांतील लाखो कामगारांचा रोजगार गेला, असा आरोप करीत. दलित, आदिवासी आणि अल्पसंख्यांकांवर अत्याचार वाढले असून गरीबांवरील हल्ले वाढले आहेत, अशीही टीका काँग्रेसने केली आहे.भारताच्या इतिहासात असा ‘फार्स’ कधी झाला नव्हता. आरबीआयच्या प्रतिष्ठेला या निर्णयानंतर धक्का बसला आहे.- पी. चिदंबरम, माजी अर्थमंत्री