शहरं
Join us  
Trending Stories
1
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकली; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
2
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
3
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
4
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाची ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
5
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
6
'या' बँकेच्या शेअरनं लोकांना केलं मालामाल, १५ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला भाव; किंमतही खिशाला परवडणारी! झुनझुनवालांचा मोठा डाव
7
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
8
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
9
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
10
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
11
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
12
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
13
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
14
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
15
बापरे बाप! बंजी जंपिंग करताना आला हार्ट अटॅक, हवेतच मुलीचा मृत्यू? Video पाहून भरेल धडकी
16
WTC Final Scenario : टीम इंडियाचं गणित पुन्हा बिघडणार? फायनल खेळण्यासाठी जिंकावे लागतील एवढे सामने
17
नवऱ्यासोबत घटस्फोटाच्या चर्चा, सततच्या ट्रोलिंगवर भडकली ऐश्वर्या; म्हणाली, "साखरपुड्यापासूनच..."
18
Hyundai Creta चं टेन्शन वाढणार, येतायेत दोन 'धाकड' SUV; जाणून घ्या फीचर्स, काय असेल खास?
19
शेख हसीना यांना शिक्षा सुनावल्यानंतर ढाक्यामध्ये हिंसाचार उसळला, युनूस सरकार 'अ‍ॅक्शन'मोडवर; परिस्थिती बिघडली
20
आता तरी घ्या रे! ऋतुराज गायकवाडचा मोठा पराक्रम; पुजाराला मागे टाकत ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा
Daily Top 2Weekly Top 5

महिलेऐवजी पुरूषाचा दिला मृतदेह; अंत्यसंस्कार करण्यापूर्वीच आला फोन अन् उडाला एकच गोंधळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2022 11:13 IST

Uttar Pradesh : एका महिलेचा मारहाणीदरम्यान मृत्यू झाला होता. त्यानंतर रविवारी तिचा मृतदेह शवविच्छेदनगृहात पाठवण्यात आला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. यानंतर एकच गोंधळ सुरू झाला.

गोंडा : उत्तर प्रदेशातील गोंडाच्या कर्नलगंज येथील शवविच्छेदन गृहामध्ये मृतदेह बदलल्याची घटना समोर आली आहे. यानंतर कुटुंबीय आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. दरम्यान, एका महिलेचा मारहाणीदरम्यान मृत्यू झाला होता. त्यानंतर रविवारी तिचा मृतदेह शवविच्छेदनगृहात पाठवण्यात आला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. यानंतर एकच गोंधळ सुरू झाला.

कुटुंबीयांना महिलेचा नव्हे तर पुरुषाचा मृतदेह देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. शवविच्छेदन गृहाचे कर्मचारी आणि पोलिसांच्या दुर्लक्षाबद्दल कुटुंबीयांनी नाराजी व्यक्त केली. त्याचवेळी सीएमओने चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच, या प्रकरणी सीएमओ राधेश्याम केसरी यांनी सांगितले की, शवविच्छेदन गृहात मृतदेह बदलल्याची तक्रार आली होती. या प्रकरणाची चौकशी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दोषींवर कडक कारवाई केली जाईल.

हे प्रकरण कोतवाली कर्नलगंज भागातील गुरसाडी गावचे आहे. येथे गेल्या शुक्रवारी 40 वर्षीय रिता देवी यांना वादात मारहाण करण्यात आली होती. त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता शनिवारी रात्री उशिरा त्यांचा मृत्यू झाला. रविवारी कुटुंबीय महिलेचे शवविच्छेदन करण्यासाठी पोहोचले होते. त्याचबरोबर, याप्रकरणी आरोपी संजयवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नक्की काय घडलं?रविवारी दुपारी 4 ते 5 या वेळेत मृत रिता देवी यांचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर मृतदेह देण्यात आला. आम्ही सर्वजण मृतदेह घेऊन गुरसाडी या गावी आलो होतो. त्यानंतर तासाभराने शवविच्छेदन गृहामधून एक फोन आला. त्यावेळी तुम्ही लोक दुसऱ्या मृतदेहासोबत घरी गेला आहात. तुमच्याकडे जो आहे तो पुरुषाचा मृतदेह आहे. तो परत घेऊन या आणि महिलेचा मृतदेह घेऊन जा, असे फोनद्वारे सांगण्यात आल्याचे मृत रिता देवी यांचे पती सुरेश कुमार यांनी सांगितले. यानंतर एकच गोंधळ उडाला. 

वरिष्ठांच्या मध्यस्थीनंतर मृतदेहावर अंत्यसंस्काररविवारी कोतवाली नगर येथील गोंडा पोलिसांनी रीता देवी (वय 40) या महिलेचे शवविच्छेदन केले. शवविच्छेदनानंतर महिलेचा मृतदेह न देता अनोळखी व्यक्तीचा मृतदेह नातेवाईकांना देण्यात आला. त्यामुळे महिलेचे कुटुंबीय घरी पोहोचले, त्यानंतर फोन करून पुन्हा मृतदेह गोंडा  शवविच्छेदन गृहामध्ये आणण्यास सांगितले. मृतदेह घेऊन नातेवाईक गोंडा येथे गेले असता त्यांना महिलेचा मृतदेह मिळाला. त्यानंतर सायंकाळी उशिरा नातेवाईक मृतदेह घेऊन घरी पोहोचले. जिथे वरिष्ठांच्या मध्यस्थीनंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेश