शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
2
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
3
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
4
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
5
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
6
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
7
भारतानंतर आता दक्षिण आफ्रिकेनेही सुरू केली बांग्लादेशी घुसखोरांविरुद्ध हद्दपारीची मोहीम
8
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
9
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
10
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
11
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
Daily Top 2Weekly Top 5

समुद्रकिनारी चक्क सोन्याचे कण सापडले; गावकऱ्यांची पळापळ, सरकारी अधिकारीही सरसावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2020 07:07 IST

जो तो आपले नशीब आजमावण्यासाठी किनाऱ्यावर धाव घेऊ लागला. लाटांनी किनाऱ्यावर आणलेला गाळ चाळून त्यातून सोने शोधण्याची धडपड सुरू झाली.

काकिनाडा : नीवर चक्रीवादळाने अलीकडेच तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि आंध्र प्रदेश या राज्यांच्या किनारी भागांना तडाखा दिला. किनारी भागातील अनेक गावांचे नुकसान झाले. मात्र, आंध्र प्रदेेशातील पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील उप्पाडा गावासाठी नीवर चक्रीवादळ वरदान ठरले. कारण चक्रीवादळानंतर येथील समुद्रकिनाऱ्यावर चक्क सोन्याचे कण आढळू लागले आहेत! रेशमी साड्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या उप्पाडा गावातील मच्छिमारांना गेल्या आठवड्यात समुद्रकिनाऱ्यावर चक्क सोन्याचे कण सापडू लागले. किनाऱ्यावर सोने सापडत असल्याची वार्ता गावात वाऱ्यासारखी पसरली. 

जो तो आपले नशीब आजमावण्यासाठी किनाऱ्यावर धाव घेऊ लागला. लाटांनी किनाऱ्यावर आणलेला गाळ चाळून त्यातून सोने शोधण्याची धडपड सुरू झाली. आतापर्यंत ५० लोकांना प्रत्येकी साडेतीन हजार रुपये किमतीचे सोने सापडल्याचा दावा येथील स्थानिकांनी केला आहे. मात्र, प्रत्येकाला सोने मिळालेच असे नाही. तरीही किनाऱ्यावर सोन्याचा शोध सुरूच आहे. 

हे असे का झाले?समुद्रकिनाऱ्यावर सोने का सापडत आहे, याचे ठोस कारण कोणाला सांगता आलेले नाही. मात्र, गेल्या काही वर्षांपासून येथील किनारी भागातील जमिनीची धूप मोठ्या प्रमाणावर होत असल्याने अलीकडेच दोन मंदिरे पडल्याच्या घटना घडल्या. तसेच तुफानी वाऱ्यांमुळे घरे कोसळण्याचेही प्रकार घडले आहेत.

पडलेली घरे व मंदिरे समुद्री लाटांनी आत ओढून नेली. नवीन वास्तू वा मंदिर बांधताना पायाभरणीवेळी सोने अर्पण करण्याची गावात प्रथा आहे. कदाचित समुद्राच्या उदरात गडप झालेल्या या घर वा मंदिराच्या पायाभरणीचे सोने समुद्री लाटा किनाऱ्यावर घेऊन येत असतील, असा अंदाज स्थानिक पोलिस व्यक्त करत आहेत. दरम्यान, महसूल खात्याचे अधिकारी व कर्मचारी लवकरच येथील परिसराची पाहणी करणार आहेत.

टॅग्स :Goldसोनं