शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

'किमान दोन अपत्यांना जन्म द्या', गोव्याच्या राज्यपालांचा तरुणांना सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2018 11:38 IST

मुलांनी गोष्टी शेअर करणं शिकलं पाहिजे, म्हणून घरात जर दोन मुलं असतील तरच ही गोष्ट शक्य आहे.

बेळगाव- गोव्याच्या राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी तरुणांना सल्ला दिला आहे. 'फक्त एका अपत्यावर न थांबता दुसऱ्या अपत्याचाही विचार करा',असा सल्ला सिन्हा यांनी तरुणांना दिला आहे. मुलांनी गोष्टी शेअर करणं शिकलं पाहिजे, म्हणून घरात जर दोन मुलं असतील तरच ही गोष्ट शक्य आहे, असंही त्या म्हणाल्या. केएलई अकॅडमीच्या एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे. 

'सर्व तरुणांनी विवाह करावा. आई-वडिलांना वृद्धाश्रमात पाठवणार नाही व पती-पत्नीची काळजी घेऊ, असं अनेक विद्यार्थांनी मला वचन दिल्याचं त्यांनी म्हटलं. 'तरुण पिढीला मानवी मुल्यांचा आदर नाही, असं अनेकदा वृद्ध लोक बोलतात. पण माझा अनुभव वेगळा आहे. आताची तरूण पिढी अतिशय जबाबदार असून ते वास्तवात वावरतात. हे सर्व भारतीय संस्कारांमुळेच शक्य झालं आहे. बाळ जेव्हा आईच्या गर्भात असतं तिथूनच हे सर्व संस्कार होतात, असं त्यांनी म्हटलं. 

शिक्षण हे स्वाक्षरतेसाठी व फक्त डिग्रीसाठी नसून ती शिकण्याची एक पद्धत आहे. ज्यामुळे प्रत्येकाचा दृष्टीकोन तयार होतो,असंही त्यांनी नमूद केलं.