शहरं
Join us  
Trending Stories
1
'देश वाचवण्यासाठी पुन्हा तुरुंगात जातोय; Exit Poll वर विश्वास ठेवू नका'- अरविंद केजरीवाल
2
एक्झिट पोल जाहीर होताच भाजपात गेलेल्या आप आमदाराने राजीनामा मागे घेतला
3
सिक्कीमध्ये सत्ताधारी SKM चा दणदणीत विजय; भाजपचे सर्व उमेदवार पराभूत
4
एनडीए ३९७ पार! एक्झिट पोलनंतर लगेचच e-मतदानाचा निकाल आला; पहा महाराष्ट्रात काय परिस्थिती?
5
"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
6
११ हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद... आईने भावाला मारहाण केल्याचा ललित मोदींचा आरोप
7
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
8
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
9
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
10
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांना खोचक टोला
11
४ जूनपूर्वीच भाजपाला खूशखबर, अरुणाचल प्रदेशमध्ये मिळवला दणदणीत विजय
12
NDA आणि INDIAच्या लढतीत ही पाच राज्यं ठरली निर्णायक, बिघडवला ‘इंडिया’चा खेळ
13
रवीना टंडनची काहीही चूक नाही? ती नशेत नव्हती? CCTV फूटेजमुळे समोर आली वेगळीच कहाणी
14
"अमित शाह जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावत आहेत"; काँग्रेसच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल
15
पॅरिसवरुन मुंबईला येणाऱ्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 306 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
"निवडणुकीसाठी मी तयार नव्हतो पण..."; चंद्रपूरच्या एक्झिट पोलनंतर मुनगंटीवारांचे सूचक विधान
17
अमेरिका पुन्हा हादरली! बर्थडे पार्टीत अंदाधुंद गोळीबार; २७ जणांना लागल्या गोळ्या, एकाचा मृत्यू
18
इंडिया आघाडी किती जागा जिंकणार? राहुल गांधी म्हणाले, "सिद्धू मुसेवालाचे गाणे ऐका, कळेल.."
19
मनोज तिवारी आणि कन्हैया कुमार यांच्यात कोण जिंकणार?; एक्झिट पोलने सांगितला आकडा
20
दिग्गज फुटबॉलपटू बायचुंग भुतिय यांना 'रेड कार्ड', राजकीय मैदानात मतदारांनी पुन्हा नाकारले...

उच्चवर्णियांना १५ टक्के राखीव जागा द्या : पासवान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 3:56 AM

उच्चवर्णियांना १५ टक्के राखीव जागा दिल्या पाहिजेत, असे मत केंद्रीय ग्राहक कामकाज व अन्नपुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी व्यक्त केले.

नवी दिल्ली : उच्चवर्णियांना १५ टक्के राखीव जागा दिल्या पाहिजेत, असे मत केंद्रीय ग्राहक कामकाज व अन्नपुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी व्यक्त केले. अशा राखीव जागा दिल्या, तर ५० टक्के राखीव जागांचे उल्लंघन होणार नाही का, असे विचारले असता पासवान म्हणाले की, तामिळनाडूत ६९ टक्के जागा राखीव ठेवल्या आहेत.सगळ्या राजकीय पक्षांनी ठरवले, तर प्रश्न निर्माण होणार नाही. अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यावर सरकारने घेतलेली भूमिका आणि सरकारी नोकरीतील बढतीत राखीव जागा, यावरून जोरदारपणे होणारा निषेध सरकारसाठी काळजीचा विषय आहे का? यावर पासवान म्हणाले की, अजिबात नाही.सहा महिन्यांपूर्वी आम्ही बऱ्याच निषेधाला तोंड दिलेले आहे. मंत्र्यांना बाहेर पडणे अवघड बनले होते. मोदी सरकार हे दलितविरोधी व मागासवर्गाच्या विरुद्ध असल्याचे म्हटले गेले. लोक मला विचारायचे की, पासवानजी तुम्ही दलितांच्या हितांचे रक्षणकर्ते असूनही गप्प का? त्यानंतर यावर तोडगा काढला. (वृत्तसंस्था)>प्रतिमा बदललीदलितविरोधी अशी सरकारची प्रतिमा ६ महिन्यांत कशी बदलली, असे विचारताच पासवान म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निवाडा ही सरकारसाठी परीक्षाच होती. तरुण वर्ग रस्त्यावर उतरला.अध्यादेश योग्य दिवशी जारी केला असता तर परिस्थिती इतकी वाईट झाली नसती. आम्ही गृहमंत्री राजनाथसिंह यांच्या अध्यक्षतेखालील समितीत अध्यादेश तात्काळ जारी करण्याचा निर्णय घेतला.