शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
2
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
3
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
4
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
5
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
6
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
7
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
8
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
9
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
10
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
11
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
12
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
13
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
14
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
15
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
16
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
17
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
18
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
19
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
20
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स

शेतकऱ्यांच्या अनाथ मुलांना ‘ते’ ९० हजार कोटी द्या; निर्मला सीतारामन यांच्याकडे कुणाची मागणी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 08:51 IST

सरकारने संस्था स्थापन करावी आणि निधी त्यात वळता करावा, अशी विनंती अर्थमंत्र्यांना केली.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : सरकारी तिजोरीत ९० हजार कोटी रुपये बेवारस पडून आहेत. या पैशांचा उपयोग आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणावर करावा, अशी मागणी खा. डॉ. अजित गोपछडे यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे केली आहे.

राज्यसभेतील भाजपचे खा. डॉ. अजित गोपछडे यांनी गुरुवारी संसदेतील कार्यालयात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली. राष्ट्रीयीकृत बँका, खासगी बँका आणि विमा कंपन्यांकडे ८८,७२२ कोटी रुपये अनेक वर्षांपासून बेवारस आहेत. हा निधी अनाथ मुलांच्या शिक्षणावर खर्च करावा, अशी मागणी गोपछडे यांनी केली आहे.

एक लाख आत्महत्या...

स्टॅटिस्टा संस्थेच्या अहवालानुसार, मागील दहा वर्षांत एक लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. सततची नापिकी आणि कर्जाच्या ओझ्यामुळे शेतकरी आत्महत्या करतात. यामुळे लाखो मुले अनाथ झाली आहेत.

हुशार असूनही केवळ पैशांअभावी त्यांना शिक्षण घेता येत नाही. अशात, बँकांकडे पडून असलेले हजारो कोटी रुपये अनाथ मुलांवर खर्च करण्याचा विचार गांभीर्याने करावा. यासाठी सरकारने संस्था स्थापन करावी आणि बेवारस निधी त्यात वळता करावा, अशी विनंती अर्थमंत्र्यांना केली. शेतकरी आणि गरिबांची मुले अभ्यासात हुशार आहेत. आयपीएस अधिकारी होणारा कोल्हापूरमधील मेंढपाळाचा मुलगा बिरदेव डोणे आणि पहिल्याच प्रयत्नात यूपीएससीच्या परीक्षेत उत्तीर्ण होणारा पुण्याचा शिवांश जागडे याचे ताजे उदाहरण असल्याचेही गोपछडे म्हणाले.

 

टॅग्स :Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामनnirmala sitharamanनिर्मला सीतारामन