शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
5
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
6
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
7
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
8
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
9
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
10
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
11
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
12
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
13
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
14
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
15
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
16
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
17
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
18
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
19
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
20
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका

मताधिक्य द्या अन्यथा मंत्रिमंडळातून डच्चू, काँग्रेसची नेत्यांना तंबी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2019 16:28 IST

लोकसभा निवडणुका जिंकण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. या दरम्यान पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी स्वपक्षीय नेत्यांना आणि मंत्र्यांनाच इशारा दिला आहे.

अमृतसर - लोकसभा निवडणुका जिंकण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. या दरम्यान पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी स्वपक्षीय नेत्यांना आणि मंत्र्यांनाच इशारा दिला आहे. अमरिंदर सिंह यांनी पंजाब कॅबिनेटमधील मंत्र्यांना, नेत्यांना आणि आमदारांना आपापल्या लोकसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला जास्तीत जास्त आघाडी मिळवून देण्याचं सांगितलं आहे. जर तसं झालं नाही तर त्या नेत्याचे मंत्रीपद काढून घेतलं जाईल असा इशाराच पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी दिला आहे. 

कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी कडक शब्दात हा इशारा काँग्रेस पक्षातील मंत्री आणि आमदारांना दिला आहे. त्यामुळे जर या नेत्यांनी ज्या जिल्ह्यात त्यांचा प्रभाव आहे अशाठिकाणी  मताधिक्य मिळालं नाही तर ते नेते मंत्रीपद गमावू शकतात. त्यामुळे निवडणुकीच्या रणांगणात काँग्रेस नेत्यांना मोठं आव्हान असणार आहे त्यावर भविष्यातील त्यांचे मंत्रीपद पणाला लागलं आहे. तसेच काँग्रेस आमदारांना मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी सांगितले आहे की, आपण ज्या भागाचं प्रतिनिधित्व करता त्या भागातून काँग्रेसच्या उमेदवाराला मोठ्या प्रमाणात मतदान झालं पाहिजे. जर मतदान कमी झालं तर पुढच्या विधानसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी मिळणार नाही त्यामुळे काँग्रेस आमदारांचे भवितव्यही लोकसभा निवडणुकीच्या निकालांवर अवलंबून असणार आहे.  

दरम्यान त्याचसोबत पक्षात फक्त ज्येष्ठ असून चालणार नाही तर लोकसभा निवडणुकीत नेत्यांची कामगिरी पक्षातील त्यांचे भवितव्य ठरवणारी आहे. नेत्यांच्या कामगिरीवर पक्षामध्ये पद आणि सरकारमध्ये मंत्रीपद दिलं जाईल. मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी अशाप्रकारे नेत्यांना दिलेलं आव्हान म्हणजे पक्षात परफॉर्मेस बेस्ड कल्चरला चालना देण्यासाठी देण्यात आल्याचं सांगण्यात आलं.   

आगामी लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपा आणि विरोधी पक्ष काँग्रेस यांच्यात अटीतटीची लढाई आहे. त्यामुळे निवडणुकीतील प्रत्येक जागा जिंकण्यासाठी दोन्ही पक्ष जोरदार प्रयत्न करत आहे. मात्र देशातील सत्ता कोणाला द्यायची हे जनतेने दिलेल्या मतदानावर अवलंबून आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत कामगिरी कोणता पक्ष चांगला करतो हे निवडणुकीच्या निकालावर अवलंबून आहे.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकElectionनिवडणूकPunjab Lok Sabha Election 2019पंजाब लोकसभा निवडणूक 2019congressकाँग्रेस