शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

मताधिक्य द्या अन्यथा मंत्रिमंडळातून डच्चू, काँग्रेसची नेत्यांना तंबी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2019 16:28 IST

लोकसभा निवडणुका जिंकण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. या दरम्यान पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी स्वपक्षीय नेत्यांना आणि मंत्र्यांनाच इशारा दिला आहे.

अमृतसर - लोकसभा निवडणुका जिंकण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. या दरम्यान पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी स्वपक्षीय नेत्यांना आणि मंत्र्यांनाच इशारा दिला आहे. अमरिंदर सिंह यांनी पंजाब कॅबिनेटमधील मंत्र्यांना, नेत्यांना आणि आमदारांना आपापल्या लोकसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला जास्तीत जास्त आघाडी मिळवून देण्याचं सांगितलं आहे. जर तसं झालं नाही तर त्या नेत्याचे मंत्रीपद काढून घेतलं जाईल असा इशाराच पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी दिला आहे. 

कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी कडक शब्दात हा इशारा काँग्रेस पक्षातील मंत्री आणि आमदारांना दिला आहे. त्यामुळे जर या नेत्यांनी ज्या जिल्ह्यात त्यांचा प्रभाव आहे अशाठिकाणी  मताधिक्य मिळालं नाही तर ते नेते मंत्रीपद गमावू शकतात. त्यामुळे निवडणुकीच्या रणांगणात काँग्रेस नेत्यांना मोठं आव्हान असणार आहे त्यावर भविष्यातील त्यांचे मंत्रीपद पणाला लागलं आहे. तसेच काँग्रेस आमदारांना मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी सांगितले आहे की, आपण ज्या भागाचं प्रतिनिधित्व करता त्या भागातून काँग्रेसच्या उमेदवाराला मोठ्या प्रमाणात मतदान झालं पाहिजे. जर मतदान कमी झालं तर पुढच्या विधानसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी मिळणार नाही त्यामुळे काँग्रेस आमदारांचे भवितव्यही लोकसभा निवडणुकीच्या निकालांवर अवलंबून असणार आहे.  

दरम्यान त्याचसोबत पक्षात फक्त ज्येष्ठ असून चालणार नाही तर लोकसभा निवडणुकीत नेत्यांची कामगिरी पक्षातील त्यांचे भवितव्य ठरवणारी आहे. नेत्यांच्या कामगिरीवर पक्षामध्ये पद आणि सरकारमध्ये मंत्रीपद दिलं जाईल. मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी अशाप्रकारे नेत्यांना दिलेलं आव्हान म्हणजे पक्षात परफॉर्मेस बेस्ड कल्चरला चालना देण्यासाठी देण्यात आल्याचं सांगण्यात आलं.   

आगामी लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपा आणि विरोधी पक्ष काँग्रेस यांच्यात अटीतटीची लढाई आहे. त्यामुळे निवडणुकीतील प्रत्येक जागा जिंकण्यासाठी दोन्ही पक्ष जोरदार प्रयत्न करत आहे. मात्र देशातील सत्ता कोणाला द्यायची हे जनतेने दिलेल्या मतदानावर अवलंबून आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत कामगिरी कोणता पक्ष चांगला करतो हे निवडणुकीच्या निकालावर अवलंबून आहे.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकElectionनिवडणूकPunjab Lok Sabha Election 2019पंजाब लोकसभा निवडणूक 2019congressकाँग्रेस