शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमासाठी काय पण! परीक्षा द्यायला गेली, लग्न करूनच परतली; आता सतावतेय 'ही' भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2024 16:27 IST

पेपर देण्याच्या बहाण्याने घरातून निघून गेली आणि प्रियकरासह पळून गेली. नंतर जेव्हा ती प्रेमविवाह करून परतली तेव्हा तिला घरच्यांची भीती वाटू लागली.

राजस्थानच्या अजमेर जिल्ह्यातील मुस्कान टाक ही 20 वर्षांची मुलगी तिच्या शेजारी राहणाऱ्या एका मुलाच्या प्रेमात पडली. पाच वर्षे दोघांमध्ये अफेअर सुरू होतं. कुटुंबीयांना मुलीचं दुसऱ्या ठिकाणी लग्न लावायचं होतं. त्यानंतर एके दिवशी पेपर देण्याच्या बहाण्याने ती घरातून निघून गेली आणि प्रियकरासह पळून गेली. नंतर जेव्हा ती प्रेमविवाह करून परतली तेव्हा तिला घरच्यांची भीती वाटू लागली. त्यामुळे तिने प्रियकरासह पोलीस अधीक्षक कार्यालय गाठलं आणि सुरक्षा मागितली.

मिळालेल्या माहितीनुसार, अजमेर जिल्ह्यातील अरईमधील मुस्कान टाक या तरुणीने सुजानगडच्या सुरवास गावातील मनोज मेघवाल या तरुणासोबत प्रेमविवाह केला होता. मनोज हा एका विमा कंपनीत कर्मचारी आहे. आता दोघांनी सुजानगडमध्ये प्रेमविवाह केला. दोघेही सुरक्षेसाठी एसपी कार्यालयात पोहोचले. मुस्कान टाक एसपी ऑफिसमध्ये पोहोचली आणि सांगितलं की दोघेही एकमेकांना 5 वर्षांपासून ओळखत आहेत.

मनोज कुमार मेघवाल हा अराई येथे राहतो. तिथे दोघांची ओळख झाली आणि मोबाईलवर बोलू लागले. मुस्कानच्या घरच्यांची इच्छा होती की तिचं लग्न दुसऱ्या ठिकाणी व्हावे. त्यामुळे मुस्कानने मनोज कुमारसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. मुस्कान ही बीएची विद्यार्थिनी आहे. पेपरला बसण्यासाठी 9 फेब्रुवारीला ती घरातून निघाली होती. मनोज कुमार तिथे आधीच त्याची वाट पाहत होता.

मुस्कान पेपर न देता मनोज कुमारसोबत ट्रेनने सुजानगडला आली. दोघांनी 10 फेब्रुवारीला सुजानगडमध्ये प्रेमविवाह केला. 20 वर्षीय मुस्कानने सांगितले की, तिचे वडील मॅनेजर आहेत. आता दोघेही एसपी कार्यालयात पोहोचले आणि सुरक्षेची विनंती केली. त्यांच्या प्रेमविवाहामुळे घरातील सदस्य रागावून त्रास देऊ शकतात, अशी भीती त्यांना वाटत आहे.  

टॅग्स :marriageलग्न