शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

प्रेमासाठी काय पण! परीक्षा द्यायला गेली, लग्न करूनच परतली; आता सतावतेय 'ही' भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2024 16:27 IST

पेपर देण्याच्या बहाण्याने घरातून निघून गेली आणि प्रियकरासह पळून गेली. नंतर जेव्हा ती प्रेमविवाह करून परतली तेव्हा तिला घरच्यांची भीती वाटू लागली.

राजस्थानच्या अजमेर जिल्ह्यातील मुस्कान टाक ही 20 वर्षांची मुलगी तिच्या शेजारी राहणाऱ्या एका मुलाच्या प्रेमात पडली. पाच वर्षे दोघांमध्ये अफेअर सुरू होतं. कुटुंबीयांना मुलीचं दुसऱ्या ठिकाणी लग्न लावायचं होतं. त्यानंतर एके दिवशी पेपर देण्याच्या बहाण्याने ती घरातून निघून गेली आणि प्रियकरासह पळून गेली. नंतर जेव्हा ती प्रेमविवाह करून परतली तेव्हा तिला घरच्यांची भीती वाटू लागली. त्यामुळे तिने प्रियकरासह पोलीस अधीक्षक कार्यालय गाठलं आणि सुरक्षा मागितली.

मिळालेल्या माहितीनुसार, अजमेर जिल्ह्यातील अरईमधील मुस्कान टाक या तरुणीने सुजानगडच्या सुरवास गावातील मनोज मेघवाल या तरुणासोबत प्रेमविवाह केला होता. मनोज हा एका विमा कंपनीत कर्मचारी आहे. आता दोघांनी सुजानगडमध्ये प्रेमविवाह केला. दोघेही सुरक्षेसाठी एसपी कार्यालयात पोहोचले. मुस्कान टाक एसपी ऑफिसमध्ये पोहोचली आणि सांगितलं की दोघेही एकमेकांना 5 वर्षांपासून ओळखत आहेत.

मनोज कुमार मेघवाल हा अराई येथे राहतो. तिथे दोघांची ओळख झाली आणि मोबाईलवर बोलू लागले. मुस्कानच्या घरच्यांची इच्छा होती की तिचं लग्न दुसऱ्या ठिकाणी व्हावे. त्यामुळे मुस्कानने मनोज कुमारसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. मुस्कान ही बीएची विद्यार्थिनी आहे. पेपरला बसण्यासाठी 9 फेब्रुवारीला ती घरातून निघाली होती. मनोज कुमार तिथे आधीच त्याची वाट पाहत होता.

मुस्कान पेपर न देता मनोज कुमारसोबत ट्रेनने सुजानगडला आली. दोघांनी 10 फेब्रुवारीला सुजानगडमध्ये प्रेमविवाह केला. 20 वर्षीय मुस्कानने सांगितले की, तिचे वडील मॅनेजर आहेत. आता दोघेही एसपी कार्यालयात पोहोचले आणि सुरक्षेची विनंती केली. त्यांच्या प्रेमविवाहामुळे घरातील सदस्य रागावून त्रास देऊ शकतात, अशी भीती त्यांना वाटत आहे.  

टॅग्स :marriageलग्न