शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या गिरीराज सिंहांना भाजप अध्यक्षांनी बजावले समन्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2020 16:28 IST

देवबंदमध्ये आतंकवादाची गंगा वाहत आहे. हाफीस सईद याच्यासारखे मोठ मोठे आतंकवादी येथून निघतात. या वक्तव्याची भाजप अध्यक्षांनी दखल घेत केंद्रीयमंत्री गिरीराज सिंह यांना समन्स बजावले आहे.

नवी दिल्ली - दिल्ली विधानसभा निवडणुकीत काही वादग्रस्त वक्तव्य पक्षाला त्रासदायक ठरल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे यानंतर भाजपमध्ये वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नेत्यांवर लक्ष ठेवले जाणार हे स्पष्ट झाले होते. त्याचीच प्रचिती वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या केंद्रीयमंत्री गिरीराज सिंह यांना आली आहे. 

खासदार गिरीराज सिंह कायमच वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. त्यांच्या एका वक्तव्यांची दखल घेत भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डी यांनी त्यांनी समन्स बजावले आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या काळात गिरीराज यांनी शाहीन बाग आंदोलनासंदर्भात वक्तव्य केले होते. शाहीन बाग मधील आंदोलन आता आंदोलन राहिले नसून येथे सुसाईड बॉम्बर तयार केले जात आहेत. देशाच्या राजधानीत देशाविरुद्ध योजना बनविली जात आहे. शाहिन बागेत एका महिलाचा मुलगा थंडीने मृत्यूमुखी पडला. मात्र ते त्याला शहीद म्हणत आहेत. हा सुसाईड बॉम्बच आहे, असं गिरीराज म्हणाले होते. 

या व्यतिरिक्त उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथे देखील त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. ते म्हणाले होते की, देवबंदमध्ये आतंकवादाची गंगा वाहत आहे. हाफीस सईद याच्यासारखे मोठ मोठे आतंकवादी येथून निघतात. या वक्तव्याची भाजप अध्यक्षांनी दखल घेत केंद्रीयमंत्री गिरीराज सिंह यांना समन्स बजावले आहे.