शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या गिरीराज सिंहांना भाजप अध्यक्षांनी बजावले समन्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2020 16:28 IST

देवबंदमध्ये आतंकवादाची गंगा वाहत आहे. हाफीस सईद याच्यासारखे मोठ मोठे आतंकवादी येथून निघतात. या वक्तव्याची भाजप अध्यक्षांनी दखल घेत केंद्रीयमंत्री गिरीराज सिंह यांना समन्स बजावले आहे.

नवी दिल्ली - दिल्ली विधानसभा निवडणुकीत काही वादग्रस्त वक्तव्य पक्षाला त्रासदायक ठरल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे यानंतर भाजपमध्ये वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नेत्यांवर लक्ष ठेवले जाणार हे स्पष्ट झाले होते. त्याचीच प्रचिती वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या केंद्रीयमंत्री गिरीराज सिंह यांना आली आहे. 

खासदार गिरीराज सिंह कायमच वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. त्यांच्या एका वक्तव्यांची दखल घेत भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डी यांनी त्यांनी समन्स बजावले आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या काळात गिरीराज यांनी शाहीन बाग आंदोलनासंदर्भात वक्तव्य केले होते. शाहीन बाग मधील आंदोलन आता आंदोलन राहिले नसून येथे सुसाईड बॉम्बर तयार केले जात आहेत. देशाच्या राजधानीत देशाविरुद्ध योजना बनविली जात आहे. शाहिन बागेत एका महिलाचा मुलगा थंडीने मृत्यूमुखी पडला. मात्र ते त्याला शहीद म्हणत आहेत. हा सुसाईड बॉम्बच आहे, असं गिरीराज म्हणाले होते. 

या व्यतिरिक्त उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथे देखील त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. ते म्हणाले होते की, देवबंदमध्ये आतंकवादाची गंगा वाहत आहे. हाफीस सईद याच्यासारखे मोठ मोठे आतंकवादी येथून निघतात. या वक्तव्याची भाजप अध्यक्षांनी दखल घेत केंद्रीयमंत्री गिरीराज सिंह यांना समन्स बजावले आहे.