शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

"अनुच्छेद ३७० हे भाजप सरकारच रद्द करेल, हे मला माहिती होते": गुलाम नबी आझाद

By देवेश फडके | Updated: February 14, 2021 14:03 IST

अनुच्छेद ३७० (Article 370) रद्द करण्याचे काम केवळ भाजप सरकारच करेल, हे मला माहिती होते. परंतु, ते इतक्या लवकर होईल, याची अपेक्षा नव्हती, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद (ghulam nabi azad) यांनी म्हटले आहे.

ठळक मुद्देअनुच्छेद ३७० भाजपशिवाय कोणीही रद्द करणार नाही याची माहिती होती - आझादजम्मू आणि काश्मीर केंद्र शासित होईल हे स्वप्नातही वाटले नव्हते - आझादकाँग्रेस आणि गांधी कुटुंब वेगळे होऊ शकत नाही - आझाद

नवी दिल्ली : हे सर्व आश्चर्यकारक आणि अचंबित करणारे आहे. अनुच्छेद ३७० (Article 370) रद्द करण्याचे काम केवळ भाजप सरकारच करेल, हे मला माहिती होते. परंतु, ते इतक्या लवकर होईल, याची अपेक्षा नव्हती, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी म्हटले आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी विविध विषयांवर आपली मते मांडली (ghulam nabi azad says i never expected from modi government to abrogate article 370)

काँग्रेसचे राज्यसभेतील खासदार असलेल्या गुलाम नबी आझाद (ghulam nabi azad) यांचा कार्यकाळ संपुष्टात आला. यावेळी अनेकांनी गुलाम नबी आझाद यांच्याबद्दल भावना व्यक्त केल्या होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अश्रु अनावर झाले होते. या सर्व प्रसंगानंतर गुलाम नबी आझाद गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेचा विषय बनले आहेत. 

"ही तुमची लोकशाही"; घरासमोरचा फोटो शेअर करत अब्दुल्लांचा मोदी सरकारवर हल्ला

अशी कल्पना आयुष्यात कधीच केली नव्हती

जम्मू काश्मीरला केंद्र शासित प्रदेशाचा दर्जा देण्यात येईल, अशी कल्पना मी उभ्या आयुष्यात केली नव्हती. मोदी सरकारने विशेष राज्याला कमीपणा आणण्यासाठी असे केले असून, जोपर्यंत जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा पुन्हा मिळत नाही, तोपर्यंत राजकीय स्थैर्य येणार नाही, असा दावा आझाद यांनी यावेळी बोलताना केला.

काँग्रेस आणि गांधी कुटुंब वेगळे नाही

सुमारे १८ वर्षे सोनिया गांधी पक्षाचे नेतृत्व करत आहेत. गांधी कुटुंबाशिवाय अन्य कुणाला अध्यक्षपद दिले जाऊ शकत नाही का, या प्रश्नावर आझाद म्हणाले की, गांधी कुटुंबाशिवाय अन्य कोणाला अध्यक्षपद दिल्यास अपेक्षित गोष्ट साध्य होणार नाही. काँग्रेस आणि गांधी कुटुंबीय यांना एकमेकांपासून वेगळे केलेच जाऊ शकत नाही. गांधी कुटुंबीयांचा त्याग मोठा आहे. इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनी देशासाठी बलिदान दिले. तुम्ही ते विसरू शकत नाही, असे नमूद करत प्रत्येक स्तरावर पक्षाला मजबूत करणे गरजेचे आहे. त्याशिवाय काँग्रेसची स्थिती सुधारणार नाही, असे मत आझाद यांनी नोंदवले. 

ग्रेटा थनबर्ग 'टूलकिट' प्रकरणी मोठी कारवाई; बेंगळुरूतून दिशा रवि अटकेत

प्रतिमा मलीन होण्याची पर्वा नाही

राज्यसभेतील प्रसंगानंतर माझी प्रतिमा मलीन होईल का, याची मला अजिबात पर्वा नाही. इंदिरा गांधी यांची स्तुती करताना मी अटल बिहारी वाजपेयी यांना पाहिले आहे. इंदिरा गांधी यांनीही अटल बिहारी वाजपेयी यांची स्तुती केली होती. अटलजींनी संजय गांधी यांचेही कौतुक केले होते. संजय गांधी यांनी अटलजींवर टीका केली, तरी अटलजींनी त्यांना पाठिंबा दिला होता. यांसारख्या अनेक गोष्टी मी पाहिल्या आहेत. आताच्या घडीचे नेते त्या उंचीवर जाऊ शकत नाहीत, असेही ते म्हणाले. 

"केरळमध्ये CAA लागू होणार नाही"; मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी केले स्पष्ट

मोदी पक्के भाजपवाले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याला निमंत्रित केले का, या प्रश्नावर उत्तर देताना आझाद म्हणाले की, मी पक्का काँग्रेसवाला आहे, हे मोदींना माहिती आहे आणि मोदी पक्के भाजपवाले आहेत, हेही मला माहिती आहे. काही झाले, तरी मी भाजपमध्ये प्रवेश करणार नाही, हे त्यांना माहिती आहे, असे आझाद यांनी सांगितले.

टॅग्स :Article 370कलम 370Jammu Kashmirजम्मू-काश्मीरGhulam Nabi Azadगुलाम नबी आझादcongressकाँग्रेसSonia Gandhiसोनिया गांधी