शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

"अनुच्छेद ३७० हे भाजप सरकारच रद्द करेल, हे मला माहिती होते": गुलाम नबी आझाद

By देवेश फडके | Updated: February 14, 2021 14:03 IST

अनुच्छेद ३७० (Article 370) रद्द करण्याचे काम केवळ भाजप सरकारच करेल, हे मला माहिती होते. परंतु, ते इतक्या लवकर होईल, याची अपेक्षा नव्हती, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद (ghulam nabi azad) यांनी म्हटले आहे.

ठळक मुद्देअनुच्छेद ३७० भाजपशिवाय कोणीही रद्द करणार नाही याची माहिती होती - आझादजम्मू आणि काश्मीर केंद्र शासित होईल हे स्वप्नातही वाटले नव्हते - आझादकाँग्रेस आणि गांधी कुटुंब वेगळे होऊ शकत नाही - आझाद

नवी दिल्ली : हे सर्व आश्चर्यकारक आणि अचंबित करणारे आहे. अनुच्छेद ३७० (Article 370) रद्द करण्याचे काम केवळ भाजप सरकारच करेल, हे मला माहिती होते. परंतु, ते इतक्या लवकर होईल, याची अपेक्षा नव्हती, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी म्हटले आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी विविध विषयांवर आपली मते मांडली (ghulam nabi azad says i never expected from modi government to abrogate article 370)

काँग्रेसचे राज्यसभेतील खासदार असलेल्या गुलाम नबी आझाद (ghulam nabi azad) यांचा कार्यकाळ संपुष्टात आला. यावेळी अनेकांनी गुलाम नबी आझाद यांच्याबद्दल भावना व्यक्त केल्या होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अश्रु अनावर झाले होते. या सर्व प्रसंगानंतर गुलाम नबी आझाद गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेचा विषय बनले आहेत. 

"ही तुमची लोकशाही"; घरासमोरचा फोटो शेअर करत अब्दुल्लांचा मोदी सरकारवर हल्ला

अशी कल्पना आयुष्यात कधीच केली नव्हती

जम्मू काश्मीरला केंद्र शासित प्रदेशाचा दर्जा देण्यात येईल, अशी कल्पना मी उभ्या आयुष्यात केली नव्हती. मोदी सरकारने विशेष राज्याला कमीपणा आणण्यासाठी असे केले असून, जोपर्यंत जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा पुन्हा मिळत नाही, तोपर्यंत राजकीय स्थैर्य येणार नाही, असा दावा आझाद यांनी यावेळी बोलताना केला.

काँग्रेस आणि गांधी कुटुंब वेगळे नाही

सुमारे १८ वर्षे सोनिया गांधी पक्षाचे नेतृत्व करत आहेत. गांधी कुटुंबाशिवाय अन्य कुणाला अध्यक्षपद दिले जाऊ शकत नाही का, या प्रश्नावर आझाद म्हणाले की, गांधी कुटुंबाशिवाय अन्य कोणाला अध्यक्षपद दिल्यास अपेक्षित गोष्ट साध्य होणार नाही. काँग्रेस आणि गांधी कुटुंबीय यांना एकमेकांपासून वेगळे केलेच जाऊ शकत नाही. गांधी कुटुंबीयांचा त्याग मोठा आहे. इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनी देशासाठी बलिदान दिले. तुम्ही ते विसरू शकत नाही, असे नमूद करत प्रत्येक स्तरावर पक्षाला मजबूत करणे गरजेचे आहे. त्याशिवाय काँग्रेसची स्थिती सुधारणार नाही, असे मत आझाद यांनी नोंदवले. 

ग्रेटा थनबर्ग 'टूलकिट' प्रकरणी मोठी कारवाई; बेंगळुरूतून दिशा रवि अटकेत

प्रतिमा मलीन होण्याची पर्वा नाही

राज्यसभेतील प्रसंगानंतर माझी प्रतिमा मलीन होईल का, याची मला अजिबात पर्वा नाही. इंदिरा गांधी यांची स्तुती करताना मी अटल बिहारी वाजपेयी यांना पाहिले आहे. इंदिरा गांधी यांनीही अटल बिहारी वाजपेयी यांची स्तुती केली होती. अटलजींनी संजय गांधी यांचेही कौतुक केले होते. संजय गांधी यांनी अटलजींवर टीका केली, तरी अटलजींनी त्यांना पाठिंबा दिला होता. यांसारख्या अनेक गोष्टी मी पाहिल्या आहेत. आताच्या घडीचे नेते त्या उंचीवर जाऊ शकत नाहीत, असेही ते म्हणाले. 

"केरळमध्ये CAA लागू होणार नाही"; मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी केले स्पष्ट

मोदी पक्के भाजपवाले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याला निमंत्रित केले का, या प्रश्नावर उत्तर देताना आझाद म्हणाले की, मी पक्का काँग्रेसवाला आहे, हे मोदींना माहिती आहे आणि मोदी पक्के भाजपवाले आहेत, हेही मला माहिती आहे. काही झाले, तरी मी भाजपमध्ये प्रवेश करणार नाही, हे त्यांना माहिती आहे, असे आझाद यांनी सांगितले.

टॅग्स :Article 370कलम 370Jammu Kashmirजम्मू-काश्मीरGhulam Nabi Azadगुलाम नबी आझादcongressकाँग्रेसSonia Gandhiसोनिया गांधी