शहरं
Join us  
Trending Stories
1
ISRO आणखी एक विक्रम रचणार! २०३५ पर्यंत भारतीय अंतराळ स्टेशन बनवणार, पाहा कसं दिसतं मॉडेल?
2
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
3
भाजपाला कधी मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष?; अचानक घडलेल्या घडामोडींमुळे झाला विलंब, काय आहे कारण?
4
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
5
Video: फटाक्यांच्या आवाजानं बैल उधळला, सगळीकडे गोंधळ; गावकऱ्यांची झाली पळापळ, १ जण जखमी
6
भारतावरील 'टॅरिफ'वरून' ट्रम्प यांच्यावर टीका केली, माजी अमेरिकन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराच्या घरावर एफबीआयचा छापा
7
टिकटॉक भारतात परत सुरू होणार? नवीन अपडेट आली, सोशल मीडियावर जोरदार चर्चा
8
Video: इलेक्टिक कारच्या ऑटोमेटिक फिचरनं घेतला मालकाचा जीव?; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल
9
ऑनलाइन फॅन्टसी गेमिंगवर अखेर बंदी; नवीन विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची मोहोर
10
अबब! ३५ लाख जप्त, २० लाखांची रोकड जाळली; सरकारी इंजिनिअरचा 'काळा' प्रताप उघड, नेमकं काय घडलं?
11
सोलापूर: माहेराहून पैसे आण, चाबकाने मारले फटके; काजलने आयुष्य संपवले, वैष्णवी हगवणे घटनेची पुनरावृत्ती?
12
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
13
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
14
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
15
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
16
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
17
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
18
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
19
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
20
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1

केंद्र सरकारचा कारभार केवळ टेलिव्हिजनच्या माध्यमातून,गुलाम नबी आझाद यांचा हल्लाबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 17:22 IST

केंद्र सरकार जमिनीवर नाही. त्यांचा कारभार हवेवर चालू आहे. टेलिव्हिजनच्या माध्यमातून  चालू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडून येताना दिलेली सारी आश्वासने विसरुन गेलेले आहेत.

औरंगाबाद, दि.13- केंद्र सरकार जमिनीवर नाही. त्यांचा कारभार हवेवर चालू आहे. टेलिव्हिजनच्या माध्यमातून  चालू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडून येताना दिलेली सारी आश्वासने विसरुन गेलेले आहेत आणि केवळ स्वत:चा एक अजेंडा राबवण्यात ते मश्गुल आहेत. त्यांच्यामुळे संघ परिवार सोडता सारेच घटक असुरक्षित असल्याचा आरोप आज येथे राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद यांनी पत्रपरिषदेत केला. ते इंदिरा गांधी जन्मशताब्दी वर्ष शुभारंभ सोहळ्याच्या उद्घाटनासाठी औरंगाबादेत आले होते.

गोरखपूर येथे आॅक्सिजनअभावी मुलांच्या मृत्युस योगी आदित्यनाथ सरकार जबाबदार आहे. त्यामुळे  योगी आदित्यनाथ यांनी तात्काळ राजीनामा दिला  पाहिजे, अशी मागणीही आझाद यांनी यावेळी केली.त्यांनी सांगितले की, गोरखपूर हा आदित्यनाथ यांचा मतदारसंघ आहे. पण मी केंद्रीय आरोग्य मंत्री असताना १७ वेळा गोरखपूरच्या त्या हॉस्पिटलला भेट दिलेली आहे. खराब पाण्यामुळे मृत्युचे प्रमाण खूपच वाढलेले होते. पण आम्ही अनेक उपाययोजना करुन मृत्युदर नियंत्रणात आणला. परंतु; आताआॅक्सिजनअभावी बालकांचे मृत्यु झाले आहेत. हा हॉस्पिटल प्रशासनाच्या  निष्काळजीपणाचा कळस होय. योगी सरकार याला जवाबदार आहे. म्हणून योगी आदत्यिनाथ यांनी नैतिकता स्वीकारुन राजीनामा दिला पाहिजे.

शरद पवार युपीएबरोबरच

नुकतीच दिल्लीत केंद्र सरकारविरोधी रणनिती आखण्यासाठी युपीएची बैठक झाली. त्याला युपीएचे सारे घटक पक्ष उपस्थित होते. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे उपस्थित नव्हते, त्यावरुन विविध तर्कवितर्क लढवले जात होते. याकडे लक्ष वेधता गुलाम नबी आझाद यांनी सांगितले की, मी शरद पवारांना त्यादिवशी फोनने संपर्क साधला होता. परंतु त्यांनी प्रकृती बरी नव्हती. त्यामुळेच ते येऊ शकले नाहीत. पण ते युपीएबरोबरच आहेत.

६५ देशांना भेटी देण्याचे विसरले नाहीत

गुलाम नबी आझाद यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघाती टिका केली. निवनू येण्यापूर्वी दहा कोटी युवकांंना नोकºया देण्याचे आश्वासन ते विसरले, शेतक-यांच्या शेतीमलाला उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा देण्याचे ते विसरले. आज शेतकरी रोज आत्महत्त्या करीत आहेत. त्याकडे त्यांचे लक्ष नाही. पण पाच वेळा अमेरिकेला भेट देण्याचे आणि एकूण ६५ देशांना भेटी देण्याचे ते बरे विसरले नाहीत, असा उपहास आझाद यांनी केला.

जयराम रमेश यांनी काँग्रेसला घरचा आहेर दिला आहे, याकडे लक्ष वेधता  आझाद म्हणाले, आमच्या पक्षात लोकशाही आहे. प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे. योग्य मतांचा पक्षात आदर केला जातो. 

गोरक्षेच्या मुद्यावरुन सध्या देशात उद्भवलेल्या परिस्थितीवर प्रतिक्रिया देताना त्यांनी सांगितले, हिंदू बांधवांना हे मान्य नाही. अनेक हिंदू बांधवांनी या घटनांचा निषेध नोंदवला आहे, 

जीएसटीमुळे देशातील अनेक उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर असून त्यामुळे मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी वाढणार असल्याचे त्यांनी सांगितले.

एक नवी लोकशाही.....

नरेंद्र मोदी यांच्या घणाघात घालताना गुलाम  नबी आझाद यांनी सांगितले की, एक नवी लोकशाही ते रुढ करीत आहेत. दिलेली आश्वासने पाळायची नाहीत. स्वत:चाच अजेंडा वापरायचा हा त्यांचा खाक्या दिसूनत येतो. आज देशात मिडियासुध्दा सुरक्षित नाही. महिला, अल्पसंख्यक, दलित, युवक, शेतकरी कुणीही सुरक्षित नाही. फक्त नरेंद्र मोदी आणि संघ परिवार तेवढा सुरक्षित दिसतो.ही ती नवी लोकशाही होय.

पत्रपरिषदेस, महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण, विधान परिषदेतील उपसभापती माणिकराव ठाकरे, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार, शहराध्यक्ष नामदेवराव पवार, आ. सुभाष झांबड, एम.एम. शेख, डॉ, कल्याण काळे, अरुण मुगदिया आदीची उपस्थिती होती.