शहरं
Join us  
Trending Stories
1
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
2
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
3
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
4
एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
5
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
6
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
7
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
8
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
9
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
10
Ahmedabad Plane Crash :या अपघाताला जबाबदार कोण? बोइंग विमानातील त्रुटी की...?
11
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
12
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
13
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
14
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
15
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
16
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
17
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
18
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण
19
ग्रुप बुकिंग केल्यास एसटीने थेट पंढरपूरला जाता येणार, ‘आषाढी’साठी ५ हजार विशेष बसेस : सरनाईक
20
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 

“कोरोना मोठं षडयंत्र, मुस्लिमांची वाढती लोकसंख्या विनाशाचं कारण; प्रत्येक हिंदूने ५-६ मुलांना जन्म द्यावा”

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2021 08:18 IST

गाजियाबादच्या डासना देवी मंदिराचे महंत नरसिंहानंद सरस्वती यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे.

ठळक मुद्देमास्क लावण्याचा आग्रह करून सरकार लोकांना आजारी पाडत आहे. हे खूप मोठं षडयंत्र मी मास्क घालत नाही कारण मला माझ्या इम्युनिटीवर विश्वास आहे. मी कोरोनाला मानत नाही. ज्यारितीने मुस्लिमांची संख्या वाढतेय ते पाहता महाविनाश होऊ शकतो.

मथूरा – उत्तर प्रदेशच्या मथूरा गाजियाबाद येथे महंत नरसिंहानंद यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. कोरोना महामारी हे सरकारचं षडयंत्र आहे. मास्क लावून लोकांना आजारी पाडलं जातंय असा दावा नरसिंहानंद यांनी केला आहे. मी ना मास्क लावणार ना कोरोना आहे असं मानणार असं अजब वक्तव्य त्यांनी केले आहे. इतकचं नाही तर भारतात मुस्लिमांची वाढती संख्या हिंदूंच्या विनाशाचं कारण बनणार असल्याचा वादग्रस्त दावाही त्यांनी केला.

ज्यांची इम्युनिटी कमी तेच मास्क लावतात

गाजियाबादच्या डासना देवी मंदिराचे महंत नरसिंहानंद सरस्वती एका कार्यक्रमात भाग घेण्यासाठी मथुरा येथे पोहचले होते. त्यांनी संतांच्या शिष्टमंडळाची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी कोरोनावरून सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले की, मास्क लावण्याचा आग्रह करून सरकार लोकांना आजारी पाडत आहे. हे खूप मोठं षडयंत्र आहे. मी मास्क लावत नाही. कोरोना आहे असं मला वाटत नाही. ज्यांची इम्युनिटी क्षमता कमी आहे. ते लोक मास्क लावतात असं त्यांनी सांगितले.

मला माझ्या इम्युनिटीवर विश्वास

मी मास्क घालत नाही कारण मला माझ्या इम्युनिटीवर विश्वास आहे. मी कोरोनाला मानत नाही. ज्यांची इच्छाशक्ती कमी अथवा कमकुवत आहे किंवा ज्यांच्या कुटुंबातील लोक त्यांच्यासोबत नाहीत तेच लोक कोरोनामुळे मृत्यू पावत आहेत. माझे सर्व माझ्या सोबत आहे असंही नरसिंहानंद म्हणाले.

तर गुरुवारी गोवर्धन परिक्रमा येथील रमणरेती आश्रमातील कार्यक्रमात त्यांनी वादग्रस्त विधान केले. भारतात मुस्लिमांची वाढती संख्या चिंतेचा विषय आहे. ज्याठिकाणी मुस्लिमांची संख्या वाढली आहे त्याठिकाणी ते इतरांना जिवंत सोडत नाहीत. हिंदू नेत्यांवर भरवसा ठेऊ नका. प्रत्येक हिंदूने कमीत कमी ५ ते ६ मुलांना जन्म द्यायला हवा. ज्यारितीने मुस्लिमांची संख्या वाढतेय ते पाहता महाविनाश होऊ शकतो. प्रत्येक हिंदूला शस्त्रधारी बनण्याची आवश्यकता आहे असंही महंत नरसिंहानंद सरस्वती म्हणाले.

 नरसिंहानंदांची वादग्रस्त मालिका

डासना मंदिरात पाणी पिण्यासाठी एक मुस्लीम मुलगा आला होता तेव्हा त्याला मारहाण करण्यात आली होती तेव्हा या मंदिराचे महंत असलेले नरसिंहानंद सरस्वती चर्चेत आले होते. त्यावेळी ते म्हणाले होते की, माझ्या समर्थकांनी त्या मुलाला मारलं कारण ते सर्व मुस्लिमांना संशयाच्या नजरेने पाहतात. आमच्या मंदिर परिसरात कोणत्याही मुस्लिमांना प्रवेश दिला जात नाही. मग तो पत्रकार असो वा सरकारी अधिकारी. हे मंदिर सनातन धर्माच्या भक्तांसाठी आहे असं ते म्हणाले होते.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMuslimमुस्लीमHinduहिंदू