शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

पाकिस्तानात अडकलेली गीता भारतात परतणार

By admin | Updated: October 15, 2015 23:41 IST

सुमारे १५ वर्षांपूर्वी चुकून पाकिस्तानमध्ये गेलेल्या व तेव्हापासून तेथेच अडकून पडलेल्या गीता या मूक-बधिर मुलीच्या बिहारमध्ये राहणाऱ्या कुटुंबाचा शोध लागला

नवी दिल्ली/ कराची : सुमारे १५ वर्षांपूर्वी चुकून पाकिस्तानमध्ये गेलेल्या व तेव्हापासून तेथेच अडकून पडलेल्या गीता या मूक-बधिर मुलीच्या बिहारमध्ये राहणाऱ्या कुटुंबाचा शोध लागला असून येत्या काही दिवसांत तिला भारतात परत आणण्यात येणार आहे.अशाच प्रकारे भारतात अडकलेल्या एका पाकिस्तानी मूक-बधिर मुलीला तिच्या नातेवाईकांकडे पोहोचविण्यासाठी जिवाचे रान करणाऱ्या ‘बजरंगी भाईजान’चे काल्पनिक कथानक सलमान खानने बॉलिवूडच्या रुपेरी पडद्यावर साकारल्यानंतर गीताची सत्यकथा प्रसिद्धी माध्यमांतून समोर आली व तिच्या भारतातील कुटुंबाचा शोध घेण्याच्या प्रयत्नांना गेल्या काही महिन्यांत गती आली होती.गीताच्या कुटुंबाचा शोध लागल्याचे शुभवर्तमान परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी गुरुवारी टिष्ट्वटरवर जाहीर केले. त्यांनी टिष्ट्वटमध्ये लिहिले, ‘गीता लवकरच भारतात परत येईल. आम्ही तिच्या कुटुंबाचा शोध घेतला आहे. डीएनए चाचणी केल्यानंतरच तिला तिच्या कुटुंबाच्या हवाली केले जाईल.’एधी फाऊंडेशन ही पाकिस्तानमधील सर्वात मोठी व प्रतिष्ठित स्वयंसेवी संस्था गेली अनेक वर्षे त्यांच्या कराचीतील अनाथालयात गीताचा सांभाळ करीत आहे. भारताच्या पाकिस्तानमधील दूतावासाने गुरुवारी एक फोटो एधी फाऊंडेशनकडे ईमेल केला. तो फोटो गीताला दाखविला असता तिने त्या फोटोतील व्यक्तींना ओळखले व ते आपले कुटुंबीय असल्याचे सांगितले. तो फोटो गीताचे वडील, सावत्र आई आणि भावंडांचा होता.गीताची कथा सर्वश्रुत झाल्यानंतर भारताच्या विविध भागांतील किमान चार कुटुंबे ती आपली मुलगी असल्याचे सांगत पुढे आली आहेत. त्यामुळे आताच्या ताज्या फोटोतील व्यक्ती आपले कुटुंबीय असल्याचे सांगत असली तरी त्यांचे रक्ताचे नाते डीएनए चाचणीने सिद्ध झाल्यानंतरच गीताला पाकिस्तानातून आणून या कुटुंबियांच्या हवाली केले जाईल, असा स्वराज यांच्या टिष्ट्वटचा अन्वयार्थ आहे.डीएनए चाचणी वगळता गीताच्या भारतीय नागरिकत्वाची खातरजमा करण्यासह तिला परत आणण्याच्या अन्य औपचारिकता पूर्ण होत आल्या असल्याचे परराष्ट्र मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले.स्वराज यांनी केलेल्या टिष्ट्वटला कराचीतून एधी फाऊंडेशनकडूनही दुजोरा मिळाला. फाऊंडेशनचे प्रवक्ते अन्वर काझमी यांनी सांगितले की, भारतीय दूतावासाने पाठविलेल्या फोटोतील व्यक्ती गीताने ओळखल्या असून ते आपले आई-वडील व चार भावंडे असल्याचे तिने सांगितले आहे.तरीही कोणत्याही संभ्रमास जागा राहू नये यासाठी फोटोतील या व्यक्ती व गीताचे एकदा स्काइपवर प्रत्यक्ष बोलणे करून दिले जावे, असे आम्हाला वाटते. गीतानेही त्यांच्याशी बोलण्याची (अर्थात खाणा-खुणा करून) इच्छा व्यक्त केली आहे, असेही काझमी यांनी सांगितले.सर्व औपचारिकता पूर्ण झाल्यावर गीताला येत्या २० ते २६ आॅक्टोबर दरम्यान केव्हा तरी भारतात परत आणले जाईल. पण नक्की दिवस अद्याप ठरलेला नाही, असे सूत्रांनी सांगितले. एधी फाऊंडेशनच्या सूत्रांनी फाऊंडेशनचे संस्थापक अब्दुल सत्तार एधी यांच्या पत्नी बिल्किस या स्वत: गीताला घेऊन भारतात जातील, असेही संकेत दिले. एधी दाम्पत्यानेच इतकी वर्षे गीताचा स्वत:च्या मुलीसारखा सांभाळ केला आहे.(लोकमत न्यूज नेटवर्क)>पाकिस्तानमधील अग्रगण्य मानवी हक्क कार्यकर्ते व तेथील त्याच खात्याचे माजी मंत्री अन्सार बर्नी यांनीही गीताला तिच्या कुटुंबाकडे परत पाठविण्यासाठी एखादे व्रत घेतल्यासारखी मोहीम हाती घेतली होती.>>गीता आणि तिच्या कुटुंबाचे सुमारे १५ वर्षांच्या ताटातुटीनंतर पुनर्मिलन होणार आहे. गीता पाकिस्तानात गेली कशी, याची नक्की माहिती नाही. परंतु अमृतसरहून अट्टारीमार्गे लाहोरला जाणाऱ्या रेल्वेगाडीतून ती चुकून पाकिस्तानात पोहोचली, असे मानले जाते. तेव्हा गीता ११ वर्षांची होती.