शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
2
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
3
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
4
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
5
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
6
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
7
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
8
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
9
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
10
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
11
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
12
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
13
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
14
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
15
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
16
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
17
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
18
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
19
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
20
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेत राज्यात ४० लाख कुटुंबांना गॅस जोडणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2019 05:03 IST

१०० टक्के शिधापत्रिका वाटपासाठी योजना : अन्न व नागरी पुरवठा मंत्री संभाजी पाटील निलंगेकर

मुंबई : राज्यातील पात्र कुटुंबांना शोधून त्यांना गॅस जोडणी देण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असून गेल्या महिनाभरात दीड लाख कुटुंबांना उज्ज्वला गॅस जोडणी देण्यात आली आहे. तर एप्रिलअखेर प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेत महाराष्ट्रात ४० लाख ६३ हजार कुटुंबांना गॅस जोडणी मिळाली आहे. तसेच वंचितांना १०० टक्के शिधापत्रिका वाटप करण्यासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय योजना लागू करत सर्व लाभार्थ्यांना याचा लाभ मिळवून देण्याचे काम अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून होत असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी मंगळवारी दिली.

मागील काळात काही कुटुंब गॅस जोडणीच्या लाभापासून वंचित होती. यातील सर्व पात्र कुटुंबांना शोधून त्यांना केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजना व विस्तारित प्रधानमंत्री उज्ज्वला योजना-२ मध्ये लाभ देण्याबाबत कार्यवाही सुरु होती. त्यात काही कुटुंब सदर योजनेसाठी पात्र होणार नाहीत. त्यामुळे राज्याची स्वतंत्र योजना सुरू करण्याच्या उद्देशाने पंडित दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय योजना महिनाभरात सुरू करण्यात आली. मोजक्या वेळेतच विक्रमी नोंदणी करण्यात आली.

विकेंद्रित धान्य खरेदीचा लाभसार्वजनिक वितरण व्यवस्था बळकट करीत असताना सर्वसामान्य शेतकऱ्यालाही विकेंद्रित धान्य खरेदी योजनेचा लाभ मिळाला आहे. सन २०१८-१९ मध्ये जवळपास सव्वा दोन लाख शेतकऱ्यांकडून धान व भरड धान्याची खरेदी करण्यात आली असून त्यांच्या बँक खात्यात रकमा जमा करणे शक्य झाले आहे.राज्यातील रास्त भाव धान्य दुकानांना लागणारे धान पूर्वी भारतीय अन्न महामंडळामार्फत मिळत होते. मात्र राज्य शासनाने विकेंद्रित धान खरेदी योजना सुरु केली. त्यानुसार शेतकºयांकडून धान खरेदी करुन ती थेट राज्य शासनाकडे सार्वजनिक वितरण व्यवस्थेसाठी वितरित करण्यात येत आहे. यामुळे शेतकºयांचाही फायदा होत आहे.नवप्रणालीमुळे लाभार्थ्यांची सोय...राज्यात पीडीएस-डाटा बेसमध्ये आधार फिडिंगची कार्यवाही ९५ टक्क्यांपेक्षा अधिक शिधापत्रिकेत झाली आहे, ज्यामुळे चुकीच्या असलेल्या १० लाख शिधापत्रिका रद्द करण्यात आल्या. परिणामी लाभार्थ्यांना नवीन प्रणालीमुळे खात्रीशीर व योग्य दराने धान्य मिळण्याची हमी झाली आहे, अशी माहितीही अन्न व नागरी पुरवठामंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली.शिधापत्रिका वाटप मोहिमेस भरघोस प्रतिसाद मिळाला असून १५ जुलै ते १५ आॅगस्ट २०१९ या कालावधीत संपूर्ण राज्यात १ लाख ५० हजार ५९६ कुटुंबांना पत्रिका वाटप करण्यात आली आहे. ज्याद्वारे ५ लाख ३४ हजार २१ लाभार्थ्यांना याचा लाभ मिळाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील योजनांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात गती मिळाली. महिनाभरात राज्यात दिलेल्या गॅस जोडणी आणि शिधापत्रिका वाटप हे त्याचेच उदाहरण असल्याचे संभाजी पाटील निलंगेकर म्हणाले.

टॅग्स :Pradhan Mantri Ujjwala Yojanaप्रधानमंत्री उज्ज्वला योजनाlaturलातूरMumbaiमुंबई