शहरं
Join us  
Trending Stories
1
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
2
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
3
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
4
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
5
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य तिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
6
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
7
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
8
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
9
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
10
वर्ल्डकप विजेता कर्णधार MS Dhoni केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या भेटीला, Video केला शेअर
11
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
12
"व्हायरल होईल माहित होतं पण...", आर्यन खानच्या सीरिजमधील कॅमिओवर इम्रान हाश्मी म्हणाला...
13
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
14
निवडणूक आयोगाने देशात 'मतदार यादी दुरुस्ती' मोहिमची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक
15
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
16
शेअर बाजार 'रॉकेट'! PSU बँक, रियल्टी आणि ऑटो स्टॉक्सला मागणी; पहा सेन्सेक्सच्या टॉप ५ कंपन्या
17
दोन जणांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लैंगिक छळ अन् 'HIV'चा उल्लेख...! अरुणाचल पोलिसांकडून फरार IAS अधिकाऱ्याला अटक 
18
कंगना रणौत भटिंडा न्यायालयात हजर, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या 'त्या' टिप्पणीबद्दल मागितली माफी
19
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
20
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेत राज्यात ४० लाख कुटुंबांना गॅस जोडणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2019 05:03 IST

१०० टक्के शिधापत्रिका वाटपासाठी योजना : अन्न व नागरी पुरवठा मंत्री संभाजी पाटील निलंगेकर

मुंबई : राज्यातील पात्र कुटुंबांना शोधून त्यांना गॅस जोडणी देण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असून गेल्या महिनाभरात दीड लाख कुटुंबांना उज्ज्वला गॅस जोडणी देण्यात आली आहे. तर एप्रिलअखेर प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेत महाराष्ट्रात ४० लाख ६३ हजार कुटुंबांना गॅस जोडणी मिळाली आहे. तसेच वंचितांना १०० टक्के शिधापत्रिका वाटप करण्यासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय योजना लागू करत सर्व लाभार्थ्यांना याचा लाभ मिळवून देण्याचे काम अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून होत असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी मंगळवारी दिली.

मागील काळात काही कुटुंब गॅस जोडणीच्या लाभापासून वंचित होती. यातील सर्व पात्र कुटुंबांना शोधून त्यांना केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजना व विस्तारित प्रधानमंत्री उज्ज्वला योजना-२ मध्ये लाभ देण्याबाबत कार्यवाही सुरु होती. त्यात काही कुटुंब सदर योजनेसाठी पात्र होणार नाहीत. त्यामुळे राज्याची स्वतंत्र योजना सुरू करण्याच्या उद्देशाने पंडित दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय योजना महिनाभरात सुरू करण्यात आली. मोजक्या वेळेतच विक्रमी नोंदणी करण्यात आली.

विकेंद्रित धान्य खरेदीचा लाभसार्वजनिक वितरण व्यवस्था बळकट करीत असताना सर्वसामान्य शेतकऱ्यालाही विकेंद्रित धान्य खरेदी योजनेचा लाभ मिळाला आहे. सन २०१८-१९ मध्ये जवळपास सव्वा दोन लाख शेतकऱ्यांकडून धान व भरड धान्याची खरेदी करण्यात आली असून त्यांच्या बँक खात्यात रकमा जमा करणे शक्य झाले आहे.राज्यातील रास्त भाव धान्य दुकानांना लागणारे धान पूर्वी भारतीय अन्न महामंडळामार्फत मिळत होते. मात्र राज्य शासनाने विकेंद्रित धान खरेदी योजना सुरु केली. त्यानुसार शेतकºयांकडून धान खरेदी करुन ती थेट राज्य शासनाकडे सार्वजनिक वितरण व्यवस्थेसाठी वितरित करण्यात येत आहे. यामुळे शेतकºयांचाही फायदा होत आहे.नवप्रणालीमुळे लाभार्थ्यांची सोय...राज्यात पीडीएस-डाटा बेसमध्ये आधार फिडिंगची कार्यवाही ९५ टक्क्यांपेक्षा अधिक शिधापत्रिकेत झाली आहे, ज्यामुळे चुकीच्या असलेल्या १० लाख शिधापत्रिका रद्द करण्यात आल्या. परिणामी लाभार्थ्यांना नवीन प्रणालीमुळे खात्रीशीर व योग्य दराने धान्य मिळण्याची हमी झाली आहे, अशी माहितीही अन्न व नागरी पुरवठामंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली.शिधापत्रिका वाटप मोहिमेस भरघोस प्रतिसाद मिळाला असून १५ जुलै ते १५ आॅगस्ट २०१९ या कालावधीत संपूर्ण राज्यात १ लाख ५० हजार ५९६ कुटुंबांना पत्रिका वाटप करण्यात आली आहे. ज्याद्वारे ५ लाख ३४ हजार २१ लाभार्थ्यांना याचा लाभ मिळाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील योजनांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात गती मिळाली. महिनाभरात राज्यात दिलेल्या गॅस जोडणी आणि शिधापत्रिका वाटप हे त्याचेच उदाहरण असल्याचे संभाजी पाटील निलंगेकर म्हणाले.

टॅग्स :Pradhan Mantri Ujjwala Yojanaप्रधानमंत्री उज्ज्वला योजनाlaturलातूरMumbaiमुंबई