शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने प्रवाशांना उडवले, तिघांची प्रकृती गंभीर; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
4
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
5
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
6
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
7
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
8
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
9
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
10
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
11
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
12
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
13
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
14
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
15
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
16
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
17
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
18
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
19
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
20
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार

यमुनाकाठ गणेशमय; राजधानीतील आनंदोत्सवाची उत्साहात सांगता

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2018 05:32 IST

राजधानीत गेल्या १० दिवसांपासून दिमाखात सुरू असलेल्या आनंदोत्सवाची रविवारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी मोठ्या भक्तिभावाने सांगता झाली.

नवी दिल्ली - राजधानीत गेल्या १० दिवसांपासून दिमाखात सुरू असलेल्या आनंदोत्सवाची रविवारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी मोठ्या भक्तिभावाने सांगता झाली. ‘गणपती बाप्पा मोरया, अगले बरस तू जल्दी आ’ असा जयजयकार करत दिल्लीकरांनी लाडक्या बाप्पाचे अत्यंत श्रद्धेने विसर्जन केले.यमुना नदीवरच्या घाटांसह अनेक पाणवठ्यांवर आज सकाळपासून मराठी-अमराठी भाविकांची लगबग होती. गणपती विसर्जन करताना भाविक भक्त आनंदीही होते आणि गणरायाला निरोप देताना भावूकही होत होते. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ असे आवाहन करणाऱ्या जयघोषामुळे यमुना नदीचा तीर ठिकठिकाणी दुमदुमला होता.गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेश प्रतिष्ठापना झाली. मोठ्या धामधुमीमध्ये गणपतीची अनेक घरांमध्ये आणि सार्वजनिक मंडळांमध्ये प्रतिष्ठापना झाली. दहा दिवस बाप्पाला वेगवेगळी पक्वान्ने, मोदक यांचा नैवेद्य दाखविण्यात आला. सांस्कृतिक, धार्मिक, सामाजिक उपक्रम साजरे झाले. आरती, प्रसाद यामुळे गेले १० दिवस आनंदाची लहर दिल्लीकरांमध्ये होती. उत्सवाचा परमोच्च बिंदू असलेल्या गणेश विसर्जनाचा थाट आज आगळाच होता.यादरम्यान दीड दिवसांच्या, पाच आणि सात दिवस प्रतिष्ठापना केल्या जाणाºया गणपतीचे विसर्जन झाले. अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती विसर्जनाची परंपरा सर्वाधिक प्रचलित आहे. त्यामुळे आज ११ व्या दिवशी दिल्लीत बाप्पांना त्यांच्या गावी निरोप देण्यासाठी उत्साही लगबग झाली होती. आलिशान मोटारींमध्ये आणि दुचाकीवरून, हातगाड्यांवरूनही लोक गणेशमूर्ती घाटांवर आणत होते. लहान मुले, मुलींनीही फेर धरत, फुगड्या खेळत, ढोलक्याच्या ठेक्यावर नृत्य करत मिरवणुकांमध्ये भाग घेतला. सर्वत्र छोट्या छोट्या मिरवणुका काढत, नाचत गात घरगुती आणि सार्वजनिक उत्सवातील मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. सकाळी ७ वाजून ४९ मिनिटे ते १२.१९, दुपारी २ ते ३.३० आणि सायंकाळी ६.३० ते रात्री ११ असे विसर्जनाचे मुहूर्त होते. त्यामुळे सकाळपासून रात्रीपर्यंत यमुनाकाठ गणेशमय झाला होता.राष्ट्रीय एकतेचे प्रतीकगणेशोत्सवाचे केवळ धार्मिक महत्त्व नाही. सांस्कृतिक आणि राष्ट्रीय एकतेचे प्रतीक म्हणूनसुद्धा गणपतीला महत्त्व आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनीही त्यांच्या शासन काळात संस्कृतीला उत्तेजन देण्यासाठी सार्वजनिक स्वरूपात गणेश पूजन सुरू केले. लोकमान्य टिळक यांनी १८५७ च्या अपयशी क्रांतीनंतर देश एकासूत्रात बांधण्यासाठी हा उत्सव सुरू केला होता.

टॅग्स :Ganesh Visarjanगणेश विसर्जनNew Delhiनवी दिल्ली