शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
4
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
5
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
6
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
7
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
8
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
9
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
10
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
11
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
12
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
13
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
14
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
15
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
16
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
17
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
18
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
19
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
20
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?

यमुनाकाठ गणेशमय; राजधानीतील आनंदोत्सवाची उत्साहात सांगता

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2018 05:32 IST

राजधानीत गेल्या १० दिवसांपासून दिमाखात सुरू असलेल्या आनंदोत्सवाची रविवारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी मोठ्या भक्तिभावाने सांगता झाली.

नवी दिल्ली - राजधानीत गेल्या १० दिवसांपासून दिमाखात सुरू असलेल्या आनंदोत्सवाची रविवारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी मोठ्या भक्तिभावाने सांगता झाली. ‘गणपती बाप्पा मोरया, अगले बरस तू जल्दी आ’ असा जयजयकार करत दिल्लीकरांनी लाडक्या बाप्पाचे अत्यंत श्रद्धेने विसर्जन केले.यमुना नदीवरच्या घाटांसह अनेक पाणवठ्यांवर आज सकाळपासून मराठी-अमराठी भाविकांची लगबग होती. गणपती विसर्जन करताना भाविक भक्त आनंदीही होते आणि गणरायाला निरोप देताना भावूकही होत होते. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ असे आवाहन करणाऱ्या जयघोषामुळे यमुना नदीचा तीर ठिकठिकाणी दुमदुमला होता.गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेश प्रतिष्ठापना झाली. मोठ्या धामधुमीमध्ये गणपतीची अनेक घरांमध्ये आणि सार्वजनिक मंडळांमध्ये प्रतिष्ठापना झाली. दहा दिवस बाप्पाला वेगवेगळी पक्वान्ने, मोदक यांचा नैवेद्य दाखविण्यात आला. सांस्कृतिक, धार्मिक, सामाजिक उपक्रम साजरे झाले. आरती, प्रसाद यामुळे गेले १० दिवस आनंदाची लहर दिल्लीकरांमध्ये होती. उत्सवाचा परमोच्च बिंदू असलेल्या गणेश विसर्जनाचा थाट आज आगळाच होता.यादरम्यान दीड दिवसांच्या, पाच आणि सात दिवस प्रतिष्ठापना केल्या जाणाºया गणपतीचे विसर्जन झाले. अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती विसर्जनाची परंपरा सर्वाधिक प्रचलित आहे. त्यामुळे आज ११ व्या दिवशी दिल्लीत बाप्पांना त्यांच्या गावी निरोप देण्यासाठी उत्साही लगबग झाली होती. आलिशान मोटारींमध्ये आणि दुचाकीवरून, हातगाड्यांवरूनही लोक गणेशमूर्ती घाटांवर आणत होते. लहान मुले, मुलींनीही फेर धरत, फुगड्या खेळत, ढोलक्याच्या ठेक्यावर नृत्य करत मिरवणुकांमध्ये भाग घेतला. सर्वत्र छोट्या छोट्या मिरवणुका काढत, नाचत गात घरगुती आणि सार्वजनिक उत्सवातील मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. सकाळी ७ वाजून ४९ मिनिटे ते १२.१९, दुपारी २ ते ३.३० आणि सायंकाळी ६.३० ते रात्री ११ असे विसर्जनाचे मुहूर्त होते. त्यामुळे सकाळपासून रात्रीपर्यंत यमुनाकाठ गणेशमय झाला होता.राष्ट्रीय एकतेचे प्रतीकगणेशोत्सवाचे केवळ धार्मिक महत्त्व नाही. सांस्कृतिक आणि राष्ट्रीय एकतेचे प्रतीक म्हणूनसुद्धा गणपतीला महत्त्व आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनीही त्यांच्या शासन काळात संस्कृतीला उत्तेजन देण्यासाठी सार्वजनिक स्वरूपात गणेश पूजन सुरू केले. लोकमान्य टिळक यांनी १८५७ च्या अपयशी क्रांतीनंतर देश एकासूत्रात बांधण्यासाठी हा उत्सव सुरू केला होता.

टॅग्स :Ganesh Visarjanगणेश विसर्जनNew Delhiनवी दिल्ली