शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

यमुनाकाठ गणेशमय; राजधानीतील आनंदोत्सवाची उत्साहात सांगता

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2018 05:32 IST

राजधानीत गेल्या १० दिवसांपासून दिमाखात सुरू असलेल्या आनंदोत्सवाची रविवारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी मोठ्या भक्तिभावाने सांगता झाली.

नवी दिल्ली - राजधानीत गेल्या १० दिवसांपासून दिमाखात सुरू असलेल्या आनंदोत्सवाची रविवारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी मोठ्या भक्तिभावाने सांगता झाली. ‘गणपती बाप्पा मोरया, अगले बरस तू जल्दी आ’ असा जयजयकार करत दिल्लीकरांनी लाडक्या बाप्पाचे अत्यंत श्रद्धेने विसर्जन केले.यमुना नदीवरच्या घाटांसह अनेक पाणवठ्यांवर आज सकाळपासून मराठी-अमराठी भाविकांची लगबग होती. गणपती विसर्जन करताना भाविक भक्त आनंदीही होते आणि गणरायाला निरोप देताना भावूकही होत होते. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ असे आवाहन करणाऱ्या जयघोषामुळे यमुना नदीचा तीर ठिकठिकाणी दुमदुमला होता.गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेश प्रतिष्ठापना झाली. मोठ्या धामधुमीमध्ये गणपतीची अनेक घरांमध्ये आणि सार्वजनिक मंडळांमध्ये प्रतिष्ठापना झाली. दहा दिवस बाप्पाला वेगवेगळी पक्वान्ने, मोदक यांचा नैवेद्य दाखविण्यात आला. सांस्कृतिक, धार्मिक, सामाजिक उपक्रम साजरे झाले. आरती, प्रसाद यामुळे गेले १० दिवस आनंदाची लहर दिल्लीकरांमध्ये होती. उत्सवाचा परमोच्च बिंदू असलेल्या गणेश विसर्जनाचा थाट आज आगळाच होता.यादरम्यान दीड दिवसांच्या, पाच आणि सात दिवस प्रतिष्ठापना केल्या जाणाºया गणपतीचे विसर्जन झाले. अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती विसर्जनाची परंपरा सर्वाधिक प्रचलित आहे. त्यामुळे आज ११ व्या दिवशी दिल्लीत बाप्पांना त्यांच्या गावी निरोप देण्यासाठी उत्साही लगबग झाली होती. आलिशान मोटारींमध्ये आणि दुचाकीवरून, हातगाड्यांवरूनही लोक गणेशमूर्ती घाटांवर आणत होते. लहान मुले, मुलींनीही फेर धरत, फुगड्या खेळत, ढोलक्याच्या ठेक्यावर नृत्य करत मिरवणुकांमध्ये भाग घेतला. सर्वत्र छोट्या छोट्या मिरवणुका काढत, नाचत गात घरगुती आणि सार्वजनिक उत्सवातील मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. सकाळी ७ वाजून ४९ मिनिटे ते १२.१९, दुपारी २ ते ३.३० आणि सायंकाळी ६.३० ते रात्री ११ असे विसर्जनाचे मुहूर्त होते. त्यामुळे सकाळपासून रात्रीपर्यंत यमुनाकाठ गणेशमय झाला होता.राष्ट्रीय एकतेचे प्रतीकगणेशोत्सवाचे केवळ धार्मिक महत्त्व नाही. सांस्कृतिक आणि राष्ट्रीय एकतेचे प्रतीक म्हणूनसुद्धा गणपतीला महत्त्व आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनीही त्यांच्या शासन काळात संस्कृतीला उत्तेजन देण्यासाठी सार्वजनिक स्वरूपात गणेश पूजन सुरू केले. लोकमान्य टिळक यांनी १८५७ च्या अपयशी क्रांतीनंतर देश एकासूत्रात बांधण्यासाठी हा उत्सव सुरू केला होता.

टॅग्स :Ganesh Visarjanगणेश विसर्जनNew Delhiनवी दिल्ली