शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

'शेतकऱ्याची गांधीगिरी', लाच मागणाऱ्या तहसिलदाराच्या जीपलाच बांधली म्हैस

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2019 18:20 IST

लगे रहो मुन्नाभाई या चित्रपटात संजय दत्त रेडिओ जॉकी बनून पीडित आणि दु:खी लोकांचे मोटीव्हेशन करत असतो.

भोपाळ - मध्य प्रदेशमधील एका शेतकऱ्याने लाचखोर तहसिलदारास चांगलाच धडा शिकवला आहे. आपल्या शेत जमिनीचे नामांतरण करण्यासाठी या शेतकऱ्याकेड तहसिलदाराने चक्क 1 लाख रुपयांची लाच मागितली होती. मात्र, आपल्याकडे पैसे नसल्याचे सांगत शेतकऱ्यांने चक्क आपली म्हैसच तहसिलदाराच्या जीपला बांधली. गरीब शेतकऱ्याच्या या गांधीगिरीमुळे तहसिलदाराची लाचखोरी चव्हाट्यावर आली आहे. 

लगे रहो मुन्नाभाई या चित्रपटात संजय दत्त रेडिओ जॉकी बनून पीडित आणि दु:खी लोकांचे मोटीव्हेशन करत असतो. तसेच अडचणीतून बाहेर पडण्याचा मार्गही सूचवत असतो. अगदी, चित्रपटात संजूबाबाने सांगितलेल्या गांधीगिरीटाईप या शेतकऱ्याने तहसिलदारला धडा शिकवला आहे. चित्रपटात पेन्शनच्या पैशासाठी लाच मागितल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यासमोर आपले कपडे उतरवत प्रत्येक वस्तूचा हिशेब देणारे गरीब आजोबा आपण पाहिले आहेत. आता, मध्य प्रदेशमधील एका गरीब शेतकऱ्यानेही तशीच गांधीगिरी केल्याचं पाहायला मिळालं. 

जमिनीचे नामांतरण (खातेफोड) करण्यासाठी एका शेतकऱ्याकडे चक्क एक लाख रुपयांची लाच मागितली. या शेतकऱ्याने तहसिलदारांना 50 रुपये दिले. मात्र, उर्वरीत 50 हजार रुपये दिल्याशिवाय काम करत नसल्यामुळे शेतकऱ्याने चक्क 50 हजार रुपयांच्या बदल्यात आपली म्हैसचं तहसिलदाराच्या जीपला बांधली. त्यानंतर, तहसिलदाराला काय करावे हेच कळेना. त्यामुळे लवकरच काम करतो, असे आश्वासन तहसिलदाराने दिले. तसेच पोलिसांना बोलावून ती म्हैसही घेऊन जाण्यास बजावले. त्यावर, पोलिसांनी जीपला बांधलेली म्हैस सोडवून एका झाडाला बांधली. त्यामुळे तात्पुरती तहसीलदाराची सुटका झाली. पण, या घटनेची वाच्यता सर्वत्र झाली असून या जीपचे फोटोही व्हायरल झाले आहेत. त्यामुळे तहसिलदारांपुढे यक्षप्रश्न उभा राहिला. तसेच ही बातमी जिल्हाधिकारी यांच्यापर्यंत पोहोचल्यामुळे त्यांनी एसडीएसकडे याबाबत विचारणा करत अहवाल मागितला आहे. 

देवगाव येथील शेतकरी लक्ष्मण यादव यांच्याबाबत ही घटना घडली असून खरगापूरचे तहसिलदार चौकशीच्या फेऱ्यात चांगलेच अडकले आहेत. दरम्यान, याप्रकरणी बलदेवगडच्या एसडीएम वंदना राजपूत यांनी चौकशी सुरू केली असून तहसिलदार सुनिल वर्मा दोषी आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे संकेतही राजपूत यांनी दिले आहेत. 

 

टॅग्स :FarmerशेतकरीMadhya Pradeshमध्य प्रदेश