शहरं
Join us  
Trending Stories
1
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
2
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
3
Video : ६०० वर्षांनंतर पहिल्यांदाच! भूकंपानंतर ज्वालामुखीचा उद्रेक; रशियाच्या कामचटकाचा धोका अजूनही टळेना
4
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
5
सुरक्षित गुंतवणुकीसह जबरदस्त रिटर्न! कमाईची उत्तम संधी आहेत या ५ स्कीम; मिळेल ८% पेक्षा जास्त व्याज
6
वसईची भयंकर घटना, मुंबईला धोक्याची घंटा!
7
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
8
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
9
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
10
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
11
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
12
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
13
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
14
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
15
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
16
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
17
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
18
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
19
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
20
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान

'चीन-अमेरिकेच्या व्यापारयुद्धामुळे भारताचे अच्छे दिन'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2018 20:35 IST

केंद्रीय कृषी राज्यमंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांचा पत्रकारांशी संवाद

नवी दिल्ली: चीन आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या व्यापारयुद्धामुळे भारताचे अच्छे दिन आल्याचं केंद्रीय कृषी राज्यमंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी म्हटलं आहे. जगातील दोन प्रमुख अर्थव्यवस्था असलेल्या चीन आणि अमेरिका यांच्यात सध्या व्यापारयुद्ध पेटलं आहे. त्यामुळे भारताला निर्यात वाढण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे, असं शेखावत म्हणाले. शेखावत  सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशन ऑफ इंडियाकडून आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय सोया संमेलनात सहभागी झाले होते. या कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. अमेरिका आणि चीनमध्ये व्यापारयुद्ध जोरात सुरू आहे. त्यामुळे भारताला निर्यात वाढवण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे, असं शेखावत यांनी म्हटलं. कृषी आधारित उत्पादनांची निर्यात वाढवण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. 'चीन आणि अमेरिकेतील व्यापार युद्ध सुरू असल्यानं भारतासारख्या कृषीप्रधान अर्थव्यवस्थेला मोठी संधी निर्माण झाली आहे. त्यामुळे कृषी उत्पादनांची निर्यात वाढवण्याचे प्रयत्न सरकारकडून सुरू आहे. सोयाबीनमधून तेल काढण्यात आल्यानंतरही त्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिनं असतात. त्यामुळे हे उत्पादन महत्त्वाचं आहे. याशिवाय सोयाबीनपासून तयार केली जाणारी काही उत्पादनं पशुंसाठीदेखील चांगला आहार ठरतात,' असं शेखावत म्हणाले. केंद्रीय कृषी राज्यमंत्र्यांनी काँग्रेसवरदेखील निशाणा साधला. मागील सरकारनं तीळ उत्पादकांचा विश्वासघात केला. त्यामुळे खाद्यतेलासाठी देशाला आयातीवर अवलंबून राहावं लागलं, असा आरोप शेखावत यांनी केला. 'परदेशांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी सरकारनं चारवेळा आयातशुल्कात वाढ केली. याशिवाय तिळाला मिळणारी किमान आधारभूत किंमतदेखील वाढवली. शेतकऱ्यांच्या कष्टाला मोल मिळावं यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत,' असं शेखावत यांनी सांगितलं. 

टॅग्स :USअमेरिकाchinaचीनIndiaभारतagricultureशेतीNarendra Modiनरेंद्र मोदी