शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

'चीन-अमेरिकेच्या व्यापारयुद्धामुळे भारताचे अच्छे दिन'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2018 20:35 IST

केंद्रीय कृषी राज्यमंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांचा पत्रकारांशी संवाद

नवी दिल्ली: चीन आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या व्यापारयुद्धामुळे भारताचे अच्छे दिन आल्याचं केंद्रीय कृषी राज्यमंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी म्हटलं आहे. जगातील दोन प्रमुख अर्थव्यवस्था असलेल्या चीन आणि अमेरिका यांच्यात सध्या व्यापारयुद्ध पेटलं आहे. त्यामुळे भारताला निर्यात वाढण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे, असं शेखावत म्हणाले. शेखावत  सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशन ऑफ इंडियाकडून आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय सोया संमेलनात सहभागी झाले होते. या कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. अमेरिका आणि चीनमध्ये व्यापारयुद्ध जोरात सुरू आहे. त्यामुळे भारताला निर्यात वाढवण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे, असं शेखावत यांनी म्हटलं. कृषी आधारित उत्पादनांची निर्यात वाढवण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. 'चीन आणि अमेरिकेतील व्यापार युद्ध सुरू असल्यानं भारतासारख्या कृषीप्रधान अर्थव्यवस्थेला मोठी संधी निर्माण झाली आहे. त्यामुळे कृषी उत्पादनांची निर्यात वाढवण्याचे प्रयत्न सरकारकडून सुरू आहे. सोयाबीनमधून तेल काढण्यात आल्यानंतरही त्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिनं असतात. त्यामुळे हे उत्पादन महत्त्वाचं आहे. याशिवाय सोयाबीनपासून तयार केली जाणारी काही उत्पादनं पशुंसाठीदेखील चांगला आहार ठरतात,' असं शेखावत म्हणाले. केंद्रीय कृषी राज्यमंत्र्यांनी काँग्रेसवरदेखील निशाणा साधला. मागील सरकारनं तीळ उत्पादकांचा विश्वासघात केला. त्यामुळे खाद्यतेलासाठी देशाला आयातीवर अवलंबून राहावं लागलं, असा आरोप शेखावत यांनी केला. 'परदेशांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी सरकारनं चारवेळा आयातशुल्कात वाढ केली. याशिवाय तिळाला मिळणारी किमान आधारभूत किंमतदेखील वाढवली. शेतकऱ्यांच्या कष्टाला मोल मिळावं यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत,' असं शेखावत यांनी सांगितलं. 

टॅग्स :USअमेरिकाchinaचीनIndiaभारतagricultureशेतीNarendra Modiनरेंद्र मोदी