शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

‘त्या’ विधानावरून गडकरी - राहुल लोकसभेत आमनेसामने!

By admin | Updated: April 23, 2015 01:42 IST

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी व भूपृष्ठवाहतूक मंत्री नितिन गडकरी यांचा वादळी सामना मंगळवारी लोकसभेत होणार होता.

नवी दिल्ली : काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी व भूपृष्ठवाहतूक मंत्री नितिन गडकरी यांचा वादळी सामना मंगळवारी लोकसभेत होणार होता. पण राहुल यांना यावर बोलण्याची परवानगी लोकसभाध्यक्षांनी नाकारल्याने गडकरींच्या उत्तरावर समाधान मानून दोघांनाही नर्मविनोदी शैलीत हा विषय संपविला. गडकरी म्हणाले, ‘चुकीचे असते तर याठिकाणी घाबरलोही असतो, पण चुकीचे बोललोच नाही म्हणून स्पष्टीकरण देत आहे.’‘शेतकऱ्याने देव व सरकारवर विश्वास ठेवायला नको’ असे विधान गडकरी यांनी आपल्या भाषणात केल्याचे राहुल गांधी यांनी २० एप्रिल रोजी लोकसभेत सांगितले होते.गडकरी म्हणाले, महाराष्ट्रातील अमरावती येथे १० एप्रिल रोजी कृषी प्रदर्शनात आपण म्हटले,‘शेतकऱ्यांवर संकटांची मालिका सुरू आहे. त्यांनी निराश होऊ नये. आत्महत्यांसारखा मार्ग पत्करू नये. शेतकऱ्यांनी उत्पादन वाढीसाठी आधुनिक तंत्र व साधनांचा वापर केला पाहिजे. सरकार व देवाच्या भरवशावर राहू नये. शेतकरी नवे प्रयोग व तंत्राचा वार करून आर्थिक व सामाजिक प्रगती करू शकतो.’गडकरी यांच्या स्पष्टीकरणानंतर सत्ताधाऱ्यांनी सुटकेचा निश्र्वास सोडला. मात्र विरोधकांचे समाधान होत नव्हते. तेव्हा राहुल यांनी माध्यमांमध्ये गडकरी यांचे विधान त्यांच्या नावाने प्रसिध्द झाले असल्याचा दाखला दिला व त्यास ज्योतिरादित्य शिंदे यांनीही दुजोरा दिला. तेव्हा गडकरी म्हणाले, कोणत्याच वृत्तपत्रात हे प्रसिध्द झालेले नाही. केवळ एका चॅनेलने हे विधान चुकीचे दाखविले. त्या आधारावर या सदस्यांनी आपल्या तोंडी ते घातले. (विशेष प्रतिनिधी)