शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने घेरले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
3
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
4
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
5
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
6
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
7
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
8
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
9
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
10
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
11
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
12
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
13
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
14
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
15
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
17
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
18
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
19
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
20
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?

कॅन्टोन्मेंट बोर्डांचे कामकाज अधिक व्यवहार्य होणार

By admin | Updated: September 22, 2015 00:58 IST

देशभरातल्या सर्व ६२ कॅन्टोन्मेंट बोर्डांच्या कामकाज पध्दतीत कालानुरूप व्यवहार्य बदल व्हावेत, कॅन्टोन्मेंट परिसरातल्या नागरी लोकजीवनाचे रहाणीमान सुधारावे,

सुरेश भटेवरा, नवी दिल्लीदेशभरातल्या सर्व ६२ कॅन्टोन्मेंट बोर्डांच्या कामकाज पध्दतीत कालानुरूप व्यवहार्य बदल व्हावेत, कॅन्टोन्मेंट परिसरातल्या नागरी लोकजीवनाचे रहाणीमान सुधारावे, परिसरातल्या जमिनी व स्थावर मिळकतींचे सहजसुलभ हस्तांतरण व इथल्या नागरी वस्त्यांना अनुकूल नियमन व्हावे, यासाठी संरक्षण मंत्रालयाने ब्रिटीशकालीन १९0३ सालच्या संरक्षण कामकाज कायद्यात आमुलाग्र परिवर्तन करण्याचे ठरवले आहे. स्पष्ट संकेत संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी संरक्षण मंत्रालयाच्या संसदीय सल्लागार समितीच्या बैठकीत याचे स्पष्ट संकेत दिल्याची विश्वसनीय माहिती सरकारी सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.या महत्वपूर्ण निर्णयाचा लाभ महाराष्ट्रातील अहमदनगर, औरंगाबाद, देहू रोड, खडकी, पुणे, कामटी व नाशिक जवळील देवळाली कॅन्टोन्मेंट परिसराला होईल.. याखेरीज कॅन्टोन्मेंट बोर्ड म्हणून नोंदणी नसलेल्या मुंबईतल्या उपनगरांसह पणजी येथील सैन्यदल तळांच्या परिसरालाही त्याचा लाभ होईल, अशी खात्रीलायक माहिती हाती आली आहे. या विभागाचे कामकाज ज्या ब्रिटीशकालिन १९0३ सालच्या संरक्षण कामकाज कायद्यानुसार चालते, त्याचे नियमन व संचालन अत्यंत किचकट आहे. जुने कालबाह्य नियम व नको तेवढे निर्बंध यामुळे प्रत्यक्ष कार्यवाहीत अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.कॅन्टोन्मेंट परिसरात नागरी वस्त्याही आहेत. कायदेशीर निर्बंधांमुळे इथल्या नागरी वाहतुकीचे रस्ते अनेकदा बंद केले जातात. पायाभूत सुविधांच्या दुरूस्त्यांमधे वारंवार अडथळे येतात. इतकेच नव्हे तर सर्वात महत्वाची बाब म्हणजे या भागातल्या जमिनींची मालमत्ता तसेच स्थावर मिळकतींचे हस्तांतरण, वापरातील बदल, जुन्या भाडेकरारांचे नूतनीकरण, जुन्या भाडेपट्ट्याचे फ्री होल्ड मिळकतीत रूपांतर, नवे भाडेकरार, कॅन्टोन्मेंट परिसरातल्या नव्या इमारतींच्या बांधकाम परवान्याचे नियम, जुन्या नियमांचे पुनरावलोकन अशा तमाम संवेदनशील गोष्टींमधे अनावश्यक विलंब होतो. एका दिवसात मिळू शकेल अशा सामान्य परवानगीला या क्लिष्ट व्यवस्थेमुळे वर्षभराचा कालावधी लागतो. सर्वसामान्य नागरीकांना त्याचा अतोनात त्रास सोसावा लागतो.देशातील १९ राज्यांमधील सैन्यदलाच्या ५ कमांड््स तसेच सामान्य जनतेची ब्रिटीशकालिन कायद्याच्या जाचातून कायमची सुटका व्हावी यासाठी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कामकाजात आमुलाग्र बदल करण्याचे ठरवले आहे. त्याचबरोबर १९0३ च्या जुन्या संरक्षण कामकाज कायद्यालाही अधिक व्यवहार्य बनवून, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या धर्तीवर जमीन व स्थावर मिळकतींच्या संदर्भातले अनेक कायदेशीर अधिकार स्थानिक नागरी व्यवस्थापनाकडे सोपवण्याचे स्पष्ट संकेत संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी संसदीय सल्लागार समितीच्या बैठकीत दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.२१ लाख लोकसंख्येला लाभदेशातल्या विविध राज्यात सध्या ६२ अधिकृत कॅन्टोन्मेंट बोर्ड आहेत. याखेरीज अधिसुचनेव्दारे निर्देषित ४५ सैन्यदलाच्या तळांचे परिसर आहेत. सुमारे १ लाख ८६ हजार ७३0 एकरांवर पसरलेल्या या भूभागावर २0११ च्या जनगणनेनुसार २0 लाख ९१ हजार ७३४ लोकसंख्या आहे. कॅन्टोन्मेंट व अधिसुचनेव्दारे घोषित अन्य सैन्यदल तळांच्या परिसरात लष्कराच्या विविध पलटणी व शस्त्रास्त्रांचा साठा असतो. देशाची संरक्षण सिध्दता व सैन्याच्या पलटणी देशभर विखुरलेल्या असाव्यात, या ब्रिटीशकालिन धोरणाची आजही अमलबजावणी तशाच प्रकारे चालू आहे. अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांप्रमाणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्याही नियमित निवडणुका होतात. त्यावर नागरी लोकप्रतिनिधी निवडून येत असले तरी मुलकी अधिकार आजही नामनियुक्त स्थानिक लष्करी अधिकाऱ्यांकडेच आहेत. संरक्षण मंत्र्यांच्या नव्या घोषणेमुळे हे चित्र आता बदलेल.