शहरं
Join us  
Trending Stories
1
'PM मोदी आणि ट्रम्प यांच्यात फोनवरून कसलीही चर्चा झाली नाही'; भारताने दावा फेटाळला, अमेरिकेच्या अध्यक्षांची 'पंचाईत'
2
'स्वतःच्या अपयशांसाठी शेजाऱ्यांना दोष देणे पाकिस्तानची जुनी सवय', अफगाण-पाक संघर्षावरुन भारताचे टीकास्त्र
3
टी-२० विश्वचषक २०२६ साठी पात्र ठरलेले सर्व २० संघ कोणते? येथे पाहा संपूर्ण यादी
4
Gujarat Cabinet Resignation: भाजपने गुजरातमधील सर्व मंत्र्यांचे राजीनामे का घेतले, आता पुढे काय घडणार?
5
वापरली अशी ट्रिक आणि दोन वर्षे फ्रीमध्ये ऑनलाइन ऑर्डर केलं जेवण, बिंग फुटताच...   
6
"इज्जत गेली गावाची, मग आठवण आली भावाची" एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
7
कुंभमेळा आयोजनाची कामं नियोजित वेळेत पूर्ण झाली पाहिजेत; मुख्य सचिव राजेश कुमारांचे निर्देश
8
VIDEO: बापरे !! महाकाय अजगराने महिलेच्या पायाला घातला विळखा, महिलेचे धाडस पाहून सारे थक्क
9
Kaps Cafe Firing: कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा गोळीबार; बिश्नोई टोळीच्या गोल्डी-सिद्धूने घेतली हल्ल्याची जबाबदारी
10
‘गर्भवती असाल तर सुट्टी घ्या, पैसे कमावण्यासाठी येता आणि बैठकीला अनुपस्थित राहता” महिला अधिकाऱ्यावर काँग्रेसचे आमदार भडकले
11
Bogus Voter: 'त्या' घरात ८०० नव्हे, पाचच सदस्यांचे वास्तव्य; जयंत पाटील यांच्या आरोपात किती सत्यता? काय आढळलं?
12
Video - ऑनलाईन ऑर्डर केलं फूड; डिलिव्हरी बॉयची अवस्था पाहून डोकंच फिरेल, दारू पिऊन...
13
RCB फॅन्स... सावधान!! विराट कोहली IPL मधून निवृत्त होणार? 'या' घटनेमुळे चर्चांना उधाण
14
खेडेगावातील लोकांसाठी परवडणाऱ्या बाईक्स, किंमत ५५ हजारांपासून सुरू; येथे पाहा संपूर्ण लिस्ट
15
Gujarat Cabinet: मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमंडळातील १६ मंत्र्यांनी दिला राजीनामा, गुजरातमध्ये मोठी राजकीय घडामोड
16
"मला सुटी नको, WFH द्या..."; आईच्या अपघातानंतर तरुणीची विनंती, कंपनीचा पुरावे मागत नकार
17
Laxmi Pujan 2025: दिवाळी उंबरठ्यावर, तरी लक्ष्मी पूजेच्या तारखेचा गोंधळ; पंचांग काय सांगतं?
18
Maithili Thakur News: मैथिली ठाकूर यांच्या उमेदवारीला भाजप नेत्यांचाच विरोध, अलीनगरमध्ये राजकारण का तापलं?
19
"ठाण्यात महापौर भाजपाचा बसेल, आम्ही गाफील नाही; स्वबळावर लढण्याची वेळ आली तर..."
20
बिरोबाचे दर्शन घेऊन निघाले, हल्लेखोरांनी पतीच्या पाठीत सत्तूरने केला वार; पत्नीचे मंगळसूत्र घेऊन पळाले

मालदीव ते बांगलादेश...; भारताच्या चहुबाजूनं चीन उभी करतंय शत्रूंची भलीमोठी फौज?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2024 16:18 IST

श्रीलंका, पाकिस्ताननंतर आता बांगलादेशातही हाहाकार माजला आहे. याठिकाणी कट्टरपंथींनी पंतप्रधान निवासस्थान, संसद याला लक्ष्य करून सत्तापालट केली आहे. 

नवी दिल्ली - भारताशेजारील राष्ट्र बांगलादेशात राजकीय संकट उभं राहिलं आहे. तिथल्या परिस्थितीवर भारत सरकार लक्ष ठेवून आहे. पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन शेख हसीना भारतात आल्या आहेत. त्यांची कट्टर शत्रू खालिदा जिया कुठल्याही क्षणी जेलच्या बाहेर येऊ शकते. त्यात खलिदा यांच्या बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीने संसद भंग करून लवकरात लवकर अंतरिम सरकार स्थापन करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे बांगलादेशातील या स्थितीला जबाबदार कोण हा प्रश्न उभा राहतो. बांगलादेशातील या अराजकतेमागे चीनचा हात असल्याचं बोललं जातं. 

रिपोर्टनुसार, चीन एक एक करून भारताच्या शेजारील राष्ट्रांमध्ये अराजकता निर्माण करत आहे. त्याचे प्रमुख कारण चीनवर या देशांचं अवलंबून राहणे आणि भारतासोबत संबंध बिघडवणे. पाकिस्तानपासून अफगाणिस्तान, श्रीलंका, मालदीवसारखे देश उदाहरण आहेत. आता या यादीत बांगलादेशचा समावेश झाला आहे. शेख हसीना यांची अवामी लीग पार्टी भारताचे समर्थक मानले जातात. शेख हसीना यांच्या कारकिर्दीत दिर्घकाळ भारताचे बांगलादेशासोबत चांगले संबंध राहिले आहेत. 

तर दुसरीकडे खालिदा जिया यांची बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी चीनची हस्तक मानली जाते. चीनबाबत त्यांची धोरणे कायम सॉफ्ट राहिली आहेत. त्यामुळे बांगलादेशात शेख हसीना यांच्या अवामी लीग पार्टीची सत्ता चीनला पसंत नव्हती. सध्या बांगलादेशात जी परिस्थिती उद्भवली आहे त्याचा सर्वाधिक फायदा चीनला होणार आहे. शेख हसीना मागील महिन्यात १० तारखेला चार दिवसीय चीन दौऱ्यावर होती. त्यावेळी चीनसोबत २० करार होणार होते. मात्र हा दौरा अर्धवट सोडून त्या ढाकाला परतल्या होत्या. त्यांचा दौरा अर्धवट सोडण्यामागचं कारण स्पष्ट नव्हते. मात्र ज्या उद्देशाने शेख हसीना चीनला गेल्या होत्या ते पूर्ण झालं नाही. त्यामुळे शेख हसीना रागावून पुन्हा बांगलादेशी आल्या. 

पाकिस्तान कर्जाच्या जाळ्यात अडकला

बांगलादेश एकमेव राष्ट्र नाही जो चीनच्या कुटील रणनीतीचा बळी पडला आहे. याआधी पाकिस्तानसोबत असेच झाले. आर्थिक संकटातून राजकीय उलथापालथीत देशाला कर्जात बुडवणं ही चीनची जुनी रणनीती आहे. चीन या स्ट्रॅटर्जीनुसार सर्वात आधी गरजू देशांना भरमसाठ कर्ज देते. हे कर्ज त्या देशातील मोठे प्रोजेक्टस अथवा इन्फास्ट्रक्चर गहाण किंवा भाड्याने दिले जाते. त्यानंतर कर्जाची परतफेड न झाल्यास चीन त्यावर कब्जा करते. 

मालदीव फसला, श्रीलंकाही डुबली

चीनच्या कुटील रणनीतीमुळे मालदीवही फसला आणि श्रीलंकाही कर्जात बुडाली. मालदीवमधील मुइज्जू सरकार चीन समर्थक मानलं जाते. त्यामुळे सुरुवातीपासून मालदीव भारत सरकारवर निशाणा साधत आहे. मागील वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी लक्षद्विपला गेले त्यानंतर मालदीव सरकारमधील ३ मंत्र्यांनी जोरदार टीका केली. त्यामुळे भारत आणि मालदीव या दोन्ही देशांतील संबंध ताणले. यावेळी मुइज्जू चीन दौऱ्यावर गेले. त्यानंतर त्यांनी भारताला लक्ष्य केले. परंतु भारताच्या वादामुळे मालदीवमधील टूरिज्म इंडस्ट्रीला मोठा फटका बसला. भारतीय पर्यटकांनी मालदीवला जाणे सोडले. 

नेपाळमध्येही चीन समर्थक सरकार

नेपाळमध्ये अलीकडेच सत्ता परिवर्तन झालं आहे. त्याठिकाणी चीन समर्थक केपी शर्मा ओली पंतप्रधानपदी आलेत. मागील काही महिन्यात नेपाळमध्ये राजकीय उलथापालथी झाल्या. ओली तिसऱ्यांदा पंतप्रधान बनलेत. मागील कार्यकाळात नेपाळ आणि भारत यांच्यातील संबंध तणावपूर्ण राहिले आहेत. 

बांगलादेशावर भारताची भूमिका 

बांगलादेशात लोक रस्त्यावर उतरलेत. तिथे अल्पसंख्याक हिंदू समाजाला टार्गेट करण्यात येत आहे. अल्पसंख्याकांच्या या स्थितीवर सरकार लक्ष देतंय. आंदोलनकर्त्यांनी पोलिसांवरही हल्ले केलेत. त्यामुळे परिस्थिती चिघळली आहे. राजीनाम्यानंतर शेख हसीना यांनी भारतात येण्याची परवानगी मागितली होती असं परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी संसदेत सांगितलं. 

टॅग्स :chinaचीनIndiaभारतBangladeshबांगलादेशNepalनेपाळPakistanपाकिस्तानSri Lankaश्रीलंका