शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
6
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
7
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
8
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
9
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
10
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
11
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
12
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
13
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
14
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
15
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
16
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
17
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
18
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
19
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
20
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ

कन्यादानापासून चमत्कारापर्यंत, मुठभर तांदळात सांगतात भविष्य, आता चावलवाले बाबा चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2023 09:24 IST

Chawal Wale Baba: सध्या वेगवेगळ्या कारणांमुळे वेगवेगळे बाबा चर्चेत आहेत. त्यातच आता आणखी एक बाबा चर्चेत आले आहेत. लोक त्यांना चावलवाले बाबा म्हणून संबोधतात.

सध्या वेगवेगळ्या कारणांमुळे वेगवेगळे बाबा चर्चेत आहेत. त्यातच आता आणखी एक बाबा चर्चेत आले आहेत. लोक त्यांना चावलवाले बाबा म्हणून संबोधतात. ते रनपेटा गावामध्ये भागवत कथा सांगण्यासाठी आले आहेत. भागवत कथेबरोबरच ते लोकांचे भूत, भविष्य आणि वर्तमानही सांगतात. त्यांच्या दरबारात लोक मुठभर तांदूळ घेऊन येतात. त्याच तांदळापासून भागवताचार्य शास्त्री लोकांची कुंडली तयार करतात. ते माता भगवती आणि ठाकूरजी यांना आराध्य मानतात. जेव्हा भविष्य सांगायचं असेल तेव्हा ते त्यांच्या मनातून त्यांच्या आराध्यांचं स्मरण करतात. मग चमत्कार घडतो, असे शास्त्री सांगतात.

कुंडली तयार करण्यासाठी कुठल्याही व्यक्तीची जन्मतारीख किंवा नाव जाणून घेण्याची गरज नाही. एक मुठभर तांदूळ वापरून पूर्ण कुंडली तयार होते. त्यांचं नाव काय आहे. कुठे जन्म झाला.  कुठल्या तारखेला जन्म झाला. त्याला काय त्रास आहेत. सर्व काही समोर येते. त्याच आधारावर त्यांच्या समस्यांचं निराकरण केलं जातं.

बाबांच्या दरबारातून भुतकाळ आणि भविष्यकाळाबाबत जाणून घेतल्यावर बाहेर आलेल्या लोकांना आत बसलेल्या बाबांनी मुठभर तांदूळ पाहून भविष्य सांगितलं का, त्यात किती सत्यता आहे, तुम्ही त्यावर किती समाधानी आहात? असं प्रसारमाध्यमांनी विचारलं असता लोकांनी बाबांना आधीपासूनच सारं काही माहिती असतं. त्यांच्या आशीर्वादाने समस्यांचं निराकरण होतं, असं सांगितलं.

आचार्य शास्त्री हे त्यांच्या चमत्कार आणि सिद्धीसाठी ओळखले जातात. सोबतच कुठेही पूजा भागवत कथा यातून जी काही दक्षिणा, वस्तू मिळतात, त्या ते गावातील गरीब मुलींना दान करतात. तिथून ते आपल्यासोबत काही आणत नाहीत. आतापर्यंत त्यांनी २८६ गरीब मुलींच्या विवाहासाठी तब्बल दोन कोटींहून अधिक रक्कम कन्यादान म्हणून खर्च केली आहे. तसेच जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत कन्यादान करत राहीन, असं ते सांगतात.

दरम्यान, बागेश्वर धाममधील पंडित धीरेंद्र शास्त्री यांच्याबाबतही आपलं मत मांडलं आहे. ते आध्यात्म आणि सनातनसाठी जे काही करत आहेत, ते कौतुकास्पद असल्याचे  आचार्य शास्त्रींनी म्हटलं आहे. मात्र धीरेंद्र शास्त्रींचा दरबार आणि आमचा दरबार यात जमीन अस्मानाचा फरक असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या दरबारात भूत प्रेत आदि बाधांशिवाय काही दिसत नाही. तर आमच्या दरबारात कुठलाही तंत्र किंवा मंत्र केला जात नाही. जे काही होतं ते ठाकूरजींच्या कृपेने होतं.

टॅग्स :Chhattisgarhछत्तीसगडIndiaभारत