शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

कन्यादानापासून चमत्कारापर्यंत, मुठभर तांदळात सांगतात भविष्य, आता चावलवाले बाबा चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2023 09:24 IST

Chawal Wale Baba: सध्या वेगवेगळ्या कारणांमुळे वेगवेगळे बाबा चर्चेत आहेत. त्यातच आता आणखी एक बाबा चर्चेत आले आहेत. लोक त्यांना चावलवाले बाबा म्हणून संबोधतात.

सध्या वेगवेगळ्या कारणांमुळे वेगवेगळे बाबा चर्चेत आहेत. त्यातच आता आणखी एक बाबा चर्चेत आले आहेत. लोक त्यांना चावलवाले बाबा म्हणून संबोधतात. ते रनपेटा गावामध्ये भागवत कथा सांगण्यासाठी आले आहेत. भागवत कथेबरोबरच ते लोकांचे भूत, भविष्य आणि वर्तमानही सांगतात. त्यांच्या दरबारात लोक मुठभर तांदूळ घेऊन येतात. त्याच तांदळापासून भागवताचार्य शास्त्री लोकांची कुंडली तयार करतात. ते माता भगवती आणि ठाकूरजी यांना आराध्य मानतात. जेव्हा भविष्य सांगायचं असेल तेव्हा ते त्यांच्या मनातून त्यांच्या आराध्यांचं स्मरण करतात. मग चमत्कार घडतो, असे शास्त्री सांगतात.

कुंडली तयार करण्यासाठी कुठल्याही व्यक्तीची जन्मतारीख किंवा नाव जाणून घेण्याची गरज नाही. एक मुठभर तांदूळ वापरून पूर्ण कुंडली तयार होते. त्यांचं नाव काय आहे. कुठे जन्म झाला.  कुठल्या तारखेला जन्म झाला. त्याला काय त्रास आहेत. सर्व काही समोर येते. त्याच आधारावर त्यांच्या समस्यांचं निराकरण केलं जातं.

बाबांच्या दरबारातून भुतकाळ आणि भविष्यकाळाबाबत जाणून घेतल्यावर बाहेर आलेल्या लोकांना आत बसलेल्या बाबांनी मुठभर तांदूळ पाहून भविष्य सांगितलं का, त्यात किती सत्यता आहे, तुम्ही त्यावर किती समाधानी आहात? असं प्रसारमाध्यमांनी विचारलं असता लोकांनी बाबांना आधीपासूनच सारं काही माहिती असतं. त्यांच्या आशीर्वादाने समस्यांचं निराकरण होतं, असं सांगितलं.

आचार्य शास्त्री हे त्यांच्या चमत्कार आणि सिद्धीसाठी ओळखले जातात. सोबतच कुठेही पूजा भागवत कथा यातून जी काही दक्षिणा, वस्तू मिळतात, त्या ते गावातील गरीब मुलींना दान करतात. तिथून ते आपल्यासोबत काही आणत नाहीत. आतापर्यंत त्यांनी २८६ गरीब मुलींच्या विवाहासाठी तब्बल दोन कोटींहून अधिक रक्कम कन्यादान म्हणून खर्च केली आहे. तसेच जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत कन्यादान करत राहीन, असं ते सांगतात.

दरम्यान, बागेश्वर धाममधील पंडित धीरेंद्र शास्त्री यांच्याबाबतही आपलं मत मांडलं आहे. ते आध्यात्म आणि सनातनसाठी जे काही करत आहेत, ते कौतुकास्पद असल्याचे  आचार्य शास्त्रींनी म्हटलं आहे. मात्र धीरेंद्र शास्त्रींचा दरबार आणि आमचा दरबार यात जमीन अस्मानाचा फरक असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या दरबारात भूत प्रेत आदि बाधांशिवाय काही दिसत नाही. तर आमच्या दरबारात कुठलाही तंत्र किंवा मंत्र केला जात नाही. जे काही होतं ते ठाकूरजींच्या कृपेने होतं.

टॅग्स :Chhattisgarhछत्तीसगडIndiaभारत