शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

कन्यादानापासून चमत्कारापर्यंत, मुठभर तांदळात सांगतात भविष्य, आता चावलवाले बाबा चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2023 09:24 IST

Chawal Wale Baba: सध्या वेगवेगळ्या कारणांमुळे वेगवेगळे बाबा चर्चेत आहेत. त्यातच आता आणखी एक बाबा चर्चेत आले आहेत. लोक त्यांना चावलवाले बाबा म्हणून संबोधतात.

सध्या वेगवेगळ्या कारणांमुळे वेगवेगळे बाबा चर्चेत आहेत. त्यातच आता आणखी एक बाबा चर्चेत आले आहेत. लोक त्यांना चावलवाले बाबा म्हणून संबोधतात. ते रनपेटा गावामध्ये भागवत कथा सांगण्यासाठी आले आहेत. भागवत कथेबरोबरच ते लोकांचे भूत, भविष्य आणि वर्तमानही सांगतात. त्यांच्या दरबारात लोक मुठभर तांदूळ घेऊन येतात. त्याच तांदळापासून भागवताचार्य शास्त्री लोकांची कुंडली तयार करतात. ते माता भगवती आणि ठाकूरजी यांना आराध्य मानतात. जेव्हा भविष्य सांगायचं असेल तेव्हा ते त्यांच्या मनातून त्यांच्या आराध्यांचं स्मरण करतात. मग चमत्कार घडतो, असे शास्त्री सांगतात.

कुंडली तयार करण्यासाठी कुठल्याही व्यक्तीची जन्मतारीख किंवा नाव जाणून घेण्याची गरज नाही. एक मुठभर तांदूळ वापरून पूर्ण कुंडली तयार होते. त्यांचं नाव काय आहे. कुठे जन्म झाला.  कुठल्या तारखेला जन्म झाला. त्याला काय त्रास आहेत. सर्व काही समोर येते. त्याच आधारावर त्यांच्या समस्यांचं निराकरण केलं जातं.

बाबांच्या दरबारातून भुतकाळ आणि भविष्यकाळाबाबत जाणून घेतल्यावर बाहेर आलेल्या लोकांना आत बसलेल्या बाबांनी मुठभर तांदूळ पाहून भविष्य सांगितलं का, त्यात किती सत्यता आहे, तुम्ही त्यावर किती समाधानी आहात? असं प्रसारमाध्यमांनी विचारलं असता लोकांनी बाबांना आधीपासूनच सारं काही माहिती असतं. त्यांच्या आशीर्वादाने समस्यांचं निराकरण होतं, असं सांगितलं.

आचार्य शास्त्री हे त्यांच्या चमत्कार आणि सिद्धीसाठी ओळखले जातात. सोबतच कुठेही पूजा भागवत कथा यातून जी काही दक्षिणा, वस्तू मिळतात, त्या ते गावातील गरीब मुलींना दान करतात. तिथून ते आपल्यासोबत काही आणत नाहीत. आतापर्यंत त्यांनी २८६ गरीब मुलींच्या विवाहासाठी तब्बल दोन कोटींहून अधिक रक्कम कन्यादान म्हणून खर्च केली आहे. तसेच जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत कन्यादान करत राहीन, असं ते सांगतात.

दरम्यान, बागेश्वर धाममधील पंडित धीरेंद्र शास्त्री यांच्याबाबतही आपलं मत मांडलं आहे. ते आध्यात्म आणि सनातनसाठी जे काही करत आहेत, ते कौतुकास्पद असल्याचे  आचार्य शास्त्रींनी म्हटलं आहे. मात्र धीरेंद्र शास्त्रींचा दरबार आणि आमचा दरबार यात जमीन अस्मानाचा फरक असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या दरबारात भूत प्रेत आदि बाधांशिवाय काही दिसत नाही. तर आमच्या दरबारात कुठलाही तंत्र किंवा मंत्र केला जात नाही. जे काही होतं ते ठाकूरजींच्या कृपेने होतं.

टॅग्स :Chhattisgarhछत्तीसगडIndiaभारत