शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
4
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
5
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
6
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
7
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
8
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
9
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
10
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
12
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
13
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
14
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
15
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
16
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
17
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
18
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
19
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

रात्रभर जीवाची मुंबई करण्याचा मार्ग मोकळा

By admin | Updated: June 29, 2016 14:12 IST

केंद्रीय मंत्रीमंडळाने 'मॉडेल शॉप्स अँड एस्टाब्लिशमेंट्स' कायद्याला मंजुरी दिल्याने आता देशभरातील विविध शहरातील मॉल्स, दुकाने रात्रभर सुरू राहू शकणार असून मुंबईतील नाईटलाइफचा मार्गही मोकळा झाला आहे.

ऑनलाइन लोकमत 
नवी दिल्ली, दि, २९ -  केंद्रीय मंत्रीमंडळाने 'मॉडेल शॉप्स अँड एस्टाब्लिशमेंट्स' ( दुकाने आणि आस्थापना) कायद्याला मंजुरी दिल्याने आता देशभरातील विविध शहरातील मॉल्स, दुकाने रात्रभर सुरू राहू शकणार आहेत. या कायद्यामुळे दिवसा काबाडकष्ट करणा-या सर्वसामान्य मुंबईकरांना नाईट लाइफ अनुभवता येऊ शकते. कारण उच्चभ्रूंसाठी नाइटलाइफ नवीन नाही, त्यांचा दिवस रात्रीच सुरु होते. युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी रात्री हॉटेल्स, दुकाने चालू ठेवण्याची मागणी केली होती.
केंद्रीय मंत्रीमंडळाने मॉडेल शॉप्स अँड एस्टाब्लिशमेंट्स' ( रेग्युलेशन ऑफ एम्प्लॉयमेंट अँड कंडिशन्स ऑफ सर्व्हिसेस) कायद्याला मंजुरी दिल्याने  रेस्टॉरंट्स्, दुकानेस बँका, मॉल्स, आयटी फर्म्स इत्यादी वर्षभर दिवसरात्र त्यांच्या सोयीनुसार  सुरू राहू शकतात. दरम्यान या कायद्यानुसार महिलांनाही पुरशा सुरक्षा व्यवस्थेच्या सहाय्याने रात्रपाळीत काम करता येणार आहे. तसेच कामाच्या ठिकाणी कर्मचा-यांना पिण्याचे पाणी, कॅन्टीन, प्राथमिक उपचारांचे साहित्य, स्वच्छतागृहे आदि सोयी सुविधाही उपलब्ध होणार आहेत. 
 
आणखी वाचा :
(नाइट लाइफला गृहविभागाचा तीव्र विरोध)
(नाइट लाइफ लटकले, रात्र बाजारपेठेला मंजुरी)
(‘नाइट लाइफ’ कुणासाठी?)
  •  
युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी नाईट लाईफबाबत आग्रही भूमिका घेतली होती. मुंबई रात्रभर जागी असते. उद्योग आणि सेवाक्षेत्र झपाट्याने विकसित होत आहे. शहराचे लाइफ बदलत चालले आहे. त्यामुळे कॅफे, दूध केंद्रे, केमिस्ट, मॉल, खाण्याची ठिकाणे रात्री खुली ठेवावी, असा प्रस्ताव आदित्य ठाकरेंनी मांडला होता. मुंबईतील अनिवासी भाग, काळा घोडा, नरिमन पॉईंट, वांद्रे-कुर्ला संकुल, मॉल आणि मनोरंजनाची ठिकाणे यांना विशेष करमणूक विभाग म्हणून जाहीर करण्याची सूचनाही आदित्य यांनी या प्रस्तावाद्वारे महापालिकेला केली होती.
 
 गृहविभागाने दर्शवला होता विरोध  
गृहविभागाने मात्र मुंबईतील नाइटलाइफला विरोध दर्शवला होता.  राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, पोलीस दलावरील ताण वाढेल, अशी भूमिका गृहविभागाने घेतली होती. मुंबई शहरातील नाईट लाईफ ही संकल्पना विशिष्ट उच्च वर्गासाठी आहे़ सामान्य माणसाच्या जीवनाशी हा विषय निगडीत नाही़ नाईट लाईफचा गैरफायदा असामाजिक घटक अधिक प्रमाणात घेऊ शकतात, अशी शंका गृहविभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली होती.