शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

फ्री उपचार करा, पण तुम्हीही खर्च उचला; राज्य सरकारची डोकेदुखी वाढली, केंद्राला लिहिले पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2024 08:17 IST

७० टक्के भार केंद्राने घेण्याची मागणी

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या आयुष्मान भारत योजनेंतर्गत पाच लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार मिळतात. आता ही रक्कम १० लाखांपर्यंत वाढविण्याच्या हालचाली सुरू आहेत. केंद्राच्या या निर्णयामुळे राज्य सरकारांची डोकेदुखी वाढली आहे. कारण, या योजनेवरील ६० ते ७० टक्के खर्च त्यांना करावा लागतो.

आयुष्मानमुळे तिजोरीवर बोजा वाढत असल्याने अनेक राज्यांना या योजनेला गती देणे अशक्य झाले असून, त्यांनी आता केंद्राला पत्र लिहून खर्च होणाऱ्या रकमेचा ६०% भार आपण उचलावा, अशी विनंती केली आहे. ही योजना लागू झाल्यापासून केंद्र सरकारने प्रीमिअमच्या रकमेचा आढावा घेतलेला नाही.

राज्यांचा खर्च नेमका कसा वाढतोय?काही राज्यांनी आरोग्यविमा कवच पाच लाखांहून वाढवून १० लाख रुपये केले आहे. त्यामुळे या योजनेवर राज्यांचा होत असलेला खर्च वाढला आहे. सुरुवातीच्या टप्प्यात केंद्र सरकारने तज्ज्ञांच्या मूल्यांकनावरून प्रति कुटुंब पाच लाख रुपयांच्या विम्यासाठी १,०५१ रुपये प्रीमिअमची रक्कम निश्चित केली होती. केंद्र आपल्या ६० टक्के हिश्श्यांतर्गत ६३०.६० रुपये एवढा प्रीमिअम देते. आता प्रीमिअम दोन हजार रुपयांच्या आसपास पोहोचला आहे. अशा परिस्थितीत ७५ टक्के रक्कम राज्यांच्या तिजोरीतून द्यावी लागत आहे.

सर्वाधिक कार्ड बनवणारी प्रमुख राज्येउत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, छत्तीसगड, आसाम, राजस्थान, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि झारखंड यांचा समावेश आहे. कोटी आयुष्मान कार्ड बनवण्यात आले आहेत. २६ राज्ये आणि सात केंद्रशासित प्रदेशांमध्ये आयुष्मान योजना आहे.

 

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारCentral Governmentकेंद्र सरकार