शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
5
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
6
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
7
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
8
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
9
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
10
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
11
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
12
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
13
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
14
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
15
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
16
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
17
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
18
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
19
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
20
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
Daily Top 2Weekly Top 5

फ्री उपचार करा, पण तुम्हीही खर्च उचला; राज्य सरकारची डोकेदुखी वाढली, केंद्राला लिहिले पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2024 08:17 IST

७० टक्के भार केंद्राने घेण्याची मागणी

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या आयुष्मान भारत योजनेंतर्गत पाच लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार मिळतात. आता ही रक्कम १० लाखांपर्यंत वाढविण्याच्या हालचाली सुरू आहेत. केंद्राच्या या निर्णयामुळे राज्य सरकारांची डोकेदुखी वाढली आहे. कारण, या योजनेवरील ६० ते ७० टक्के खर्च त्यांना करावा लागतो.

आयुष्मानमुळे तिजोरीवर बोजा वाढत असल्याने अनेक राज्यांना या योजनेला गती देणे अशक्य झाले असून, त्यांनी आता केंद्राला पत्र लिहून खर्च होणाऱ्या रकमेचा ६०% भार आपण उचलावा, अशी विनंती केली आहे. ही योजना लागू झाल्यापासून केंद्र सरकारने प्रीमिअमच्या रकमेचा आढावा घेतलेला नाही.

राज्यांचा खर्च नेमका कसा वाढतोय?काही राज्यांनी आरोग्यविमा कवच पाच लाखांहून वाढवून १० लाख रुपये केले आहे. त्यामुळे या योजनेवर राज्यांचा होत असलेला खर्च वाढला आहे. सुरुवातीच्या टप्प्यात केंद्र सरकारने तज्ज्ञांच्या मूल्यांकनावरून प्रति कुटुंब पाच लाख रुपयांच्या विम्यासाठी १,०५१ रुपये प्रीमिअमची रक्कम निश्चित केली होती. केंद्र आपल्या ६० टक्के हिश्श्यांतर्गत ६३०.६० रुपये एवढा प्रीमिअम देते. आता प्रीमिअम दोन हजार रुपयांच्या आसपास पोहोचला आहे. अशा परिस्थितीत ७५ टक्के रक्कम राज्यांच्या तिजोरीतून द्यावी लागत आहे.

सर्वाधिक कार्ड बनवणारी प्रमुख राज्येउत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, छत्तीसगड, आसाम, राजस्थान, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि झारखंड यांचा समावेश आहे. कोटी आयुष्मान कार्ड बनवण्यात आले आहेत. २६ राज्ये आणि सात केंद्रशासित प्रदेशांमध्ये आयुष्मान योजना आहे.

 

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारCentral Governmentकेंद्र सरकार