शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

वाहनचालकांना मोफत चहा अन् आरामाची सुविधा; अपघात टाळण्यासाठी 'या' सरकारचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2023 07:42 IST

बहुतांश रस्ते अपघात हे महामार्गावर होतात कारण ट्रक आणि अन्य वाहनचालकांना गाडी चालवताना डुलकी येते.

भुवनेश्वर - देशात दिवसेंदिवस रस्ते अपघातातील मृतांची संख्या वाढत चाललीय. दरवर्षी रस्ते अपघातात लाखो लोकांना त्यांचा जीव गमवावा लागतो. याच अपघातांना आळा घालण्यासाठी ओडिशा सरकारनं घेतलेल्या निर्णयाची देशभरात चर्चा सुरू झाली आहे. महामार्गावर चालणाऱ्या अवजड वाहनांचे अपघात रोखण्यासाठी ओडिशाचे परिवहन मंत्री तुकुनी साहू यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे. 

ओडिशा सरकारनं रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या अवजड वाहनचालकांना मोफत चहा देण्याची सुविधा करण्याचा निर्णय घेतला आहे. बहुतांश रस्ते अपघात हे महामार्गावर होतात कारण ट्रक आणि अन्य वाहनचालकांना गाडी चालवताना डुलकी येते. ही समस्या सोडवण्यासाठी राज्य सरकारने महामार्गावर मोफत चहा देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतल्याचे मंत्री साहू यांनी माध्यमांना सांगितले.

याबाबत मंत्री तुकुनी साहू यांनी म्हटलं की, सर्व जिल्ह्यातील रस्ते परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी महामार्गावरील रस्त्याशेजारी असलेल्या हॉटेल, ढाबे यांची गणना करून तिथे वाहन चालकांना रात्रीच्या वेळी डुलकी लागू नये यासाठी मोफत चहा देण्याची सुविधा करा.इतकेच नाही तर त्यांच्या आरामाची सोयही राज्य सरकारकडून केली जाईल. पुढील वर्ष १ ते ७ जानेवारी काळात रस्ते सुरक्षा सप्ताहात मोफत चहा देण्याची तयारी सरकारने केली आहे. 

भारतात रस्ते अपघातजागतिक आरोग्य संघटनेद्वारे रस्ता सुरक्षेवर जारी आकडेवारीनुसार, जगभरात रस्ते अपघातात मृतांची संख्या दरवर्षी १.१९ मिलियन इतकी आहे. भारतात ही संख्या जास्त आहे. भारतात रस्ते अपघातात २०२२ च्या रिपोर्टनुसार, २०१८ मध्ये १ लाख ५० हजार ७८५, वर्ष २०२१ मध्ये १ लाख ५३ हजार ७९२ इतकी मृतांची संख्या आहे. भारतात रस्ते अपघातात होणाऱ्या मृतांची संख्या २०२० च्या तुलनेत २०२१ मध्ये १७ टक्क्यांनी वाढली होती. २०२१ मध्ये एकूण रस्ते अपघात ४ लाख ३ हजार इतके झाले होते. जे १ वर्षापूर्वी ३ लाख ५४ हजार इतके होते.  

टॅग्स :OdishaओदिशाAccidentअपघात