शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

निवडणुकीत मोफत वस्तू, दारू, रोख रकमेचा महापूर, निवडणूक आयोगाची कारवाई; १७६६ कोटींचा ऐवज जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2023 06:42 IST

Assembly Election 2023: पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये मतदारांना भुलविण्यासाठी मोफत वाटण्यात येणाऱ्या वस्तू, रोख रक्कम, दारू तसेच काही ठिकाणी अमली पदार्थ असा एकूण १७६६ कोटी रुपयांचा ऐवज निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जप्त करण्यात आला.

नवी दिल्ली - मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, मिझोराम, तेलंगणा या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये मतदारांना भुलविण्यासाठी मोफत वाटण्यात येणाऱ्या वस्तू, रोख रक्कम, दारू तसेच काही ठिकाणी अमली पदार्थ असा एकूण १७६६ कोटी रुपयांचा ऐवज निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जप्त करण्यात आला. या राज्यांमध्ये निर्भय व भ्रष्टाचारमुक्त वातावरणात निवडणुका पार पडाव्यात म्हणून आयोगाने ही कारवाई केली.

आचारसंहिता भंग झाल्याची प्रकरणे- २०१८ साली या पाच राज्यांत जप्त केलेल्या ऐवजापेक्षा यंदाच्या विधानसभा निवडणुकांत ताब्यात घेतलेल्या ऐवजाची किंमत पाचपट असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. - स्थानिक निवडणूक यंत्रणेकडून आलेल्या तक्रारी व मिळालेल्या माहितीच्या आधारे निवडणूक आयोगाने वेळोवेळी कारवाई केली. - आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल आयोगाने अनेक नेत्यांना नोटीसाही बजावल्या. - रयतू बंधू योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना तेलंगणा सरकारने आर्थिक मदत देऊ केली. मात्र त्या राज्याच्या मंत्र्यांनी याबाबत जाहीर घोषणा केल्याने आचारसंहितेचा भंग झाला. - या प्रकरणी आयोगाने तेलंगणा सरकारला नोटीस बजावली. आचारसंहितेच्या काळातही शेतकऱ्यांना रब्बी पिकांबाबत आर्थिक मदत देण्यासाठी काही अटींवर आयोगाने सरकारला नंतर परवानगी दिली.

अनेक बड्या नेत्यांना बजावल्या नोटिसाविरोधकांनी केलेल्या तक्रारींनुसार विविध प्रकरणांत निवडणूक आयोगाने राहुल गांधी, प्रियंका गांधी, हिमंता बिस्वा सरमा, के. चंद्रशेखर राव या नेत्यांना निवडणूक आयोगाने नोटीसा जारी  केल्या होत्या. 

कर्नाटक सरकारला धरले धारेवरकर्नाटक सरकारने आपल्या योजनांविषयी तेलंगणातील वृत्तपत्रांत जाहिराती प्रसिद्ध केल्या होत्या. त्याविषयी आयोगाने कर्नाटकच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून स्पष्टीकरण मागविले होते. अशा जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी कर्नाटक सरकारने आमची परवानगी घेतली नव्हती. त्यामुळे निवडणूक आचारसंहितेचा भंग झाला असल्याचा मुद्दा आयोगाने या पत्रात उपस्थित केला होता. 

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगtelangana assembly electionतेलंगणा विधानसभा निवडणूक २०२३Madhya Pradesh Assembly Electionमध्यप्रदेश विधानसभा निवडणूक २०२३Rajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूक