शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
3
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
4
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
5
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
6
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
7
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
8
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
9
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
10
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
11
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
12
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
13
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
14
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
15
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
16
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
17
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
18
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
19
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
20
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
Daily Top 2Weekly Top 5

शशिकलांचा मार्ग मोकळा

By admin | Updated: February 7, 2017 02:21 IST

तामिळनाडूचे मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांचा राजीनामा राज्यपालांनी सोमवारी स्वीकारला.त्यामुळे व्ही. के. शशिकला यांचा मुख्यमंत्रीपदी आरूढ होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

चेन्नई : तामिळनाडूचे मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांचा राजीनामा राज्यपालांनी सोमवारी स्वीकारला.त्यामुळे व्ही. के. शशिकला यांचा मुख्यमंत्रीपदी आरूढ होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पनीरसेल्वम यांनी वैयक्तिक कारणांचा हवाला देत रविवारी पदाचा राजीनामा दिला होता. अद्रमुक प्रमुख शशिकला यांची पक्ष विधिमंडळ नेतेपदी निवड झाल्यानंतर त्यांनी राज्यपालांकडे राजीनामापत्र सादर केले होते. पर्यायी व्यवस्था होईपर्यंत तुम्ही आणि तुमच्या मंत्रिमंडळाने काम पाहावे, असे राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले आहे. मात्र शशिकला यांच्या शपथविधीला स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाख़ल झाली आहे. शपथविधी उद्याच होणार आहे. जयललिता यांच्यासह शशिकला यांच्यावरील भ्रष्टाचारांच्या आरोपाच्या खटल्याचा निकाल लवकरच लागणार आहे. तो लागेपर्यंत शशिकला यांचा शपथविधी होता नये, अशी ही याचिका आहे. मात्र न्यायालयाने त्याआधारे न्यायालयाने शपथविधी स्थगिती दिलेली नाही.मुख्यमंत्र्यांचा राजीनामा का?मुख्यमंत्री दिवंगत जे. जयललिता यांची पहिली पसंत असूनही ओ. पनीरसेल्वम यांनी शशिकलांसाठी मुख्यमंत्रीपद का सोडले, असा सवाल अद्रमुकचे माजी मंत्री के. पी. मुनुसामी यांनी केला आहे. राज्याच्या मुख्यमंत्री बनण्यासाठी शशिकला यांनी कोणता त्याग केला किंवा कोणता राजकीय इतिहास घडविला, असा सवालही त्यांनी केला. कोणताही राजकीय त्याग किंवा राजकीय पार्श्वभूमी नसताना अम्मांच्या निधनानंतर केवळ ६० दिवसांत त्यांनी पाठीमागील दरवाजाने प्रवेश केला, असा घणाघात त्यांनी केला. रक्तसंसर्गामुळे जयललिता यांचा मृत्यूमाजी मुख्यमंत्री जे. जयललिता यांचा मृत्यू रक्तातील संसर्गामुळे झाल्याचा दावा त्यांच्यावर अपोलो इस्पितळात उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सोमवारी केला. जयललिता यांना मधुमेह होता. त्यामुळे आजारपणात त्यांचे काही अवयव निकामी होत गेले. त्यांना नंतर श्वास घेणेही अवघड झाले होते, असे डॉ. रिचर्ड बेले यांनी सांगितले. त्यांना इस्पितळात दाखल करण्यात आले, त्या वेळी त्या बोलण्याच्याही स्थितीत नव्हत्या, असे ते म्हणाले. मात्र, ही सारी माहिती आज अचानक का देण्यात आली, याची चर्चा तामिळनाडूमध्ये सुरू झाली आहे.शशिकला यांची मुख्यमंत्रिपदासाठी आमदारांनी निवड केल्यानंतर आणि त्यांचा शपथविधी उद्या होणार असतानाच अपोलोच्या डॉक्टरांनी पत्रपरिषद घेतल्याबद्दल तर्कवितर्क व्यक्त होत आहेत. जयललिता यांच्या मृत्यूच्या चौकशीच्या मागणीसाठी या आधीच काही जण न्यायालयात गेले आहेत. तशी मागणी झाल्यावरही अपोलोतर्फे ही माहिती जाहीर कणऱ्यात आली नव्हती,त्या पात्र आहेत का?शशिकला यांना मुख्यमंत्रीपद देण्यात येत असल्याबद्दल ज्येष्ठ काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी अद्रमुकवर टीका केली आहे. शशिकला मुख्यमंत्री बनण्यास पात्र आहेत का, असा प्रश्न विचारण्याचा तामिळनाडूच्या जनतेला पूर्ण अधिकार आहे, असेही ते म्हणाले. आपल्या नेत्याची निवड करणे हा अद्रमुक आमदारांचा अधिकार आहे. तथापि, तो नेता मुख्यमंत्री बनण्यास योग्य आहे किंवा नाही हे विचारण्याचा जनतेला पूर्ण अधिकार आहे.