शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

४ कोटी कुटुंबांना मोफत वीज जोडणी, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते सौभाग्य योजनेचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 06:23 IST

अजूनही वीज नसलेल्या देशातील शहरे व खेड्यांमधील चार कोटी गरीब कुटुंबांना मोफत वीज पुरविण्याच्या ‘सहज बिजली हर घर योजने’चा (सौभाग्य योजना) शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी येथे केला.

नवी दिल्ली : अजूनही वीज नसलेल्या देशातील शहरे व खेड्यांमधील चार कोटी गरीब कुटुंबांना मोफत वीज पुरविण्याच्या ‘सहज बिजली हर घर योजने’चा (सौभाग्य योजना) शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी येथे केला.या योजनेला १६, ३२० कोटी रुपये खर्च येईल व तो सर्व निधी केंद्र सरकार उपलब्ध करून देईल. ही योजना पूर्ण झाल्यावर देशातील एकही घर विजेशिवाय राहणार नाही, असे पंतप्रधानांनी जाहीर केले. मोदी म्हणाले की, तीन वर्षांपूर्वी आम्ही सत्तेवर आलो, तेव्हा देशातील १८ हजार गावांमध्ये वीज नव्हती. आज ही संख्या तीन हजारांवर आली आहे. सरकारने योजलेल्या उपायांमुळे देश ‘वीजटंचाई’तून ‘वीज शिलकी’कडे जात आहे.सरकारने २६ कोटी एलईडी बल्ब देशभर वाटले, त्यामुळे आज ग्राहकांचे विजेचे बिल १३,७०० कोटी रुपयांनी कमी झाले आहे, असेही मोदी म्हणाले.वीज नसलेल्या घरांना वीज पुरविण्याखेरीज रॉकेलला पर्यायी इंधन पुरविणे, शिक्षण आणि आरोग्यसेवांमध्ये सुधारणा करणे, दळणवळण आणि सार्वजनिक सुरक्षा पुरविणे, तसेच रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध करून देण्यासोबतच महिलांचे दैनंदिन जीवन सुकर करणे इत्यादींचा समावेश असेल.लोकसभा निवडणुकांवर डोळातसे पाहिले, तर या योजनेत नवे असे काहीच नाही. किंबहुना, या आधीपासून सुरू असलेल्या विविध योजनांची एकत्र मोट बांधून, ही योजना नव्या नावाने सुरू केल्याचे दिसते.राजकीय निरीक्षकांच्या मते, मोदींनी ही योजना सुरू करून, एक प्रकारे २०१९ च्या सार्वजनिक निवडणुकीची तयारीच सुरू केली. देशात सरकारविषयी असंतोष व नाराजी वाढत असताना आणि दिलेली आश्वासने फारशी पूर्ण होत नसल्याचे दिसत असताना, सरकार काहीतरी करते आहे, हे दाखविणे गरजेचे होते.पं. दीनदयाळ यांच्या पुतळ््याचे अनावरणजनसंघ या भारतीय जनता पार्टीच्या पूर्वीश्रमीच्या अवताराचे एक संस्थापक, पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधांनी ही योजना देशाला समर्पित केली. पं. दीनदयाल ऊ र्जा भवनात हा कार्यक्रम झाला. तेल आणि भूगर्भ वायू महामंडळ या देशातील सर्वात मोठ्या तेल कंपनीच्या मुख्यालयासाठी ही इमारत ६०० कोटी रुपये खर्चून उभारण्यात आली आहे. तेथे मोदी यांनी पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्या पूर्णाकृती पुतळ््याचेही अनावरण केले.भाजपाच्या कार्यकारिणीमध्ये ‘नवभारत’साठी सहा कलमी अजेंडागरीबी, दहशतवाद, सांप्रदायिकता, जातीयवाद, भ्रष्टाचार आणि अस्वच्छता व कचºयापासून देशाला मुक्त करून, सन २०२२ पर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील ‘नवभारत’ साकार करण्यासाठी भारतीय जनता पार्टीने सोमवारी सहा कलमी अजेंडा राबविण्याचा निर्धार केला. येथील तालकटोरा स्टेडियममध्ये भरलेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या अधिवेशनात अशा आशयाचा ठराव संमत केला गेला.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी