शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

४ कोटी कुटुंबांना मोफत वीज जोडणी, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते सौभाग्य योजनेचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 06:23 IST

अजूनही वीज नसलेल्या देशातील शहरे व खेड्यांमधील चार कोटी गरीब कुटुंबांना मोफत वीज पुरविण्याच्या ‘सहज बिजली हर घर योजने’चा (सौभाग्य योजना) शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी येथे केला.

नवी दिल्ली : अजूनही वीज नसलेल्या देशातील शहरे व खेड्यांमधील चार कोटी गरीब कुटुंबांना मोफत वीज पुरविण्याच्या ‘सहज बिजली हर घर योजने’चा (सौभाग्य योजना) शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी येथे केला.या योजनेला १६, ३२० कोटी रुपये खर्च येईल व तो सर्व निधी केंद्र सरकार उपलब्ध करून देईल. ही योजना पूर्ण झाल्यावर देशातील एकही घर विजेशिवाय राहणार नाही, असे पंतप्रधानांनी जाहीर केले. मोदी म्हणाले की, तीन वर्षांपूर्वी आम्ही सत्तेवर आलो, तेव्हा देशातील १८ हजार गावांमध्ये वीज नव्हती. आज ही संख्या तीन हजारांवर आली आहे. सरकारने योजलेल्या उपायांमुळे देश ‘वीजटंचाई’तून ‘वीज शिलकी’कडे जात आहे.सरकारने २६ कोटी एलईडी बल्ब देशभर वाटले, त्यामुळे आज ग्राहकांचे विजेचे बिल १३,७०० कोटी रुपयांनी कमी झाले आहे, असेही मोदी म्हणाले.वीज नसलेल्या घरांना वीज पुरविण्याखेरीज रॉकेलला पर्यायी इंधन पुरविणे, शिक्षण आणि आरोग्यसेवांमध्ये सुधारणा करणे, दळणवळण आणि सार्वजनिक सुरक्षा पुरविणे, तसेच रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध करून देण्यासोबतच महिलांचे दैनंदिन जीवन सुकर करणे इत्यादींचा समावेश असेल.लोकसभा निवडणुकांवर डोळातसे पाहिले, तर या योजनेत नवे असे काहीच नाही. किंबहुना, या आधीपासून सुरू असलेल्या विविध योजनांची एकत्र मोट बांधून, ही योजना नव्या नावाने सुरू केल्याचे दिसते.राजकीय निरीक्षकांच्या मते, मोदींनी ही योजना सुरू करून, एक प्रकारे २०१९ च्या सार्वजनिक निवडणुकीची तयारीच सुरू केली. देशात सरकारविषयी असंतोष व नाराजी वाढत असताना आणि दिलेली आश्वासने फारशी पूर्ण होत नसल्याचे दिसत असताना, सरकार काहीतरी करते आहे, हे दाखविणे गरजेचे होते.पं. दीनदयाळ यांच्या पुतळ््याचे अनावरणजनसंघ या भारतीय जनता पार्टीच्या पूर्वीश्रमीच्या अवताराचे एक संस्थापक, पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधांनी ही योजना देशाला समर्पित केली. पं. दीनदयाल ऊ र्जा भवनात हा कार्यक्रम झाला. तेल आणि भूगर्भ वायू महामंडळ या देशातील सर्वात मोठ्या तेल कंपनीच्या मुख्यालयासाठी ही इमारत ६०० कोटी रुपये खर्चून उभारण्यात आली आहे. तेथे मोदी यांनी पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्या पूर्णाकृती पुतळ््याचेही अनावरण केले.भाजपाच्या कार्यकारिणीमध्ये ‘नवभारत’साठी सहा कलमी अजेंडागरीबी, दहशतवाद, सांप्रदायिकता, जातीयवाद, भ्रष्टाचार आणि अस्वच्छता व कचºयापासून देशाला मुक्त करून, सन २०२२ पर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील ‘नवभारत’ साकार करण्यासाठी भारतीय जनता पार्टीने सोमवारी सहा कलमी अजेंडा राबविण्याचा निर्धार केला. येथील तालकटोरा स्टेडियममध्ये भरलेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या अधिवेशनात अशा आशयाचा ठराव संमत केला गेला.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी