शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
"ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
3
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
4
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
5
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
6
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
7
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
8
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
9
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
10
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
11
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
13
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
14
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
15
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
16
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
17
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
18
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
19
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
20
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण

४ कोटी कुटुंबांना मोफत वीज जोडणी, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते सौभाग्य योजनेचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 06:23 IST

अजूनही वीज नसलेल्या देशातील शहरे व खेड्यांमधील चार कोटी गरीब कुटुंबांना मोफत वीज पुरविण्याच्या ‘सहज बिजली हर घर योजने’चा (सौभाग्य योजना) शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी येथे केला.

नवी दिल्ली : अजूनही वीज नसलेल्या देशातील शहरे व खेड्यांमधील चार कोटी गरीब कुटुंबांना मोफत वीज पुरविण्याच्या ‘सहज बिजली हर घर योजने’चा (सौभाग्य योजना) शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी येथे केला.या योजनेला १६, ३२० कोटी रुपये खर्च येईल व तो सर्व निधी केंद्र सरकार उपलब्ध करून देईल. ही योजना पूर्ण झाल्यावर देशातील एकही घर विजेशिवाय राहणार नाही, असे पंतप्रधानांनी जाहीर केले. मोदी म्हणाले की, तीन वर्षांपूर्वी आम्ही सत्तेवर आलो, तेव्हा देशातील १८ हजार गावांमध्ये वीज नव्हती. आज ही संख्या तीन हजारांवर आली आहे. सरकारने योजलेल्या उपायांमुळे देश ‘वीजटंचाई’तून ‘वीज शिलकी’कडे जात आहे.सरकारने २६ कोटी एलईडी बल्ब देशभर वाटले, त्यामुळे आज ग्राहकांचे विजेचे बिल १३,७०० कोटी रुपयांनी कमी झाले आहे, असेही मोदी म्हणाले.वीज नसलेल्या घरांना वीज पुरविण्याखेरीज रॉकेलला पर्यायी इंधन पुरविणे, शिक्षण आणि आरोग्यसेवांमध्ये सुधारणा करणे, दळणवळण आणि सार्वजनिक सुरक्षा पुरविणे, तसेच रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध करून देण्यासोबतच महिलांचे दैनंदिन जीवन सुकर करणे इत्यादींचा समावेश असेल.लोकसभा निवडणुकांवर डोळातसे पाहिले, तर या योजनेत नवे असे काहीच नाही. किंबहुना, या आधीपासून सुरू असलेल्या विविध योजनांची एकत्र मोट बांधून, ही योजना नव्या नावाने सुरू केल्याचे दिसते.राजकीय निरीक्षकांच्या मते, मोदींनी ही योजना सुरू करून, एक प्रकारे २०१९ च्या सार्वजनिक निवडणुकीची तयारीच सुरू केली. देशात सरकारविषयी असंतोष व नाराजी वाढत असताना आणि दिलेली आश्वासने फारशी पूर्ण होत नसल्याचे दिसत असताना, सरकार काहीतरी करते आहे, हे दाखविणे गरजेचे होते.पं. दीनदयाळ यांच्या पुतळ््याचे अनावरणजनसंघ या भारतीय जनता पार्टीच्या पूर्वीश्रमीच्या अवताराचे एक संस्थापक, पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधांनी ही योजना देशाला समर्पित केली. पं. दीनदयाल ऊ र्जा भवनात हा कार्यक्रम झाला. तेल आणि भूगर्भ वायू महामंडळ या देशातील सर्वात मोठ्या तेल कंपनीच्या मुख्यालयासाठी ही इमारत ६०० कोटी रुपये खर्चून उभारण्यात आली आहे. तेथे मोदी यांनी पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्या पूर्णाकृती पुतळ््याचेही अनावरण केले.भाजपाच्या कार्यकारिणीमध्ये ‘नवभारत’साठी सहा कलमी अजेंडागरीबी, दहशतवाद, सांप्रदायिकता, जातीयवाद, भ्रष्टाचार आणि अस्वच्छता व कचºयापासून देशाला मुक्त करून, सन २०२२ पर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील ‘नवभारत’ साकार करण्यासाठी भारतीय जनता पार्टीने सोमवारी सहा कलमी अजेंडा राबविण्याचा निर्धार केला. येथील तालकटोरा स्टेडियममध्ये भरलेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या अधिवेशनात अशा आशयाचा ठराव संमत केला गेला.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी