शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थ्यांनाही डीटीसीमधून मोफत प्रवास करण्याचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2019 19:12 IST

संपूर्ण दिल्लीत महिला प्रवाशांनी योजनेचा लाभ घेतला.

- टेकचंद सोनवणे

नवी दिल्ली : डीटीसी बसमधून मोफत प्रवास योजनेला दिल्लीकर महिलांनी मोठा प्रतिसाद दिला. भाऊबीजपासून ( २९ ऑक्टोबर) संपूर्ण दिल्लीत महिलांसाठी मोफत प्रवास योजनेची अंमलबजावणी सुरू झाली. नव्या योजनेचे लोकार्पण करताना मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांनादेखील मोफत प्रवास देण्याचे संकेत दिले. केजरीवालांच्या घोषणेमुळे विरोधकांच्या अस्वस्थतेत वाढ झाली आहे. 

बसेसमध्ये महिलांची गर्दी दिसली. पैसे वाचले म्हणून त्या आनंदी दिसल्या. समूहाने प्रवास करणा-या महिलांनी तर 'आज आपले किती पैसे वाचलेत?' याचीही मोजणी केली. महिनाभरात होणा-या बचतीवरही चर्चा बसमध्ये रंगली होती. अनेक महिलांनी 'केजरीवाल सरकार' करीत असलेल्या विविध योजनांची माहिती सोबतच्या प्रवासांना दिली. 

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोबाईल अ‍ॅपवरील संदेशात 'बहिणींना भावाकडून मोफत प्रवासाची भेट' देत असल्याची भावना व्यक्त केली. ही योजना महिला सशक्तीकरणाचे उत्तम उदाहरण ठरेल. सार्वजनिक वाहतूक परवडत नसल्याने अनेक मुलींना शाळा-महाविद्यालयातील शिक्षण सोडावे लागते. आता तशी वेळ एकाही विद्यार्थीनीवर येणार नाही. प्रवासावर एता एकही रूपया खर्च होणार नाही. लवकरच राज्य सरकार ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांनादेखील मोफत प्रवासाची सवलत देणार असल्याचे सूतोवाच केजरीवालांनी केले.

 - संपूर्ण दिल्लीत महिला प्रवाशांनी योजनेचा लाभ घेतला. डीटीसी बसमध्ये भाऊबीज व रक्षाबंधनाच्या दिवशी महिलांना मोफत प्रवासाची सवलत दिली जाते. त्यामुळे अनेक महिलांना आता ही सवलत नेहमी असेल, याची माहिती नसल्याचे दिसले.  ट्विटरवर अनेक तरूणींनी तिकीटासोबत सेल्फी टाकला. फेसबूकवरदेखील अनेकांची 'वॉल' अशा फोटोंनी ओसंडून वाहत होती.   

- केजरीवाल ट्विटमध्ये म्हणाले, आजपासून (भाऊबीज) बसमध्ये महिलांना मोफत प्रवास असेल. महिला सुरक्षा, सबलीकरण व अर्थकारणात महिलांचा सहभाग वाढवणारा हा ऐतिहासिक निर्णय आहे. गुलाबी तिकीट..दिल्ली कुटुंबातील प्रत्येक बहिणीस भाऊबीजेच्या शुभेच्छा. 

- नोएडा व एनसीआरमध्ये महिलांना मोफत प्रवास. विमानतळावरील बस सेवा, क्लस्टर बसेसमध्येही सवलत लागू. राज्य सरकाराच्या सेवेत असलेल्या महिलांनी योजनेचा लाभ घेतल्यास प्रवास भत्ता मिळणार नाही.  

- महिलांना गुलाबी तिकीट देण्यात आले.  अरविंद केजरीवालांचे छायाचित्र त्यावर होते. त्यावर संदेश होता- तुम्ही व तुमच्या कुटुंबाची भरभराट होवो, हीच माझी इच्छा. महिला सशक्त झाल्या तरच देशाचा विकास होईल.' 

राजीव गांधी म्हणत असत लोककल्याणासाठी असलेल्या १०० पैकी ८५ रूपयांमध्ये भ्रष्टाचार होतो. लोकांना केवळ १५ रूपये मिळतात. आम्ही (आप सरकार) सामान्य जनतेचे ८५ रूपये वाचवले आहेत.- अरविंद केजरीवाल.

टॅग्स :delhiदिल्लीNew Delhiनवी दिल्लीArvind Kejriwalअरविंद केजरीवाल