शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

केजरीवाल यांच्या विजयाचे चार शिलेदार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2020 04:56 IST

अविश्रांत परिश्रम; जोरात लढविला ‘आप’चा किल्ला

नवी दिल्ली: अरविंद केजरीवाल यांचे वर्णन आपचे सबकुछ असे स्थानिक नेते करतात. सरकार, पक्षाचा चेहरा ते असले, तरी निवडणूक प्रचारात चार शिलेदारांनी आपचा किल्ला मजबूत लढविला. मनीष सिसोदिया, आतिशी, गोपाल राय, सौरभ भारद्वाज यांच्याशिवाय आपचे यश अपूर्ण ठरते.

भ्रष्टाचारविरोधी आंदोलनातून मनीष सिसोदिया यांचे नेतृत्व पुढे आले. त्यांनीच शाळांचे मॉडेल विकसित केले. पारंपरिक विचारांचा पगडा असूनही त्यांनी कधीही आधुनिक विचारांशी गल्लत केली नाही. मित्रांशी वेदशास्त्रपुराणांवर चर्चा करणारे सिसोदिया कधीही अवैज्ञानिक भूमिका घेत नाहीत. केजरीवाल व मनीष सिसोदिया म्हणजे दोन विचार व एक निर्णय. पक्षांमध्ये असे समीकरण अभावानेच आढळते. भाजपमध्ये हे समीकरण मोदी-शहा जोडीचे आहे.

आतिशी परदेशात शिकल्यानंतर बड्या कंपनीतील नोकरी सोडून दिल्लीत परतल्या. शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदलाचे माध्यम प्राथमिक, माध्यमिक शाळाच आहेत, हे त्यांनी पक्षाला पटवून दिले. नंतरच शाळांची स्थिती पालटली. गेल्या अडीच-तीन वर्षांत त्यांनी एकही वादग्रस्त विधान केले नाही. परदेशी शिष्टमंडळांना दिल्लीच्या शाळांत आणण्याचे कसबही त्यांनी दाखविले.

गोपाल राय हे पक्षात केजरीवाल व सिसोदियांहून लोकप्रिय आहेत, असे म्हणतात. पक्ष बांधला गोपाल राय यांनीच. त्यामुळेच केजरीवाल यांनी त्यांच्यावर ७० मतदारसंघातून प्रचारयात्रा काढण्याची जबाबदारी सोपविली. नेते-कार्यकर्ते-समर्थक-स्वयंसेवक अशी विभागणी केल्याने पक्षाची मायक्रो मॅनेजमेंट यशस्वी झाली.

सरकार व पक्षाचा आश्वासक चेहरा म्हणजे सौरभ भारद्वाज. प्रश्नांना समाधानकारक उत्तरे देण्याच्या हातोटीमुळे त्यांचे पक्षातील स्थान भक्कम झाले. मतमोजणी सुरू होताच आपकडून टीव्हीवर आले ते भारद्वाजच. उच्चविद्याविभूषित असल्याने त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे. माध्यमांना न्यूज पुरविण्याची रणनीतीही त्यांनी उत्तम राबविली.

टॅग्स :delhi electionदिल्ली निवडणूकArvind Kejriwalअरविंद केजरीवालBJPभाजपाAAPआप