शहरं
Join us  
Trending Stories
1
GST: जीएसटी कपातीच्या बैठकीत मोठे राजकारण रंगले; विरोधी राज्यांचे अर्थमंत्री अडून बसले, गोष्ट मतदानापर्यंत गेलेली...
2
पुरामुळे भारत-पाकिस्तान सीमेचे मोठे नुकसान; ११० किमीच्या कुंपणाची पडझड, बीएसएफच्या ९० चौक्या पाण्यात
3
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेल्या नूर खान एअरबेसच्या दुरुस्तीचे काम सुरू; भारताने ब्राह्मोस टाकून उद्ध्वस्त केले होते
5
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
6
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
7
शिक्षक दिनानिमित्त मराठी Messages, Quotes, Whatsapp Status आणि Greetings शेअर करुन द्या लाडक्या शिक्षकांना शुभेच्छा!
8
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
9
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
10
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
11
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
12
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
13
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
14
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
15
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
16
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
17
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
18
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?
19
पतीचा पगार वाढला तर पत्नीची पोटगीची रक्कमही वाढणार?; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल
20
'आठ दिवसात गुन्हा दाखल करा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा'; महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी प्रकरणी या नेत्याने उपमुख्यमंत्र्यांना फटकारले

कोल्हापूर जिल्ह्यातील दहापैकी चार मतदारसंघांत युती ‘कमनशिबी’

By admin | Updated: September 24, 2014 00:41 IST

उसन्या उमेदवारावर भिस्त : युतीला शिरकाव होण्यात अडचणी

विश्वास पाटील - कोल्हापूर -जिल्ह्यातील दहापैकी चार मतदारसंघांत शिवसेना-भाजप युतीला आतापर्यंत कधीच गुलाल मिळालेला नाही. दोन्ही काँग्रेसच्या वर्चस्वाखालील जिल्हा व युतीकडून उसन्या उमेदवारांचा वापर ही त्याची महत्त्वाची कारणे आहेत. भाजपला कोल्हापूर दक्षिणची (पूर्वीचा करवीर) जागा कधीच जिंकता आलेली नाही. शिवसेनेच्या वाट्याला राधानगरी, भुदरगड, शिरोळ आणि चंदगड मतदारसंघात यश आलेले नाही. या चारही मतदारसंघांत दोन्ही काँग्रेसचा प्रभाव व संस्थात्मक भक्कम जाळे हे युतीचा शिरकाव होण्यात अडचणीचे ठरले.शिवसेना-भाजपच्या जागावाटपात आतापर्यंत गेल्या पंचवीस वर्षांत या दोन्ही पक्षांनी लढविलेल्या, परंतु कधीच जिंकता न आलेल्या जागांची अदलाबदल हा कळीचा मुद्दा ठरला आहे. शिवसेनेच्या वाट्यातील राज्यातील १६९ पैकी तब्बल ५९ जागा अशा आहेत की, त्यावर शिवसेना कधीच जिंकलेली नाही. त्यामुळे त्यातील काही जागा भाजपला हव्या आहेत. त्या द्यायला शिवसेना तयार नाही. त्यामुळे जागावाटप अडले आहे. त्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील अशा विधानसभा मतदारसंघांची माहिती घेतली असता चार मतदारसंघांत युतीच्या नशिबी कायम पराभव आला आहे. राज्यातील १९ जागांवर भाजपही कधीच जिंकलेला नाही. सध्याचा ‘कोल्हापूर दक्षिण’ हा पूर्वीचा करवीर मतदारसंघ होता. तो युतीत नेहमीच भाजपकडे राहिला. भाजपने मात्र या मतदारसंघातून प्रत्येक वेळी उसन्या उमेदवारास संधी दिली. २००४ च्या निवडणुकीत तर काँग्रेसचे अपक्ष उमेदवार असलेल्या सतेज पाटील यांनाच भाजपने पुरस्कृत केले. आपली एक जागा नाही वाढली तरी चालेल, परंतु राष्ट्रवादी काँग्रेसची एक जागा कमी होते, असा हिशेब भाजपने केला. पक्षाने आजपर्यंत या मतदारसंघांत कधीच पाच वर्षे तयारी करून व पक्षाच्याच कार्यकर्त्याला संधी दिली, असे घडलेले नाही. पक्षासाठी राबायचे कार्यकर्त्यांनी व ऐनवेळी दुसऱ्याच कुण्या धनदांडग्यांना उमेदवारी द्यायचे, असा व्यवहार भाजपकडून झाला आहे. आताही अमल महाडिक यांना उमेदवारी देण्याचे निश्चित झाले आहे, असे झाल्याने संघटना मोडीत निघाली आहे. पक्षासाठी राबूनही काही फायदा होत नाही, अशी भावना कार्यकर्त्यांत पसरली आहे.शिरोळ मतदारसंघातही काहीशी हीच स्थिती राहिली आहे. तिथेही या दोन्ही पक्षांचे फारसे संस्थात्मक काम नाही. संघटनाही वृत्तपत्रांत झळकणाऱ्या आंदोलनापुरतीच मर्यादित राहिली आहे. त्यामुळे दोन्ही काँग्रेसच्या विरोधातील पक्ष म्हणून स्वाभिमानी संघटनेने स्वत:चे भक्कम अस्तित्व या मतदारसंघांत तयार केल्यावर आता तर हे दोन पक्ष अस्तित्व टिकवण्यासाठीच संघर्ष करीत आहेत. प्रत्येक वेळेला नवा उमेदवार, असेच या मतदारसंघातही घडले आहे. गेल्या निवडणुकीतील उमेदवार राजू कुरडे यांना २८ हजार मते मिळाली; परंतु ते आता राष्ट्रवादीत आहेत आणि शिवसेना नव्या उमेदवाराच्या शोधात आहे. चंदगड मतदारसंघात खुद्द चंदगड व आजरा तालुक्यातही या दोन्ही पक्षांना मानणारा वर्ग आहे. या तालुक्यांचा रोजगाराच्या निमित्ताने मुंबईशी असणारा संपर्क हे त्याचे मुख्य कारण आहे. युतीच्या काळात १९९५ ला भरमू पाटील अपक्ष म्हणून निवडून आले व त्यांनी सरकारमध्ये जाऊन बिनबजेटचे राज्यमंत्रिपद मिळविले; परंतु युतीची सत्ता असतानाही तिथे पक्षाची संघटनात्मक बांधणी झाली नाही. आंदोलनाच्या पातळीवर शिवसेना सतत चर्चेत दिसते. विजय देवणे जिल्हाप्रमुख झाल्यावर संघटना मजबूत करण्याचे काही प्रयत्न झाले; परंतु युतीचा उमेदवार स्वबळावर निवडून येऊ शकेल अशी स्थिती नाही. आतातर ही जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वाट्याला जाण्याची चिन्हे आहेत, म्हणजे युतीच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा पाच वर्षे पोस्टरला नुसती खळच लावायची.1995राधानगरी-भुदरगड मतदारसंघ हा शिवसेनेच्या वाट्याला असतो. या मतदारसंघातील अपक्ष उमेदवार नामदेवराव भोईटे यांनी १९९५ ला युतीचे शासन आल्यावर त्या सरकारला पाठिंबा दिला; परंतु त्यांचा युतीला किंवा शिवसेनेला संघटनात्मक पातळीवर काहीच फायदा झाला नाही. तिथेही संघटना अस्तित्वात आहे. आता उमेदवारी द्यायचा विचार झाला तेव्हा ताकदीचा उमेदवार म्हणून प्रकाश आबिटकर यांना आयात करण्यात आले. या मतदारसंघात शिवसेनेची ताकद असली तर तिला फारच मर्यादा आहेत. भाजप औषधालाही कुठे दिसत नाही. दोन्ही काँग्रेसचा प्रभाव लोकांवर जास्त आहे.1995राधानगरी-भुदरगड मतदारसंघ हा शिवसेनेच्या वाट्याला असतो. या मतदारसंघातील अपक्ष उमेदवार नामदेवराव भोईटे यांनी १९९५ ला युतीचे शासन आल्यावर त्या सरकारला पाठिंबा दिला; परंतु त्यांचा युतीला किंवा शिवसेनेला संघटनात्मक पातळीवर काहीच फायदा झाला नाही. तिथेही संघटना अस्तित्वात आहे. आता उमेदवारी द्यायचा विचार झाला तेव्हा ताकदीचा उमेदवार म्हणून प्रकाश आबिटकर यांना आयात करण्यात आले. या मतदारसंघात शिवसेनेची ताकद असली तर तिला फारच मर्यादा आहेत. भाजप औषधालाही कुठे दिसत नाही. दोन्ही काँग्रेसचा प्रभाव लोकांवर जास्त आहे.