शहरं
Join us  
Trending Stories
1
PBKS vs DC : दिल्लीकर समीरची मॅच विनिंग फिफ्टी; पंजाबचं टेन्शन वाढलं! Qualifier 1 च्या शर्यतीत नवं ट्विस्ट
2
Vaishnavi Hagawane: वैष्णवीच्या बाळाला एकनाथ शिंदेंनी घेतलं जवळ, आईवडिलांना दिला धीर; काय घडलं?
3
IPL 2025 Qualifier 1 Race : आता MI चे कट्टर चाहतेही करतील CSK ला चीअर; कारण...
4
हे वागणं बरं नव्हं... खासदारांनी नाराजीचा सूर आळवत रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना धरले धारेवर 
5
'दोषींना पाठिशी घालणाऱ्यांवरही कारवाई करणार', एकनाथ शिंदेंनी घेतली वैष्णवी हगवणेच्या आईवडिलांची घेतली भेट
6
टायपिंगमधून सुटका! तुम्ही जो विचार कराल तो दिसेल स्क्रीनवर; मनातील विचारांनी मोबाइलही चालवता येणार
7
तीन वर्षांच्या मुलाला अंधार असलेल्या खोलीत नेले अन्...; उल्हासनगरात डान्स टीचरचा अल्पवयीन मुलावर अत्याचार
8
अंबा एक्सप्रेसची ओव्हरहेड वायर तुटली! विदर्भ एक्स्प्रेस, नागपूर-पुणे एक्स्प्रेससह अनेक गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले
9
EPF News: 7 कोटींपेक्षा जास्त लोकांसाठी गुड न्यूज! केंद्र सरकारने पीएफवरील व्याजाची केली घोषणा
10
मोठी कारवाई! मराठवाड्यातील चार जिल्ह्यात ४ कोटी ४८ लाखांचा माल जप्त, ४६४ जणांना अटक
11
'...तर कमी लोक मेले असते', पहलगाममध्ये कुंकू पुसलं गेलेल्या महिलांबद्दल भाजप खासदाराचं वादग्रस्त विधान
12
नाव ऐकून गुन्हेगारांना भरायची धडकी! नागपूरचे माजी पोलीस आयुक्त एस.पी. यादव यांचे मुंबईत निधन
13
वैष्णवी मृत्यु प्रकरण : 'कार, दोन पिस्तूल, चांदीची भांडी...' हगवणेंच्या घरून पोलिसांनी जप्त केलं घबाड
14
जिथं संधी मिळते तिथं तो 'बेस्ट'च देतो! टेस्टमधून डावललेल्या श्रेयस अय्यरनं पुन्हा दाखवली आपली ताकद
15
केरळजवळच्या समुद्रात बुडतंय परदेशी जहाज, तटरक्षक दलाने ९ जणांना वाचवले 
16
Mahayuti: छगन भुजबळ यांना काटशह देण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून नरेंद्र दराडे, राजकारण काय?
17
"ज्यांना अजून देश समजला नाही त्यांना परराष्ट्र धोरण काय समजणार?’’, बावनकुळेंची राहुल गांधींवर बोचरी टीका  
18
"मला बऱ्याच दिवसांपासून हे सांगायचं होतं की, मी अनुष्कासोबत रिलेशनशिपमध्ये'; तेज प्रताप यादवांनी दिली प्रेमाची कबुली
19
Sai Sudharsan: भारतीय संघात निवड झाल्यानंतर साई सुदर्शनची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
20
Crime: लग्न मोडल्याच्या रागातून दिवसाढवळ्या तरुणीची निर्घृण हत्या, घरात घुसून चिरला गळा

हल्ल्यामागे जैशचे चौघे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2016 03:24 IST

पठाणकोट हवाई तळावरील हल्ला घडवून आणण्यामागे जैश-ए-मोहम्मद या अतिरेकी संघटनेचा प्रमुख मौलाना मसूद अझहर, त्याचा भाऊ अब्दुल रौफ असगर या दोघांसह चौघांचा

नवी दिल्ली : पठाणकोट हवाई तळावरील हल्ला घडवून आणण्यामागे जैश-ए-मोहम्मद या अतिरेकी संघटनेचा प्रमुख मौलाना मसूद अझहर, त्याचा भाऊ अब्दुल रौफ असगर या दोघांसह चौघांचा समावेश असल्याचा दावा भारताने गुप्तचर यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीच्या हवाल्याने केला आहे. असगर हा आयसी-८१४ या विमानाच्या कंदहार अपहरण प्रकरणाचा सूत्रधार होता.लाहोरजवळ या हल्ल्याचा कट रचल्याचा दावाही तपास संस्थेने केला असल्याचे उच्चस्तरीय सूत्रांनी स्पष्ट केले. हल्ल्यात सहभागी चौघांबाबत विस्तृत माहिती पाकिस्तानला योग्य माध्यमातून पुरविण्यात आली आहे. पठाणकोट हल्ल्यातील कटकर्त्यांवर ठोस कारवाई हीच पाकिस्तानसोबतची भविष्यातील चर्चेसाठी अट राहील, असा दावाही सूत्रांनी केला. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार नासेर खान जानजुआ यांच्याशी या मुद्यावर चर्चा करतानाच आवाजाचे नमुने आणि पुरावे सादर केले आहेत.कंदहार विमान प्रकरणाचा सूत्रधार होता असगरपठाणकोट हल्ल्यातील कटकर्त्यांमध्ये अझर, रौफ, अशफाक आणि कासीम या चौघांच्या नावांची ओळख पटविण्यात आली आहे. अब्दुल रौफ असगर हा १९९९ मध्ये भारताच्या आयसी-८१४ या विमानाचे कंदहारला अपहरण करण्यात मुख्य सूत्रधार होता. अतिरेकी अझहर याच्यासह तीन अतिरेक्यांची भारतीय कारागृहातून सोडण्याच्या बदल्यात प्रवाशांची मुक्तता करण्यात आल्यानंतर ओलिस नाट्यावर पडदा पडला होता. या चौघांना ताब्यात देण्याची मागणी भारताने केली आहे.(लोकमत न्यूज नेटवर्क)चर्चा पुन्हा वांध्यात : निर्णायक कारवाई करा; भारताने ठणकावलेपठाणकोट हल्ल्यात पाकिस्तानी अतिरेक्यांचा सहभाग असल्याची गुप्तचर यंत्रणेकडून मिळालेली माहिती आम्ही पुरविली आहे, आता तडकाफडकी कारवार्ई करा, त्यावरच चर्चा निर्भर राहील, असे भारताने ठणकावले आहे.हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकशी होऊ घातलेली सचिव स्तरावरील चर्चा पुन्हा वांध्यात सापडली आहे.विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी पत्रपरिषदेत भारताची भूमिका मांडली. मात्र पत्रकारांनी प्रश्नांचा भडिमार करूनही त्यांनी चर्चा होणार की नाही याबाबत भाष्य टाळले. चर्चा होण्यासाठी आणखी आठ दिवस आहेत, असे उद्गारही त्यांनी काढले. पाकिस्तानने ठोस कारवाई करावी सरकारने म्हटले असले तरी त्यासाठी कालमर्यादा ठरवून दिली नाही, असेही ते म्हणाले. पाकिस्तानसह शेजारी देशांसोबत आमचे संबंध मैत्रीपूर्ण राहातील; मात्र आम्ही सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादी कारवाया खपवून घेणार नाही. बँकॉक येथे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार स्तरावर व्यापक चर्चा झाल्यानंतर आम्ही पाकिस्तानसोबत मैत्रीचा हात समोर केला आहे.गुरुदासपूर, पठाणकोटमध्ये अतिसतर्कतेचे आदेश जारीगुरुदासपूरपासून जवळच असलेल्या एका गावातील नागरिकांनी लष्कराच्या पोशाखातील दोन संशयित इसमांना बघितल्याची सूचना दिल्यावर सुरक्षा दल सतर्क झाले असून तिबरी लष्करी छावणी आणि आजूबाजूच्या परिसरात शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे.तिबरी छावणी परिसरात संपूर्ण घेराबंदी करण्यात आली आहे. परंतु अद्याप सुरक्षा दलांना कुठल्याही संशयित हालचाली दिसल्या नाहीत, असे पोलिसांनी सांगितले.दरम्यान परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधीक्षक गुरप्रीतसिंग तूर यांनी दिली.