शहरं
Join us  
Trending Stories
1
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
2
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
3
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
4
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
5
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
6
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
7
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
8
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
9
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
10
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
11
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
12
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
13
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
14
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
15
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
16
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

हल्ल्यामागे जैशचे चौघे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2016 03:24 IST

पठाणकोट हवाई तळावरील हल्ला घडवून आणण्यामागे जैश-ए-मोहम्मद या अतिरेकी संघटनेचा प्रमुख मौलाना मसूद अझहर, त्याचा भाऊ अब्दुल रौफ असगर या दोघांसह चौघांचा

नवी दिल्ली : पठाणकोट हवाई तळावरील हल्ला घडवून आणण्यामागे जैश-ए-मोहम्मद या अतिरेकी संघटनेचा प्रमुख मौलाना मसूद अझहर, त्याचा भाऊ अब्दुल रौफ असगर या दोघांसह चौघांचा समावेश असल्याचा दावा भारताने गुप्तचर यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीच्या हवाल्याने केला आहे. असगर हा आयसी-८१४ या विमानाच्या कंदहार अपहरण प्रकरणाचा सूत्रधार होता.लाहोरजवळ या हल्ल्याचा कट रचल्याचा दावाही तपास संस्थेने केला असल्याचे उच्चस्तरीय सूत्रांनी स्पष्ट केले. हल्ल्यात सहभागी चौघांबाबत विस्तृत माहिती पाकिस्तानला योग्य माध्यमातून पुरविण्यात आली आहे. पठाणकोट हल्ल्यातील कटकर्त्यांवर ठोस कारवाई हीच पाकिस्तानसोबतची भविष्यातील चर्चेसाठी अट राहील, असा दावाही सूत्रांनी केला. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार नासेर खान जानजुआ यांच्याशी या मुद्यावर चर्चा करतानाच आवाजाचे नमुने आणि पुरावे सादर केले आहेत.कंदहार विमान प्रकरणाचा सूत्रधार होता असगरपठाणकोट हल्ल्यातील कटकर्त्यांमध्ये अझर, रौफ, अशफाक आणि कासीम या चौघांच्या नावांची ओळख पटविण्यात आली आहे. अब्दुल रौफ असगर हा १९९९ मध्ये भारताच्या आयसी-८१४ या विमानाचे कंदहारला अपहरण करण्यात मुख्य सूत्रधार होता. अतिरेकी अझहर याच्यासह तीन अतिरेक्यांची भारतीय कारागृहातून सोडण्याच्या बदल्यात प्रवाशांची मुक्तता करण्यात आल्यानंतर ओलिस नाट्यावर पडदा पडला होता. या चौघांना ताब्यात देण्याची मागणी भारताने केली आहे.(लोकमत न्यूज नेटवर्क)चर्चा पुन्हा वांध्यात : निर्णायक कारवाई करा; भारताने ठणकावलेपठाणकोट हल्ल्यात पाकिस्तानी अतिरेक्यांचा सहभाग असल्याची गुप्तचर यंत्रणेकडून मिळालेली माहिती आम्ही पुरविली आहे, आता तडकाफडकी कारवार्ई करा, त्यावरच चर्चा निर्भर राहील, असे भारताने ठणकावले आहे.हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकशी होऊ घातलेली सचिव स्तरावरील चर्चा पुन्हा वांध्यात सापडली आहे.विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी पत्रपरिषदेत भारताची भूमिका मांडली. मात्र पत्रकारांनी प्रश्नांचा भडिमार करूनही त्यांनी चर्चा होणार की नाही याबाबत भाष्य टाळले. चर्चा होण्यासाठी आणखी आठ दिवस आहेत, असे उद्गारही त्यांनी काढले. पाकिस्तानने ठोस कारवाई करावी सरकारने म्हटले असले तरी त्यासाठी कालमर्यादा ठरवून दिली नाही, असेही ते म्हणाले. पाकिस्तानसह शेजारी देशांसोबत आमचे संबंध मैत्रीपूर्ण राहातील; मात्र आम्ही सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादी कारवाया खपवून घेणार नाही. बँकॉक येथे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार स्तरावर व्यापक चर्चा झाल्यानंतर आम्ही पाकिस्तानसोबत मैत्रीचा हात समोर केला आहे.गुरुदासपूर, पठाणकोटमध्ये अतिसतर्कतेचे आदेश जारीगुरुदासपूरपासून जवळच असलेल्या एका गावातील नागरिकांनी लष्कराच्या पोशाखातील दोन संशयित इसमांना बघितल्याची सूचना दिल्यावर सुरक्षा दल सतर्क झाले असून तिबरी लष्करी छावणी आणि आजूबाजूच्या परिसरात शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे.तिबरी छावणी परिसरात संपूर्ण घेराबंदी करण्यात आली आहे. परंतु अद्याप सुरक्षा दलांना कुठल्याही संशयित हालचाली दिसल्या नाहीत, असे पोलिसांनी सांगितले.दरम्यान परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधीक्षक गुरप्रीतसिंग तूर यांनी दिली.