शहरं
Join us  
Trending Stories
1
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
2
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा
3
IPL 2025: लखनौच्या अडचणीत वाढ, दुखापतीमुळं मयांक यादव आयपीएलमधून बाहेर!
4
Shiv Sena: पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील संशयितांची माहिती देणाऱ्याला १० लाख रुपयांचे बक्षीस
5
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
6
बिहार दौऱ्यात राहुल गांधी यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल, पोलिसांनी शंभराहून अधिक जणांना केलं आरोपी
7
India Pakistan Ceasefire: "भारत-पाकिस्तान यांच्यात १८ मेपर्यंत शस्त्रसंधी"; पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री डार यांचे विधान
8
आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली"
9
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
10
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
11
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
12
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
13
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
14
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
15
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
16
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
17
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
18
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
19
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग
20
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...

महाराष्ट्राचे चार शूर

By admin | Updated: January 19, 2016 04:15 IST

तलावात बुडणाऱ्या चार मित्रांचा जीव वाचविण्याच्या प्रयत्नात आपल्या प्राणाची बाजी लावणारा गौरव सहस्रबुद्धे याला यंदाच्या भारत पुरस्कार या सर्वोच्च राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्काराने मरणोत्तर

नवी दिल्ली : तलावात बुडणाऱ्या चार मित्रांचा जीव वाचविण्याच्या प्रयत्नात आपल्या प्राणाची बाजी लावणारा नागपूरचा गौरव कवडुजी सहस्रबुद्धे याला यंदाच्या ‘भारत पुरस्कार’ या सर्वोच्च राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्काराने मरणोत्तर गौरविण्यात येणार आहे. तसेच अन्य २४ बालकांची राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. त्यात कोथळी (जळगाव) येथील नीलेश भिल्ल, सिंदी रेल्वे (वर्धा) येथील वैभव रामेश्वर घंगारे आणि वाळकेश्वर (मुंबई) येथील मोहित दळवी या महाराष्ट्रातील बालकांचाही समावेश आहे.भारतीय बाल कल्याण परिषदेने (आयसीसीडब्ल्यू) सोमवारी नवी दिल्ली येथे २०१५ या वर्षासाठी राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारासाठी तीन बालिकांसह एकूण २५ साहसी बालकांच्या नावांची घोषणा केली. त्यापैकी गौरव सहस्रबुद्धे आणि उत्तर प्रदेशचा १३ वर्षीय शिवांश सिंग या दोघांना हा पुरस्कार मरणोपरांत बहाल केला जाणार आहे.नागपूरच्या अंबाझरी तलावात बुडणाऱ्या चार मित्रांना वाचविताना गौरवचा स्वत:चा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला होता.आमच्या दोन मुलांमध्ये धाकटा असलेला गौरव हा शूर व साहसी होता. त्याला पोहता येत नव्हते. तरीदेखील आपल्या मित्रांचा जीव वाचविण्याच्या प्रयत्नात त्याने तलावात उडी घेतली. एकएक करून सर्व मित्रांना तलावातून बाहेर काढले. त्यात तो दमला आणि तलावातून बाहेर पडण्याआधीच बुडाला. त्याला कबड्डी खेळायला आवडे. मोठा होऊन अभियंता बनायची त्याची इच्छा होती,’ असे त्याचे वडील कवडुजी सहस्रबुद्धे यांनी अश्रुपूर्ण नयनांनी सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)गौरव सहस्रबुद्धे (नागपूर)नागपूर शहरातील टाकळी सीम येथील गौरव सहस्रबुद्धे याने अंबाझरी तलावात बुडणाऱ्या चार मुलांचा प्राण वाचविला. त्यात गौरवला आपले प्राण गमवावे लागले. दहावीत शिकणारा गौरव ३ जून २०१४ला आपल्या चार मित्रांसह अंबाझरी तलावाजवळ खेळत असताना अचानक त्याचे मित्र पाण्यात बुडत असल्याचे त्याने पाहिले. जीवाची पर्वा न करता त्याने आपल्या तीन मित्रांना पाण्यातून सुखरूप बाहेर काढले आणि चौथ्या मित्राला सुखरूप बाहेर काढत असतानाच तो बुडाला.-----निलेश भिल्ल (जळगाव)- ३० आॅगस्ट २०१४ रोजी कोथळी परिसरात पूर्णा नदीच्या बॅक वॉटरमध्ये बुडणाऱ्या भागवत ओगले (११, रा. बुलढाणा) याचे निलेश रेवाराम भिल्ल याने प्राण वाचविले. निलेश कोथळी (ता. मुक्ताईनगर ) येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता चौथीचा विद्यार्थी आहे.——————-वैभव घंगारे (वर्धा)- वैभव रामेश्वर घंगारे हा १२ वर्षीय विद्यार्थी वर्ध्याच्या नेहरू विद्यालय सिंदी (रेल्वे) येथे शिकत असून २६ जुलै २०१४ रोजी नंदा नदीला आलेल्या पुरात सुहास पांडुरंग बोरकर (६) हा वाहत गेला. तो पुलाच्या पाईपमध्ये अडकला असता वैभवने आपल्या जीवाची तमा न बाळगता पुराच्या पाण्यात शिरून सुहासला सहीसलामत बाहेर काढले.———मोहित दळवी (मुंबई) -बारा वर्षांच्या मोहित दळवीने दिवा येथे राहणाऱ्या नऊ वर्षांच्या कृष्णा पाष्टे हिचे प्राण वाचविले. परीक्षा संपवून उन्हाळ््याच्या सुट्टीत मामाच्या घरी राहायला आलेली नऊ वर्षांची कृष्णा वाळकेश्वरच्या बाणगंगा तलावात उतरली. पाण्याचा अंदाज न आल्याने ती गाळात रुतली. त्यावेळी जीव वाचविण्यासाठी तिची सुरु असलेली धडपड पाहून मोहित दळवीने पाण्यात उडी घेतली आणि कृष्णाचे प्राण वाचविले.या सर्व बालकांना २४ जानेवारी रोजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुरस्काराने सन्मानित केले जाईल. तसेच या पुरस्कार विजेत्या बालकांना प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये भाग घेण्याचीही संधी मिळेल. १५ वर्षांच्या गौरवचा मरणोत्तर पुरस्कार त्याचे माता-पिता स्वीकारतील.