शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

महाराष्ट्राचे चार शूर

By admin | Updated: January 19, 2016 04:15 IST

तलावात बुडणाऱ्या चार मित्रांचा जीव वाचविण्याच्या प्रयत्नात आपल्या प्राणाची बाजी लावणारा गौरव सहस्रबुद्धे याला यंदाच्या भारत पुरस्कार या सर्वोच्च राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्काराने मरणोत्तर

नवी दिल्ली : तलावात बुडणाऱ्या चार मित्रांचा जीव वाचविण्याच्या प्रयत्नात आपल्या प्राणाची बाजी लावणारा नागपूरचा गौरव कवडुजी सहस्रबुद्धे याला यंदाच्या ‘भारत पुरस्कार’ या सर्वोच्च राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्काराने मरणोत्तर गौरविण्यात येणार आहे. तसेच अन्य २४ बालकांची राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. त्यात कोथळी (जळगाव) येथील नीलेश भिल्ल, सिंदी रेल्वे (वर्धा) येथील वैभव रामेश्वर घंगारे आणि वाळकेश्वर (मुंबई) येथील मोहित दळवी या महाराष्ट्रातील बालकांचाही समावेश आहे.भारतीय बाल कल्याण परिषदेने (आयसीसीडब्ल्यू) सोमवारी नवी दिल्ली येथे २०१५ या वर्षासाठी राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारासाठी तीन बालिकांसह एकूण २५ साहसी बालकांच्या नावांची घोषणा केली. त्यापैकी गौरव सहस्रबुद्धे आणि उत्तर प्रदेशचा १३ वर्षीय शिवांश सिंग या दोघांना हा पुरस्कार मरणोपरांत बहाल केला जाणार आहे.नागपूरच्या अंबाझरी तलावात बुडणाऱ्या चार मित्रांना वाचविताना गौरवचा स्वत:चा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला होता.आमच्या दोन मुलांमध्ये धाकटा असलेला गौरव हा शूर व साहसी होता. त्याला पोहता येत नव्हते. तरीदेखील आपल्या मित्रांचा जीव वाचविण्याच्या प्रयत्नात त्याने तलावात उडी घेतली. एकएक करून सर्व मित्रांना तलावातून बाहेर काढले. त्यात तो दमला आणि तलावातून बाहेर पडण्याआधीच बुडाला. त्याला कबड्डी खेळायला आवडे. मोठा होऊन अभियंता बनायची त्याची इच्छा होती,’ असे त्याचे वडील कवडुजी सहस्रबुद्धे यांनी अश्रुपूर्ण नयनांनी सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)गौरव सहस्रबुद्धे (नागपूर)नागपूर शहरातील टाकळी सीम येथील गौरव सहस्रबुद्धे याने अंबाझरी तलावात बुडणाऱ्या चार मुलांचा प्राण वाचविला. त्यात गौरवला आपले प्राण गमवावे लागले. दहावीत शिकणारा गौरव ३ जून २०१४ला आपल्या चार मित्रांसह अंबाझरी तलावाजवळ खेळत असताना अचानक त्याचे मित्र पाण्यात बुडत असल्याचे त्याने पाहिले. जीवाची पर्वा न करता त्याने आपल्या तीन मित्रांना पाण्यातून सुखरूप बाहेर काढले आणि चौथ्या मित्राला सुखरूप बाहेर काढत असतानाच तो बुडाला.-----निलेश भिल्ल (जळगाव)- ३० आॅगस्ट २०१४ रोजी कोथळी परिसरात पूर्णा नदीच्या बॅक वॉटरमध्ये बुडणाऱ्या भागवत ओगले (११, रा. बुलढाणा) याचे निलेश रेवाराम भिल्ल याने प्राण वाचविले. निलेश कोथळी (ता. मुक्ताईनगर ) येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता चौथीचा विद्यार्थी आहे.——————-वैभव घंगारे (वर्धा)- वैभव रामेश्वर घंगारे हा १२ वर्षीय विद्यार्थी वर्ध्याच्या नेहरू विद्यालय सिंदी (रेल्वे) येथे शिकत असून २६ जुलै २०१४ रोजी नंदा नदीला आलेल्या पुरात सुहास पांडुरंग बोरकर (६) हा वाहत गेला. तो पुलाच्या पाईपमध्ये अडकला असता वैभवने आपल्या जीवाची तमा न बाळगता पुराच्या पाण्यात शिरून सुहासला सहीसलामत बाहेर काढले.———मोहित दळवी (मुंबई) -बारा वर्षांच्या मोहित दळवीने दिवा येथे राहणाऱ्या नऊ वर्षांच्या कृष्णा पाष्टे हिचे प्राण वाचविले. परीक्षा संपवून उन्हाळ््याच्या सुट्टीत मामाच्या घरी राहायला आलेली नऊ वर्षांची कृष्णा वाळकेश्वरच्या बाणगंगा तलावात उतरली. पाण्याचा अंदाज न आल्याने ती गाळात रुतली. त्यावेळी जीव वाचविण्यासाठी तिची सुरु असलेली धडपड पाहून मोहित दळवीने पाण्यात उडी घेतली आणि कृष्णाचे प्राण वाचविले.या सर्व बालकांना २४ जानेवारी रोजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुरस्काराने सन्मानित केले जाईल. तसेच या पुरस्कार विजेत्या बालकांना प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये भाग घेण्याचीही संधी मिळेल. १५ वर्षांच्या गौरवचा मरणोत्तर पुरस्कार त्याचे माता-पिता स्वीकारतील.