शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

चिपको आंदोलनाचे प्रणेते, वृक्षमित्र हरपला; सुंदरलाल बहुगुणा यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2021 07:01 IST

१९४७ मध्ये लाहोरहून बीए ऑनर्स परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्यावर टिहरीत ते परतले व टिहरीतील राजवटीविरोधात असलेल्या प्रजा मंडळात सहभागी झाले.

नवी दिल्ली : बहुगुणा यांचे वडील अंबादत्त बहुगुणा टिहरीत वन अधिकारी होते. १३ वर्षांचे असताना अमर शहीद श्रीदेव सुमन यांच्या संपर्कात आल्यावर त्यांच्या आयुष्याची दिशाच बदलली. सुमन यांच्यापासून प्रेरणा घेत ते  बाल्यावस्थेत स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाले. त्यांनी टिहरी राजवटीविरोधात आंदोलन केले. अत्यंत बुद्धिमान असलेले बहुगुणा यांचे शिक्षण टिहरीतील राजकीय प्रताप इंटर काँलेजपासून ते लाहोरपर्यंत झाले.

१९४७ मध्ये लाहोरहून बीए ऑनर्स परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्यावर टिहरीत ते परतले व टिहरीतील राजवटीविरोधात असलेल्या प्रजा मंडळात सहभागी झाले. १४ जानेवारी, १९४८ रोजी राजेशाही उलथून टाकली गेल्यावर ते प्रजामंडळ सरकारमध्ये प्रचार मंत्री बनले. लोकांच्या हितासाठी लढणाऱ्या बहुगुणा यांनी १९८१ मध्ये झाडे तोडण्यावर बंदी घालण्याची मागणी केली. त्यांनी पदमश्री सन्मान घेण्यास नकार दिला. त्यांनी दारूबंदी, पर्यावरण संरक्षण आणि टिहरी धरणाविरोधात १९८६ मध्ये आंदोलन सुरू करून ७४ दिवस उपोषण केले.

पर्यावरणवादी युगाचा अंत -राहुल गांधीसुंदरलाल बहुगुणा यांना त्यांच्या कार्यामुळे येणाऱ्या पिढ्या नेहमी लक्षात ठेवतील, अशा शब्दांत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. गांधी यांनी टेलिग्राम संदेशात म्हटले की, “बहुगुणा यांच्या निधनामुळे देशातील सगळ्यात प्रतिष्ठित पर्यावरणवादी युगाचा अंत झाला आहे. चिपको आंदोलनातील त्यांचे योगदान आगामी पिढ्या लक्षात ठेवतील.”

जागतिक स्तरावर नोंदसुंदरलाल बहुगुणा यांच्या निधनाबद्दल उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी शुक्रवारी दु:ख व्यक्त केले. बहुगुणा यांनी पर्यावरण संरक्षणासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल ते नेहमीच स्मरणात राहतील, असे नायडू ट्विटरवर म्हणाले. हिमालयातील पर्यावरण रचना जपण्यासाठी बहुगुणा यांनी न थकता केलेल्या प्रयत्नांची जागतिक स्तरावर नोंद घेतली गेली. त्यांच्या कार्यापासून अनेकांना प्रेरणा मिळेल, असे नायडू म्हणाले.